Saturday 27 August 2011

अनोखी (भाग ४)

तो war front वर होता. युद्धाची सुरुवात नव्हती अजून पण चिन्ह दिसत होती. संपूर्ण तयारीत ते सगळे बोर्डरवर होते. असह्य, अनिश्चित वातावरण कधी काय होईल सांगता येत नाही, होईलच याचा नेम नाही. छोट्या छोट्या गावातील ते गावकरी त्यांची आयुष्य वाचवण, त्याना घर-दार सोडून बोर्डर पासून लांब जायला तयार कारण,त्याचं संरक्षण करणं, डोळ्यात तेल घालून रात्रीचा दिवस करून ती अनिश्चितता, ती घुसमट तो इतरांच्या बरोबरीने मनाचा तोल ढळू न देता सहन करत होता. तिची पत्रं वारंवार वाचत होता. तिला उत्तर लिहित होता पण ती पोस्ट करायची राहून जात होती. तिची पत्र मात्र न चुकता येत होती. ते शेवटल पत्र आलं,.. नेहमीच्याच उत्साहाने त्याने ते पत्र उघडल. त्याचं energy ड्रिंक, त्याचं optimism याचं राजं असलेलं ते पत्रं. !! हावरटासारख ते पत्र त्यानं फोडलं. सुंदर मोत्यासारख वळणदार अक्षरात " प्रिय फौजी" ,.. परिचित सुरुवात. तो खूप सुखावला नेहमीसारखाच!!  पण पुढचा फक्त अर्ध्यापानाचा मजकूर २-३ वेळा वाचूनही त्याच्या मेंदूत शिरेच ना!!!
 तो त्या पत्राकडे फक्त बघत राहिला. त्याच्या कपाळाची शीर ताणली गेली, चेहरा विचित्र झाला, तो सुन्न पणे जागीच थिजला. त्याचा front वरचा जिवलग मित्र 'सुलेमान'ने असा विचित्र अवतार पाहून त्याला विचारलं "क्या हुआ भाई?" तो काही बोलणार तोच एका हल्ल्याची बातमी कानावर आली. अनोखी , त्याचं दु:ख त्याने तात्पुरतं त्या कागदाच्या घडीत बांधल आणि तो कागद खिशात कोंबत तो उठला.

सुलेमान!!  त्याच्या आठवणीने त्याचा गळा दाटून आला... पण भाभिजान च्या दुख:पेक्षाही आज त्याच्याच   दुख:चं पारडं त्याला जड वाटत होतं. त्या दिवशी अनोखीच ते अनोख पत्रं खिशात कोंबून ते दोघे धावले, अतिरेक्यांशी झालेल्या चकमकीत सर्व ५ अतिरेकी ठार झाले तर एक .. फक्त एकच जवान कामी आल!!. संपूर्ण देशाला त्यांचा अभिमान वाटला. फक्त एक जवान !! फक्त ??? त्या विचार सरशी तो दुखावला ऐन तारुण्यात   स्वत:च्या नवजात अर्भकाला न बघता त्याचा सुलेमान ... त्याचा सुलेमान त्याच्याच देशात तुम्ही लोक म्हणून त्याला परकं करणार्या देशवासीयांसाठी प्राण पणाने लढत शेवटी अल्लाला प्यारा झाला,... तो फक्त एक जवान??? ,.. त्याला खूप चीड आली त्याने तो दुख:चा कड मोठ्या शरतीने परतवला. तेव्हा परतवलेला ना?? अगदी तसाच.  त्याच मनं आत आत अंतर्मनात त्याच दुख: कैद करतं होतं. आणि तो कोरड्या डोळ्यांनी कुराण आणि पत्रं पहात होता. सुलेमान गेल्यावर तो दुख: 'व्यक्त' न करता पिऊन टाकायला शिकला. "गम में रम " असं सुलेमान का म्हणायचा त्याचं गमक त्याने त्याच्या परीने जाणलं तेव्हा!! त्याच्या मनाचा ताण सहन न होऊन त्याचे डोळे पुन्हा अलगद बंद झाले. परत तो नकोसा अंधार... त्यात वर्ष मास पुढे सरकात होते. तो ते सगळं जगला होता, यावरच विश्वास नव्हता. एक नकोसा उलटा प्रवास,... पण ते थांबवणही नव्हतं त्याच्या हातात.

त्याला शशीच्या पत्रातून कळलं अनोखीच. त्याच्या अनोखीच ..  लग्न झालं. त्याच उरल-सुरलं अवसान तेव्हा गळून पडलं. पण .. हारून चालणारच नव्हत!! थांबून आयुष्य थांबत नाही.तिच्या लग्नानंतर ३ महिन्यातच सगळीकडे शांतता झाली. आणि त्याला सुट्टी मिळाली. एकदा वाटलं जाऊच नये पण.. तो घरी परत आला. सगळ्याना भेटला, "तिला" ही!! तिला संसारात रमलेली पाहून सुखावला आणि दुखावलाही.!! ती सेक्रेटरी बनली होती. नवर्याची नाही हा.. जोब करत होती. स्मार्ट आणि चक्क सुंदर दिसत होती.  तो पुन्हा कामावर रुजू झाला तेव्हा त्याला पटले. की पाटी कोरी झालीये, पुनश्च श्री गणेशा करायला हवा. शमाने सांगितल्याप्रमाणे दुख: होणार पण इथवर त्याचा पहिला कड ओसरला असेल आणि आता पुन्हा भावनांच्या हाताचं खेळण बनण्यापुर्वीच त्यांचा तो अगम्य आणि प्रचंड पसारा आवरलाच पाहिजे होता.

