Saturday 27 August 2011

अनोखी (भाग ४)

तो war front वर होता. युद्धाची सुरुवात नव्हती अजून पण चिन्ह दिसत होती. संपूर्ण तयारीत ते सगळे बोर्डरवर होते. असह्य, अनिश्चित वातावरण कधी काय होईल सांगता येत नाही, होईलच याचा नेम नाही. छोट्या छोट्या गावातील ते गावकरी त्यांची आयुष्य वाचवण, त्याना घर-दार सोडून बोर्डर पासून लांब जायला तयार कारण,त्याचं संरक्षण करणं, डोळ्यात तेल घालून रात्रीचा दिवस करून ती अनिश्चितता, ती घुसमट तो इतरांच्या बरोबरीने मनाचा तोल ढळू न देता सहन करत होता. तिची पत्रं वारंवार वाचत होता. तिला उत्तर लिहित होता पण ती पोस्ट करायची राहून जात होती. तिची पत्र मात्र न चुकता येत होती. ते शेवटल पत्र आलं,.. नेहमीच्याच उत्साहाने त्याने ते पत्र उघडल. त्याचं energy ड्रिंक, त्याचं optimism याचं राजं असलेलं ते पत्रं. !! हावरटासारख ते पत्र त्यानं फोडलं. सुंदर मोत्यासारख वळणदार अक्षरात " प्रिय फौजी" ,.. परिचित सुरुवात. तो खूप सुखावला नेहमीसारखाच!!  पण पुढचा फक्त अर्ध्यापानाचा मजकूर २-३ वेळा वाचूनही त्याच्या मेंदूत शिरेच ना!!!
 तो त्या पत्राकडे फक्त बघत राहिला. त्याच्या कपाळाची शीर ताणली गेली, चेहरा विचित्र झाला, तो सुन्न पणे जागीच थिजला. त्याचा front वरचा जिवलग मित्र 'सुलेमान'ने असा विचित्र अवतार पाहून त्याला विचारलं "क्या हुआ भाई?" तो काही बोलणार तोच एका हल्ल्याची बातमी कानावर आली. अनोखी , त्याचं दु:ख त्याने तात्पुरतं त्या कागदाच्या घडीत बांधल आणि तो कागद खिशात कोंबत तो उठला.

सुलेमान!!  त्याच्या आठवणीने त्याचा गळा दाटून आला... पण भाभिजान च्या दुख:पेक्षाही आज त्याच्याच   दुख:चं पारडं त्याला जड वाटत होतं. त्या दिवशी अनोखीच ते अनोख पत्रं खिशात कोंबून ते दोघे धावले, अतिरेक्यांशी झालेल्या चकमकीत सर्व ५ अतिरेकी ठार झाले तर एक .. फक्त एकच जवान कामी आल!!. संपूर्ण देशाला त्यांचा अभिमान वाटला. फक्त एक जवान !! फक्त ??? त्या विचार सरशी तो दुखावला ऐन तारुण्यात   स्वत:च्या नवजात अर्भकाला न बघता त्याचा सुलेमान ... त्याचा सुलेमान त्याच्याच देशात तुम्ही लोक म्हणून त्याला परकं करणार्या देशवासीयांसाठी प्राण पणाने लढत शेवटी अल्लाला प्यारा झाला,... तो फक्त एक जवान??? ,.. त्याला खूप चीड आली त्याने तो दुख:चा कड मोठ्या शरतीने परतवला. तेव्हा परतवलेला ना?? अगदी तसाच.  त्याच मनं आत आत अंतर्मनात त्याच दुख: कैद करतं होतं. आणि तो कोरड्या डोळ्यांनी कुराण आणि पत्रं पहात होता. सुलेमान गेल्यावर तो दुख: 'व्यक्त' न करता पिऊन टाकायला शिकला. "गम में रम " असं सुलेमान का म्हणायचा त्याचं गमक त्याने त्याच्या परीने जाणलं तेव्हा!! त्याच्या मनाचा ताण सहन न होऊन त्याचे डोळे पुन्हा अलगद बंद झाले. परत तो नकोसा अंधार... त्यात वर्ष मास पुढे सरकात होते. तो ते सगळं जगला होता, यावरच विश्वास नव्हता. एक नकोसा उलटा प्रवास,... पण ते थांबवणही नव्हतं त्याच्या हातात.

