Thursday 9 February 2012

" वैसी"

 
घोडा घास से दोस्ती करेगा तो खायेगा क्या?? तू क्यो ऐसे कर राही है?? सोच मत ज्यादा कोर्टसे निकले तो just  cut  U  r  self  off  from the matter and  person !! why you getting senty ????, remember that, u need to react from brain n not at all by heart hope you getting me...." else m sure U'll surely confused and spoil u r personal as well as professional life"

तो म्हणत होता ते  सगळं सगळं खंर होतं. त्याचा शब्द न शब्द खरा होता, पटत होता. पण ती मुलगी ते remand  application आणि तिच्या बहिणीचा आक्रोश काही डोळ्यांसमोरून हालत नव्हतं. तरी माझ्या मित्राला, " u  r  right , i shall  keep it in mind always "  आणि तशीच वागेन असे प्रोमीस केले. त्याला प्रोमीस तर केलं आणि खरंच ठरवलं की, परत ही चूक नाही करायची, फक्त केस म्हणून बघायचं आणि involve नाही व्हायचं असं वेड्यासारख... पण!! ट्रेन सुरु झाली आणि परत एकदा ती मुलगी आठवली मला.. Prostitution , immoral  trafficking  in  woman हा प्रश्न हल्ली जास्तीच sensitive होत चाललाय. तो दलाल १०००% गुन्हेगार असतोच पण ती मुलगी??? तिचं काय??? तिला कायदा victim म्हणतो ... हो ती victimच परिस्थितीची... दुसर्याच्या हव्यासाची? पैशाच्या गरजेची? की तिच्या स्वत:च्या मोहाची? की एका पुरुषाच्या क्षणिक मस्तीची? हा प्रश्नच आहे... पण काही असलं तरी ती खरच victim!!!  

आज पण तिची बहिण मला रडून रडून सांगत होती, माझी बहिण फक्त १६ वर्षांची आहे, ती आताच मुंबईत आलीये, madam तिला बाहेर काढा ..ही बहिण .. वय वर्षे २१ च्या आस पास,..  judges म्हणे या cases मध्ये खूप sensitive असतात आणि म्हणून फक्त २१ वर्षांच्या मुलीच्या हातात victim  ची custody  देण शक्यच नाही .. ती मुलगी वाचली कारण पोलिसांनी धाड टाकली, जर नसती टाकली धाड मग?? आरोपीचा हेतू साध्य झाला असता ( विचार करून सुद्धा काटा आला अंगावर) आणि संपूर्ण आयुष्य फुकट गेल असतं. तिच्या बहिणीपेक्षा म्हणे CWC  वाले तिला सुधारू शकतील, तिची काळजी घेऊ शकतील. तिला reformation ची आणि care ची गरज आहे आणि म्हणून तिचा ताबा CWC  ला देण्यात यावा. आम्ही डोक फोडलं पण मुलीचे आई-वडील आल्या शिवाय तिचं घरी जाणं अशक्यच होतं!!!

तिची बहिण सांगत होती, ती फसलीये.. उसे हम गाव भेज देंगे। उसे छुडालो madam ... तिला समजावून आणि आई वडिलांना घेऊन ये सांगून आम्ही बाहेर पडलो. मग माझी शाळा घेतली माझ्या colleague ने पण प्रश्न नाही न सुटत तिथे,,, पुढे काय? कोणत्याही सुधार गृहात अश्या मुलांना ठेवण किती धोक्याच असतं?? खरच सुधारेल ती?? की "संगती संग दोषेण" म्हणून एक चांगला आंबा बाकीच्यांबरोबर राहून नासेल?? पोलिसांना टीप मिळाली म्हणून तिचं आयुष्य वाचल नाहीतर??  काही  दमड्यानसाठी एक मुलगी चक्क बाजारात विकायला काढली होती. नराधमांच्या हपापलेल्या नजरा आणि दलालांचा पैश्याचा हव्यास यात तिचं तारुण्य, तिचं मनं , भावना त्यांनी ओरबाडल्या असत्या. पुरशांच्या राज्यात त्या शेळीच्या पिल्लाचा नाहक बळी गेला असता. मजबुरी च्या नावाखाली स्वतःचा सौदा होताना बघतात मुली.  एकच सत्य म्हणजे शरीर!! तेच विक्रीला काढतात, पण असा भर बाजारात, लिलाव मांडतात त्यांचा.. तेव्हा .. तेव्हा खरच त्यांच्याकडे परीयायच नसतो; मुळात सगळे रस्ते बंद आहेत म्हटल्यावरच अश्या नराधमांच फावत आणि ते चक्क जिती जागती मुलगी विकण्याचा डाव खेळतात. हा, आता असतील काही मुली ह्या सगळ्याकडे easy  money  म्हणून बघत, काही तर फक्त स्वत:च्या आवाजवी इच्छा आणि so  called  गरजा भागवायला पण ह्यात पडत असतील, मी नाही म्हणत नाही, पण त्या फक्त काही % च उरलेल्यांच काय??? 