त्याने ठरवले परत डाव मांडायचा!! मग काय त्याने ४-५ वेळा मग प्रेमात पडण्याचे असफल प्रयत्न केले. म्हणजे त्याला कोणी नाही म्हणाली नाही tall dark handsome कबिल होता अनोखीचा फौजी !! पण सगळेच वेळी तो प्रेमात जोरदार आपटला. "प्रेमात करणे ला प्रेमात पडणे का म्हणतात या अनोखीच्या प्रश्नच उत्तर त्याला त्याच्याच ४-५ प्रेम कहाण्या आठवल्यावर मिळालं. तो याही परिस्थितील पडणे .. आपटणे या शब्दांवर हसला. मग स्वत:ला अजून एक संधी देत त्याने लग्नाचाही घाट घातला. पण ते लग्न म्हणजे एक चुकलेला डाव होता. त्यांच्या विस्कटलेल्या संसारात त्यांची चिमुरडी मात्र काहीच चूक नसताना भरडली गेली. तिची आठवण झाली... त्याला वाटलं आता धीर सुटणार, त्याला घाम फुटला त्याचा ..त्याचा तोल जाऊ लागला पण तेव्हाद्यातच शमा चा फोन आला. शमा शशीची बायको... पण त्या आधी त्यांची आणि अनोखीची बाल मैत्रीण!! त्या दोघाना सावरणारी.वेळ पडली तर रागावणारी... शमा!! तो वाचला त्याच्या मनाच्या कोपर्यात कोंडलेली ती अपराधी भावना उचंबळून येता येता तशीच आत कोंडली गेली. मनाचे दरवाजे घट्ट घट्ट मिटून. आत कोंडून गेली.

तो त्याच्या उमेदीची संपूर्ण १८ वर्ष देशाला बहाल करून परत आला.!!! कारण त्याच्या दृष्टीने पुन्हा नव्याने, नव्या नियमांनी आणि हिमतीने डाव मांडायची गरज होती. परत येऊन आई कडे लक्ष देत तिच्यासाठी जगायला त्याने सुरुवात केली. एक नोकरी पत्करली वेळ जायचं साधन आणि हाती चार पैसेही येणार होते.
आई-पप्पा , शशी-शमा त्यांची लेक, अजय,विशाल त्यांची बायका-मुलं असं ओढ लावणार एक विश्व पुन्हा बनल त्याच. त्यांची सुख-दुख: आपली म्हणत तो हसू आणि रडू लागला. सगळं तसं बरच चाललं होतं!!! तो ह्या आयुष्यात रमाला होता. त्याच मन जरा तळ्यावर आलं होतं. पण नियतीला त्याच आयुष्य सरळ आणि त्याच्या मर्जीने चालणं म्हणजे बहुदा तिचा अपमान वाटत असावा. पूर्व जन्मीचा तिचा गुन्हेगार असल्यासारखी ती त्याला हवं तेव्हा हवं तसं फेकत होती. परत आल्यावर वर्षाचा अवधी गेला असेल नसेल.. त्याला सुमी भेटली बस मध्ये. सुमी ,.. अनोखीची मागची बहिण ..

                                                                                                         क्रमश:

Friday 26 August 2011

अनोखी (भाग ३)

त्या दिवसानंतर त्यांनी कितीतरी संध्याकाळी एक-मेकांच्या साथीने घालवल्या. दिवसा मासाने त्यांचे प्रेम खुलत होत आणि mature होत होतं. दोघेही practicle होते. एक-मेकांवर जिवापाड प्रेम करत होते. पण दोन वेळेला जेवायला लागतच .. आणि फक्त प्रेमाने भूक भागत नाही. तसेच स्वप्न पहायची तर ती पूर्ण करायची. त्यांची दिवा स्वप्न नाही बनू द्यायची!! अश्या स्पष्ट मताची girl friend मिळाल्यावर त्याचा नाईलाज होता. आणि शेवटी हेही खरच होत की त्यालाही स्वत:ला proove करायचे होते. सगळ काही दोघांनी मिळून प्लान केलेलं. अस वाटत होतं की सगळं किती सोप्प आहे. ती सेक्रेटरी बनेल आणि हा defense सेर्विसिस मध्ये join होऊन देशाचं रक्षण कारेलं. घरून विरोध झालाच तर पळून जाण्यात आणि तिला पळवण्यात काही गैर आहे असे त्या दोघानाही वाटत नव्हतेच कधी! धर्म बुडेल, समाज काय म्हणेल? याची चिंता "अनोखी"ला आणि तिच्या "फौजी" ला कधीच नव्हती. होती ती आस, स्वप्नांचा वेध घ्यायची!! स्वत:च अस्तित्व निर्माण करून एक-मेकांच व्हायची!!!

प्लान करताना सोप्प सोप्प वाटलेल्या आयुष्यातलं पाहिलं वळण म्हणजे त्याला आलेला ट्रेनिंग चा call .पहिली  कसोटी त्यांच्या स्वप्नातल्या आयुष्यातली !! ते लेटर घेऊन तो अशाच एका संध्याकाळी तिच्यासमोर बसला. बराच वेळ सगळीकडे शांतता होती. त्यांच्या लाडक्या जागी वडाच्या पारावर दोघेही स्थब्ध बसले होते. शेवटी ती नकोशी शांतता तिने संपवली " कधी निघतोयस?" .. "परवा " ... "......."  तो :" बघ विचार कर एकदा,.. एक चांगली job ऑफर आहे इथली" ,.ती: "तुला काय हवाय?"  उत्तरादाखल त्याने तिला मिठी मारली, तू  म्हणत असशील, तर.. तो जोब स्विकारतो मी .. तू बोल ... तिने डोळे मिटले! आता निर्णय तिलाच घ्यायचाय हे तिने पुरते जाणले होते, मग नेहेमीसारख स्वच्छ हसत ती म्हणाली " तुझी स्वप्न, तुझं passion मला कळतं, आणि मी प्रेमच  केलय "फौजी" वर .. मग चला तयारीला लागा! ,, " Go and make me feel proud " आणि निश्चिंत मनाने जा, पत्र पाठव पण अक्षर निट काढ ... सगळं तसचं असेल फक्त जेव्हा सुट्टीवर येशील तोवर तुझी अनोखी "सेक्रेटरी" झालेली असेल. परवा जाणारेस ना? तेव्हा ग्रुप मध्ये भेट्शीलच पण आज कारण न देता थांब. तो हसला ,.. ते दोघे तिथेच बसून होते खूप वेळ,.. सगळीकडे काळोख भरून राहिला होता. ते परिचित झाड अचानक भयाण वाटायला लागलं तसे  ते उठले. पुन्हा: इथचं भेटायचं वाचन देत आणि घेत !!! दोघेही निघाले ठरवलेलं आयुष्य घडवायला.!! 

त्याचा हात भाजला सिगारेट संपली होती त्याची. तो पुन्हा यंत्रवत हॉस्पिटलच्या पायर्या चढू लागला. त्याला वाटलं खरच किती नि काय काय आखलेलं, रंगवलेलं पण.. पणं आपल्याच चित्रात आपल्याला रंग भरण्याचाही अधिकार नसतो!! तो अधिकार नियतीचा!! सुंदर सुंदर चित्रातले रंग कसे लीलया उडवून नेते ही नियती!!! आणि आपण नाचत राहातो फरफटत रहातो तिच्या मर्जीनुसार! त्याला तिची पत्र, त्यातला मजकूर, तिची प्रगती सगळ अंधुक अंधुक आठवत होतं. प्रत्येक पत्रात सगळ्यात पहिले वाक्य कोंबडीचे पाय बरे पण तुझं अक्षर नाही. सुधार सुधार ... आणि शेवटचही ठरलेलच... "खूप खूप आठवण येते तुझी!! कधी येणारेस?" ,. त्याने पत्रातून कळवलं की त्याची " बदली झालीये war front वर. मिळालेली नोकरी व्यवस्थित कर. डोकं शांत ठेव भटक भवानी सारखी उगीच फिरू नकोस, काळजी घे माझ्या "अनोखी"ची. मला माहितेय तू माझी वाट बघातेयस एक वर्ष झालं मला तुला भेटून आणि ही राजाही रद्द झाली. मी सुखरूप आहे आणि असेन कारणं तुझं प्रेम माझ्याबरोबर आहे. काळजी करू नकोस काही झालाच तर नव्याने डाव मांड, तुझ्याच म्हणण्याप्रमाणे  आयुष्य खूप सुंदर आहे ते सुंदरपणे जगं. "