१५ मिनिटे, फक्त १५ मिनिटे मला त्या मुलींशी बोलायला मिळाले तिच्या बरोबरची मुलगी चक्क म्हटली madamji अभी आते आते वो औरत बोली ये लडकीया "वैसी " हैं... सच हैं,  मै.. मै तो हुं ऐसी पर " वैसी" बनना किसीकी ख़ुशी नै होती। जब साला बेवडा बाप किसीको बाजार मै बिठाता हैं ना १४ बरस मै तब सिर्फ दर्द समझता हैं। तब किसीको नाही पता होता की वो "वैसी" बनने जा राही हैं। खरच तिचं दु:ख सारे बंध तोडून वाहत होतं पण डोळे कोरडे ठक्क!! एक उपभोगाची वस्तू म्हणून सतत बघितलं गेल्याची सल आणि समाजाकडून हिणवल, नाकारलं गेल्याची जखम खपली फाडून  बाहेर वाहत होती मनाला पीळ पडेल असे जळजळीत सत्य पण ती मात्र कोरडी उभी होती.
तिच्याकडे बघून वाटल ती, मी, ती समोरची judge सगळ्याच स्त्रिया जनमनाच भावनाप्रधान असलेल्या, मग ही इतकी कोरडी कशी? की जोवर बाई " वैसी" होत नाही तोवरच भाव-भावनांचं आवडंबर माजवते ??? की "वैसी" झाल्यावर गमवायला काहीच उरत नाही म्हणून भावनाच मरतात???  शेवटी तीही जिवंत माणूस आहे, स्त्री आहे तिलाही तिचं भाव-विश्व आहेच की!!  हे मला कधीच का नाही उमगल?? ती "वैसी" म्हणून हिणवायचे तरी, नाहीतर सहानुभूती (तीही किलो किलोने ) दाखवत फिरायचे (तेही समाजसेवेचा फार्स म्हणून).. का नाही त्यांना माणूस म्हणून समाजून घेत कोणी??? लहानपणापासून कोरलेले संस्कार.. परिस्थितीला शरण नाही जायचं. चारित्र्य जपायचे.. वैगरे जे पांढरपेशी तत्वज्ञान असते, ते भरल्या पोटी ऐकायला ठीक असते. पण खरंच जेव्हा जन्मदाताचं एखादीला.. त्याच भाषेत सांगायचे तर धंद्याला बसवतो तेव्हा?? जेव्हा त्या अर्धपड्या वयात पोटातली भूक बोलू लागते तेव्हा?? स्वत:चा सौदा मांडला जातो तेव्हा, कसं वाटत असेल त्या मुलीला??? आपण कधीच हा विचार करत नाही. अशी "वैसी" बनलेली स्त्री आणि तिचं अस्तित्व तिच्या समस्या कोण मनापासून समजून घेतं का?? मी तरी कधीच नाही विचार केला आजवर. पण आज करावासा वाटतोय खरंच जे आहे ते हे असे, ती अशी आहे, मग?? what  next ?? पुढे?? तिला सहानुभूती द्यायची फक्त आणि credit  घ्यायचं जसे बरेचदा घडते की तिला संधी द्यायची ?? तिचं ऐकायचे, समजून घ्यायचं नी सहानुभूती न देता तिला हिम्मत द्यायची?? पुनश्च सुरुवात करायला प्रवृत्त करायचं??? 

जिला हात हवा, तिला हात देऊन त्या दलदलीतून बाहेर काढून, मोकळा श्वास घ्यायला मदत करायची! असा 
निश्चय झाला. त्या कळीला उमलण्या आधीच, असे कोमेजून नाही द्यायचे. पण हे खरच जमेल मला? ठरलं... बाकीच्यांचं माहीत नाही पण जी हातात आहे, तिच्यासाठी काहीतरी करायचेच, मनात गाठ मारली. हा विषय आणि समस्या खूप क्लिष्ट आहेत, नाजूक आहे हा विषय!! पण विचार करायलाच हवा निदान तिच्या साठीतरी!! प्रचंड राग आणि ता मुलीसाठी काहीही न करू शकल्यामुळे आलेली अस्वस्थता सावरून, आवरून घेऊन आणि विचार "नाही" करायचा अजून असे ठरवून मी ट्रेन मधून उतरले. घरी आले तो माझ्या बेडरूम मधलं चिऊच घरटं!! आज रिकाम वाटलं, म्हणून जरा डोकावून बघते तो काय?? पिल्लं उडून घरटा ओस पडलेला. माझ्यासाठी नेहमीच अप्रूप असलेलं आणि गवत, कापूस, चार काटक्यांनी सजवून सुध्धा सजीव भासणार ते घरटं भकास, उजाड दिसत होतं. ते घरटं पाहून आज खूपच अस्वस्थ वाटलं मला!!! सहज मनात आलं, त्या मुलीच्या घरच्यांना जेव्हा हे सगळं कळेल तेव्हा??? तिच्या आईच ते निगुतीन मांडलेल चार भिंतीत वसलेलं 'घरटं' ते पण असच क्षणात भकास आणि उजाड  होऊन जाईल न???? ...


                                                                                        ... रेश्मा आपटे