मग शेवट शेवटची पत्र आठवली त्याला .. घरातून लग्नाचा विषय खूपच डोक  वर काढत आहे. थांबवणं अशक्य होतयं ,, एकदा ये, घरच्यांना भेट. मग मी तुझ्या अशी मागे नाही लागणार. असेच सांगितले तर परवानगी नाही मिळणार आणि ते पण लग्न लावून द्यायला इरेला पेटतील. त्या पत्राला याने दिलेलं उत्तर तिच्यापर्यंत पोहोचलाच नाही. म्हणजे ते पोस्टचा काहीतरी प्रोब्लेम झाला होता. त्याला तिची पुढेही ५-६ पत्र आली पण त्याची २-३ पत्र युद्धाच्या सावटाखाली त्याच्या बेस कॅम्पलाच विसावली. वय आणि घराचा फोर्स दोन्ही वाढत गेला. तिने शेवटी घरी सांगून टाकलं सगळं सगळं ,.. त्यानंतर जे रामायण घडल ते त्याला तिच्या पत्रांमधून कळलंच होतं. आणि शेवटचं पत्र ज्यात तिने फक्त इतकाच लिहिलेलं " राजा तुझी अनोखी हरली रे, खूप खूप भांडली, रडली, चिडली पण आईच्या ब्लाक्मेलिंग पुढे आणि सुमीच्या लग्नाच्या विषयामुळे, तसच "स्वार्थी " हे विशेषण चिकटवून नाही घेऊ शकली म्हणून, घरच्यांची सोय म्हणून, ती झुकली ... आज सगळ्या वचनांतून मला मोकळं कर..!! थकलेय आता रे दोन वर्ष झाली रोजची भांडण, चिडचिड मग तुझा उद्धार .. आणि रोज वाट पहाणं तुझ्या पत्राची" आयुष्य संपून गेलं तरं बरं असं  वाटू लागलं पण तुझी एका "फौजी" ची "अनोखी: इतकी कमकुवत पळ्पुटी असूच शकतं नाही."

तो इचू पर्यंत पोहोचला. पुन्हा एकदा तिला काचेतून शांत झोपलेलं पाहिलं आणि बेसिन जवळ गेला. तोंडावर  भसा भसा पाण्याचे हापके मारले त्याने!! त्याच्या मनात त्या शेवटल्या आता पिवळ्या पडलेल्या कागदावरल्या शेवटच्या दोन ओळी घोळत राहिल्या. "त्यामुळे आयुष्य संपवण्याची हिम्मत आणि इच्छा दोन्हीही माझ्यात नाही. तेव्हा ह्या हरलेल्या अनोखीसाठी रडू नकोस राजा!!. का ? कसं? याची उत्तर न शोधता पुढे चालत रहा. थांबू नकोस, नव्या उमेदीने जगं कारण आयुष्य खूप सुंदर आहे!!! "

                                                                                                    क्रमश:


Thursday 25 August 2011

  अनोखी (भाग २)

त्याला समजत होत की ती आता फक्त एक मैत्रीण असण्यापेक्षाही खूप काही जास्ती आहे. त्याच्या आयुष्यात आणि मनात ती भरून राहिलीये, त्याला ती आवडू लागली सुरुवातीला तरुण्यासुलभ आकर्षण असेल कदाचित (हा विचार मनात आला आणि तो जरास हसलाही) कारण "प्रेम" या अद्भुत, मती गुंगवून टाकणार्या शब्दाचा अर्थ तो "ती" तशी आवडायला लागल्यावरच जगला, समजला होता. ते मयुरपंखी दिवस! ते सुंदर अवर्णनीय क्षण! आता त्याच्या आठवणीत जाऊन बसले होते. ते तिच्याचमुळे त्याला गवसले होते. त्याला वाटले हे 'क्षण' सुधा कसे समजूतदार आणि  practical पुढचा आला की पहिला शहाण्यासारखा जाऊन बसतो आठवणींच्या रांगेत!! कधी तरी मग मागे वळून बघताना ओठांवर हसू आणतो तर कधी डोळ्यांना धार लावतो. ते हुरहूर लावणारे दिवस ते वेडं वयं!!

 मग काय लहानपणापासून एक-मेकांबरोबर असल्याने शशी, अजय आणि विशाल यांच्यापासून त्याच "अनोखी" वेड काही लपून राहूच शकल नाही. मग वेगवेगळ्या कुप्त्या, युक्त्या तिला "पटवण्याच्या"! प्रयत्न सगळ काही सुरु झालं. तोही मुळातच जिद्दी, बिनधास्त, strong , सेन्सेटिव, अभिमानी, मानी, तिच्याहून काकणभर जास्ती बोलघेवडा आणि मनस्वी.!! पण ते वय आणि वेळ नाजूक असते न!! कितीही हिम्मत वाला असला गडी तरी त्याची "ती" समोर आली की दातखीळ बसायचीच.  मग तो बिचारा तरी अपवाद कसा असेल याला? त्याचीही तिच अवस्था! वेग-वेगळ्या मार्गाने आणि प्रकाराने प्रयत्न करुन झाले पण काही फ़यदा नाही.. दिवसेंदिवस याचे अनोखी प्रेम वाढ्त होते. आणि ... करियरच्या द्रुष्टिने काहीतरी निर्णय घेणेही महत्वाचे होवू लागले. मग काय टेन्शन का काय म्हणतात ते पहिल्यांदाच त्याला अनुभवायला मिळाले. मग अश्या टेन्शन्स ना उपाय असतो आणि तो म्हणजे 2mm जाडीची आणि काही इंच लांबीची एक जादूची नळकांडी! तिच्यातून घेतलेला धूर आपल्या तोंडावाटे नाकावाडे बाहेर सोडला की म्हणे तो धूर आतली अस्वस्थता, टेन्शन्स, दु:ख घेऊन बाहेर पडतो. मग ओघानेच आठवली ती पहिली शिलगावलेली सिगरेट !!! 

आजूबाजूला अनोखी आणि आई पप्पा नाहीत ना याची खात्री करून मग चहाच्या टपरीवर, कॉलेजच्या बाहेर मित्रांशी share करत फुकलेल्या त्या सिगारेट्स,.. तो शांतपणे उठला हॉस्पिटलच्या खाली गेला आणि एक सिगारेट light केली, तो नाका-तोंडातून धूर सोडत राहिला पण आज मात्र काहीच जादू होत नव्हती त्याच मन स्थिरच होत नव्हत. त्या धुराकडे तो फक्त पहात राहिला. त्या सिगरेटशीही तिच्याच आठवणी जोडलेल्या होत्या. एकदा तिची वाट बघताना सहजच मित्रांच्या टोळक्यात त्याने एक सिगरेट शिलगावली आणि "ती" दिसताच ती नुकतीच पेटवलेली सिगरेट  तशीच टाकून पळला होता, तिच्या हाकेला ओ देत.(सिगरेट  साठी नंतर मित्रांनी त्याला जाम धुतला होता) तो अस्पष्ट हसला. मग थोडा सुखावला कारण तोच दिवस होता, त्याची अनोखी त्याच्या बरोबर आयुष्यभर चालायला त्याला साथ द्यायला तयार झाली होती. तिच्या जवळ जात त्याने," काय कुठे गाव  कोळपत फिरताय संध्याकाळच्या?" असा नेहमीचाच प्रश्न विचारला. पण तिने "स्वत:च बोला आधी" मग मला बोल" हे परिचित नेहमीचे उत्तर नाही दिले. ती फक्त हसली आणि म्हणाली मी ,.. short hand ,typing चा क्लास लावलाय,.. तो " good , first step towards your dream ". ती पुन्हा शांत हसली अपरिचित आणि म्हणाली  आपल काय? की, सदाच्या टपरीमागे सिगरेट ओढत बसायचं ???

ती जेव्हा सिरीअसली बोलते तेव्हा नो मस्ती हे इतके वर्षांच्या अनुभवातून त्याला कळून चुकल होत. तो शांतपणे म्हणाला "defence चेच पक्के करेन बहुदा." ती फक्त हुंकारली. काही क्षण शांत बसून नेहेमीसारख स्वच्छ हसत म्हणाली ," आलाय मोठा फौजी बनायला!! खूप ताकद हिम्मत आहे ना तुझ्यात?? आकाशाला गवसणी घालायची स्वप्न तुझी! पण कसा रे तू एव्हढ सगळ करणार? मनातली साधी गोष्ट माझ्यापर्यंत पोहोचवायलाही धजावत नाहीस, आणि येईल त्या प्रसंगाला कसा सामोरा जाणार म्हणे तू? ...." ती पुढेही खूप काही बोलली  पण त्याने काहीच ऐकल नाही तो सुन्न झाला. शेवटी ती वळली, तिला  पाठमोरी पाहिली आणि त्याला वाटल हातातून सगळच निसटून जातंय क्षणात!! कुठूनस त्याच्यात बळ संचारल ... त्याच्या डाव्या हाताची मजबूत पकड तिच्या उजव्या मनगटावर जाणवली. त्या पकडी बरोबर ती मागे खेचली गेली त्याच्या खूप खूप जवळ!!! तिच्या  शरीरावर  रोमांच फुलले ,. तिच्या हृदयाचे ठोके त्याला ऐकू जातील इथवर वाढले,.. आणि शेवटी त्याने तिला विचारले. ती तशीच होती त्याच्या जवळ,.. तिने फक्त "तू माझी होशील? .. देशील मला साथ आयुष्यभर ..........??," इतकच ऐकल. कारण पुढच काही तिच्या मेंदूपर्यंत पोहोचतच नव्हत. त्याचा तालबद्ध श्वास आणि तिच्या हृदयाचे ठोके ती शांतपणे ऐकत राहिली. ...

                                                                                                    क्रमश: 

Wednesday 24 August 2011

अनोखी ..

( भाग १ )
तो आत बाहेर येरझार्या घालत होता. म्हणजे करण्यासारखं अजून काहीच नव्हत त्याच्या हातात नाहीतर तिच्यासाठी त्याने आकाश पाताळ एक केल असतं. पण .. आता .. आता कशाचाही फायदा नव्हता आणि जरी प्रयत्न केलेच तरी तिच्या वेदना.. त्या मात्र तो थांबवू शकणार नव्हता. थांबवू काय कमीही करू शकणार नव्हता. ती आत मृत्यूशी झुंज देत होती आणि तो बाहेर कण्हत होता. तो डॉक्टर्स ना  विनंती करत होता त्यांना वारंवार सांगत होता  "she is a real fighter doc, she will come back .. do , do something doc " ...

 पण त्याला मनोमन कळून चुकल होतं, की आता खेळ संपला, तो असहाय्य होता. जे घडेल ते पाहाणे इतकेच त्याच्या हातात होते आता. पण .. "ती", त्याची होती आणि म्हणून एक वेडी आशा त्याच्या मनात अजून जागी होती. तिला आतं life support sysytem वर ठेवलं होतं. चारी ठाव चिवचिवणारी त्याच्या भोवती बडबडत राहणारी, सतत त्याला ओरडणारी, प्रेमाने जेवायला वाढणारी, सिगरेट जर हातात जरी दिसली तर तुला सोडून जईन म्हणणारी, असह्य वेदना सहन करूनही जीवन किती सुंदर आहे म्हणणारी, त्याने चुकीच्या गायलेल्या सुंदर गाण्यामुळे चिडणारी आणि त्याच्यावर खूप खूप प्रेम करणारी,, फक्त त्याची,. अशी "ती" शांत शांत झाली होती .. जणू काही शांत झोपली होती!! तो काचेतून आत बघत कधी उगीच येरझार्या मारत बाहेर उभा होता "एकटाच" .. खूप खूप एकटा .. त्याला सगळ्यात जास्ती गरज होती कोणीतरी त्याच, त्याच्या जवळ असण्याची तेव्हा त्याची सगळ्यात जवळची व्यक्ती आत व्हेंटिलेटर वर होती. 

 डॉक्टरांनी त्याला आत बोलावून घेतलं. परिस्थितीची जाणीव आणि नाजूकता त्याला समजावली. गांभीर्य त्याला घरातून निघतानाच उमगल होत.  आता काय आता तर सगळच मशीनवर अवलंबून होते. किती दिवस किती तास, किती मिनिटे की फक्त काही सेकंद !!!  हे कोणालाच सांगता येणार्यातल नव्हत. शेवटी त्याने सगळी शक्ती आणि धैर्य एकवटल, जड अंत:करणाने फोन उचलला आणि तिच्या मोठ्या मुलाचा नंबर फिरवला. त्याला परिस्थितीची कल्पना दिली. आणि दुसरा फोन केला त्याच्या जिवलग मित्राला! आता मात्र त्याच्या आवाजातलं दु:ख तो फौजी असूनही त्याला लपवता आले नाही. "तू लगेच ये" इतकाच बोलून त्याने फोने बंद केला.

त्याचा मित्र,..  सध्या तरी त्याला तोच आधार होता त्याचा मित्र शशी! .. शशी फक्त हो म्हणून घरातून निघाला पण त्यालाही तिथे पोहोचायला कमीत कमी ३ साडेतीन तासाचा आवधी होता. तिची मुलं आणि भाऊ मात्र लगेच निघाले. तो गौताम बुद्धाच्या शांततेत बाहेरच्या कोचावर स्थब्ध बसला होता. वरून तो फार फार शांत आणि धीराचा दिसत होता. स्वत:च्या मनालाही तो वारंवार बजावत होता. पण ते काही ऐकतच नव्हते. तो आतून हादरला होता. समोर काय वाढून ठेवलय याची कल्पना त्याला ती पुन्हा भेटली तेव्हाच ५ वर्षांपूर्वीच आली होती. फक्त त्याला समोर जायची वेळ आज आली होती. हे घडणार होतेच हे माहित असले तरीही ते मान्य  करायला त्याचे मन अजिबातच तयार नव्हते. जणू त्याच्या मनाने त्याच्याविरुध्द बंड पुकारलं होतं ,.. ते त्याच्या गतीने मागे - पुढे धावत होत. विचारांचा गोंधळ  उडवून देत होत. ते भूत आणि भविष्यात तळ्यात मळ्यात नाचत होतं आणि त्याचा तो क्षण अधिकच कठीण करत होतं.


डोळे मिटून डोकं मागे टेकून तो भरकटलेल्या मनाला वेसण घालण्याचा प्रयत्न करत होता. पण.. मिटल्या डोळ्यांपुढे जसा अंधार पसरला,,  त्याचे ४०- ४५ वर्षांचे उणे पुरे आयुष्य त्याच्यासमोर चित्रपटासारखे सरकत राहिले. त्याच शहर, त्याच घर, आई पप्पा, केलेली मस्ती, चोरून खाल्लेल्या कैर्या,चिंच,जांभळ,बोरं, मिळालेल्या शिक्षा, आई चा ओरडा बाबांचा मार, त्याचे जीवाभावाचे सवंगडी, शाळेतला ग्रुप, आणि त्यांची शाळा आणि शाळेतली "ती" ... युनीफोर्म मधली, दोन वेण्या आणि रिबीन बांधलेली. अवखळ, स्पष्ट बोलणारी, अल्लड, मस्तीखोर (त्याच्या इतकीच). हुशारीच्या बाबतीत सगळ्यांचा आनंदच होता. पण मस्ती मारामार्या यात एक नंबर!! त्यांचा ग्रुप  खूप खूप चांडाळ होता. शाळेत असताना "ती" त्याची खूप जवळची मैत्रीण होती!. दोघांची छान गट्टी जमायची. भटकताना, खेळताना, ओरडा खाताना सगळ्यातच! शाळेचे अल्लड आणि मस्तीचे दिवस संपले आणि त्यांनी मोरपंखी कोलेज विश्वात प्रवेश केला.शाळेतल्या ह्या back benchers नी शाळेत एक-मेकांचे पकडलेले हात अजूनही हातात घट्ट होते.


"ती" पहिल्या पासूनच बिनधास्त होती. एकदम बिनधास्त, जिद्दी, हट्टी. कॉलेजच्या दिवसांत ती त्याला अधिकच उमगू लागली, समजू लागली, मनात कुठेतरी आवडू लागली. तारुण्यात पदार्पण केलेली त्याची ती बिनधास्त मैत्रीण आता त्याच्या मनात उमटत गेली. वय वाढले तशी समाज वाढली तिची जिद्द,हट्ट,ते मनस्वी वागण त्याला मनात कुठेतरी आवडत होत.ती फक्त कितीही बिनधास्त असली तरी भावनाप्रधान होती,स्वप्नाळू होती, बघितलेली स्वप्न पूर्ण करायला कितीही कष्ट करायची तिची तयारी होती. त्याला नेहमी वाटे ही कशी अशी? एक मुलगी असून इतकी practical , हिम्मतवाली, वेळ पडली तर उसळलेल्या दारीयात मस्तीत फुटणार्या लागेवर उडी घ्यायची तयारी हिची!!. ती नेहमी म्हणायची मला "वार्याच्या वेगाने" जगायला आवडत. मैत्रिणींमध्ये बोलतानाही तिचे स्पष्ट विचार उठून दिसायचे "मला नवरा म्हणून असा माणूस हवा जो माला साथ देईल आणि माझी सोबत त्याला आवडेल, असा मिळाला तर मी त्याला माझ स्वत्व देईन पण माझ्या निष्ठांच    आणि स्वप्नांनच अस्तित्व मात्र त्याने जपल पाहिजे!"


तिच्या बेछूट, स्पष्ट इतरांहून वेगळ्या वागण्यामुळे तो तिला "अनोखी" म्हणत असे. 


                                                                                                         क्रमश:



Saturday 20 August 2011

"अण्णा हाजारे" या नावाबारोबार सध्या जोडलं जातय ते एकाच नाव ते म्हणजे "जन लोकपाल बिल" रोज पेपर मध्ये वेगवेगळ्या उलट्या सुलट्या बातम्या वाचनात येतात. आज काय तर उपोषण , उद्या काय तर rally, मग अण्णांना अटक, त्यांची सुटका, जेल भरो आंदोलन, candle rally नि काय नी काय ...

सगळाच सावळा गोंधळ ! 

सगळ्यात आधी इथे मी एका गोष्ट clear करू इच्छिते ती म्हणजे : माला अण्णानबद्दल  आदर आहे. ते जे काम करतायत ते खचितच विधायक आणि स्तुत्य आहे. त्यांना अटक करण्याचा सरकारने घातलेला घाट हा आतिशय लाजीरवाणा प्रकार असून मी त्याचा निषेधच करते. भ्रष्टाचार ही समाजाला लागलेली कीड आहे आणि वेळीच प्रतिबंध केला गेला नाही तर ती समाज आणि माणुसकी पोखरून टाकल्या शिवाय राहाणार नाही. 

आणि मला ही गोष्ट सुध्धा मान्य आहे की काही कायदे बनण्या आधी आणि बनल्या नंतरही  समाजातील वेगवेगळ्या स्तरातून असे बरेच साद प्रतिसाद उमटले होते. ज्यांचा विचार होऊन काही कायदे modify सुधा करण्यात आले. प्रोटेस्ट करणे, मते मांडणे किंवा भाषणातून स्वत:ला व्यक्त करणे हा व्यक्ती स्वातंत्र्याचा एक भाग आहे आणि यावर कोणीही गदा आणू शकत नाही. ज्या संविधानाने हे व्यक्ती-स्वातंत्र्य दिले त्याच संविधानाने कायदे बनविण्याचा आणि आमलात आणण्याचा अधिकार फक्त आणि फक्त संसदेकडेच विहित केलेला आहे. असे असताना कोण्या एका व्यक्तीच्या मताप्रमाणे (कितीही आदर्श असली तरीही ) किंवा त्याच्या इच्छे खातर किंवा कल्पनांप्रमाणे कायदा बनूच शकत नाही आणि तो तसा बनावा असा अट्टाहास धरणे हे केवळ चुकीचे आहे.

एक देश चालवणे म्हणजे सोप्पी गोष्ट नाही. देशाचा कारभार नीट चालावा यासाठी काही नियम आणि त्यांच्या चौकटी सांभाळणे गरजेचे असते. नियमांच्या चौकटी झुगारून मोठ्ठा जमाव गोळा करून निर्णय घ्यायचे झाले तर ही लोकशाहीची सर्वात मोठ्ठी हार असेल. स्वत:चा मुद्दा मांडणे तो  लोकांपर्यंत पोहोचवणे हा प्रत्येकाचा  अधिकार आहे. आपल्या मागण्या आंदोलना मार्फत जगासमोर ठेवणे त्यातून ते सत्याग्रहाच्या मार्गाने करणे हे निश्चितच चांगले. पण या आंदोलनाला स्वत:च्या मर्यादा असायलाच हव्यात. जर त्या मर्यादा सांभाळल्या नाही गेल्या तर आपल्या देशातली लोकशाही जाऊन जंगलचा कायदा लागू होईल ज्याच्याकडे शक्ती आणि जास्ती पाठींबा त्याचे राज्य. लोकशाहीत शेवटी आपण संख्येला आणि मातांनाच महत्व देतो परंतु जर सगळीकडे हाच नियम वापरायचे ठरले तर हा स्वतंत्र देश चालवणे अशक्य होऊन जाईल. 

आज एक माणूस उभा राहिला निश्च्चीतच त्याची करणे ही योग्य आणि स्तुत्य आहेत पण आज जनमत त्याच्या बाजूने आहे म्हणून त्याच्या मागण्यांना आणि कल्पनांना ( काही अवास्तव आणि बर्याचश्या वास्तव) कायदा बनवून त्याच्या विचारांना संरक्षण देणे कितपत  योग्य ठरेल? याचा एकदा विचार करणे गरजेचे आहे.कारण उद्या जर असाच कोणी दुसरा उभा ठाकला आणि जनमानसाला घेऊन शक्ती प्रदर्शन करू लागला मग? मग तेव्हाही त्याच्या म्हणण्यानुसार संविधानाला बाजूला सारून कायदे केले जाणार काय? आणि तसे घडले तर त्याचे काय परिणाम होतील हेही लक्षात घेणे गरजेचे आहे.  

संसदेत कोण बसतात? आपण निवडून दिलेले प्रतिनिधीच ना? मग ? ते स्वत:चे खिसे भारतात आणि आपल्याला मात्र "as a common man " म्हणून आपल्याच मागण्या त्या प्रतिनिधींनी निदान संसदेच्या समोर ठेवाव्यात म्हणून सत्याग्रह, आंदोलन आणि उपास करावे लागतात?? किती लाजिरवाणी गोष्ट आहे आहे ही!
ज्यांना खरच देशाचे भले व्हावे असे वाटत असेल त्याने "रंग दे बसंती " म्हध्ये म्हटले तसे राजकारणाच्या त्या दलदलीत उतरावे कारण चिखलात उतरल्या शिवाय तो साफ करता येत नाही. नुसत्या प्रकाश फेर्या, आंदोलने,उपास हे उपाय करून भागणार नाही. तर मुळात शिरण्याची गरज आहे. जे नेते सत्याग्रह करू शकतात त्यांनी मिळालेल्या पाठीम्ब्याचा, त्यांच्या मागे उभ्या थकलेल्या जनसमुदायाचा फायदा घेऊन निवडणूक लढून संसदेत जावे जेणेकरून सुशिक्षित प्रतिनिधी म्हणून ते देशाचे कल्याण करू शकतात.

शेवटी एक नमूद करावेसे वाटते ते म्हणजे आण्णांना खूप खूप शुभेच्छा आणि त्याच्या बद्दल माझ्या मनात खूप
खूप आदर आणि आभिमान आहे. पण त्यांच्या मार्ग मला तितकासा पटलेला नाही, कारण, माझ्या मते प्रत्येक प्रश्नांची उत्तरे ही रस्त्यावर उतरून मिळत नसतात.

note : ही माझी वैयक्तिक मते आहेत. कोणी याच्याशी सहमत झालेच पाहिजे असा माझा अट्टाहास नसला तरीही माझा ब्लोग ही माझे मते मांडण्याचे निश्चित योग्य ठिकाण आहे. आणि मी ती स्वच्छ आणि स्पष्ट पाने मांडलेली आहेत.

Monday 1 August 2011

पाऊस (2)


पाउस बोलता बोलता गप्प करणारा 
पाऊस लिहिता लिहिता हात धरणारा.


कधी वाकुल्या दाखवत क्षणात गायब होणारा
पाऊस, आठवणीत दाटणारा 


पाऊस सरींतून बोलणारा 
आठवणीतल्या 'त्या'ला जागविणारा 


पाऊस पुन्हा हळुवार गाणारा
त्या मोरपंखी दिवसांत झुलवणारा


पाऊस बेभान, माळरान भिजवणारा
त्या धुंद आठवणींत चिंब करणारा


पाऊस मध्येच गंभीर होणारा
त्याच्या नसण्याची जाणीव करून देणारा


पाऊस स्वत:च्याच मस्तीत कोसळणारा
माझ्या एकटेपणावर हसणारा


पाऊस बेधुंद बाहेर कोसळणारा
माझ्या मनात आठवणींतून पाझरणारा ...

                                              ... रेश्मा आपटे