त्याला शशीच्या पत्रातून कळलं अनोखीच. त्याच्या अनोखीच ..  लग्न झालं. त्याच उरल-सुरलं अवसान तेव्हा गळून पडलं. पण .. हारून चालणारच नव्हत!! थांबून आयुष्य थांबत नाही.तिच्या लग्नानंतर ३ महिन्यातच सगळीकडे शांतता झाली. आणि त्याला सुट्टी मिळाली. एकदा वाटलं जाऊच नये पण.. तो घरी परत आला. सगळ्याना भेटला, "तिला" ही!! तिला संसारात रमलेली पाहून सुखावला आणि दुखावलाही.!! ती सेक्रेटरी बनली होती. नवर्याची नाही हा.. जोब करत होती. स्मार्ट आणि चक्क सुंदर दिसत होती.  तो पुन्हा कामावर रुजू झाला तेव्हा त्याला पटले. की पाटी कोरी झालीये, पुनश्च श्री गणेशा करायला हवा. शमाने सांगितल्याप्रमाणे दुख: होणार पण इथवर त्याचा पहिला कड ओसरला असेल आणि आता पुन्हा भावनांच्या हाताचं खेळण बनण्यापुर्वीच त्यांचा तो अगम्य आणि प्रचंड पसारा आवरलाच पाहिजे होता.

त्याने ठरवले परत डाव मांडायचा!! मग काय त्याने ४-५ वेळा मग प्रेमात पडण्याचे असफल प्रयत्न केले. म्हणजे त्याला कोणी नाही म्हणाली नाही tall dark handsome कबिल होता अनोखीचा फौजी !! पण सगळेच वेळी तो प्रेमात जोरदार आपटला. "प्रेमात करणे ला प्रेमात पडणे का म्हणतात या अनोखीच्या प्रश्नच उत्तर त्याला त्याच्याच ४-५ प्रेम कहाण्या आठवल्यावर मिळालं. तो याही परिस्थितील पडणे .. आपटणे या शब्दांवर हसला. मग स्वत:ला अजून एक संधी देत त्याने लग्नाचाही घाट घातला. पण ते लग्न म्हणजे एक चुकलेला डाव होता. त्यांच्या विस्कटलेल्या संसारात त्यांची चिमुरडी मात्र काहीच चूक नसताना भरडली गेली. तिची आठवण झाली... त्याला वाटलं आता धीर सुटणार, त्याला घाम फुटला त्याचा ..त्याचा तोल जाऊ लागला पण तेव्हाद्यातच शमा चा फोन आला. शमा शशीची बायको... पण त्या आधी त्यांची आणि अनोखीची बाल मैत्रीण!! त्या दोघाना सावरणारी.वेळ पडली तर रागावणारी... शमा!! तो वाचला त्याच्या मनाच्या कोपर्यात कोंडलेली ती अपराधी भावना उचंबळून येता येता तशीच आत कोंडली गेली. मनाचे दरवाजे घट्ट घट्ट मिटून. आत कोंडून गेली.

तो त्याच्या उमेदीची संपूर्ण १८ वर्ष देशाला बहाल करून परत आला.!!! कारण त्याच्या दृष्टीने पुन्हा नव्याने, नव्या नियमांनी आणि हिमतीने डाव मांडायची गरज होती. परत येऊन आई कडे लक्ष देत तिच्यासाठी जगायला त्याने सुरुवात केली. एक नोकरी पत्करली वेळ जायचं साधन आणि हाती चार पैसेही येणार होते.
आई-पप्पा , शशी-शमा त्यांची लेक, अजय,विशाल त्यांची बायका-मुलं असं ओढ लावणार एक विश्व पुन्हा बनल त्याच. त्यांची सुख-दुख: आपली म्हणत तो हसू आणि रडू लागला. सगळं तसं बरच चाललं होतं!!! तो ह्या आयुष्यात रमाला होता. त्याच मन जरा तळ्यावर आलं होतं. पण नियतीला त्याच आयुष्य सरळ आणि त्याच्या मर्जीने चालणं म्हणजे बहुदा तिचा अपमान वाटत असावा. पूर्व जन्मीचा तिचा गुन्हेगार असल्यासारखी ती त्याला हवं तेव्हा हवं तसं फेकत होती. परत आल्यावर वर्षाचा अवधी गेला असेल नसेल.. त्याला सुमी भेटली बस मध्ये. सुमी ,.. अनोखीची मागची बहिण ..

                                                                                                         क्रमश:

1 comment:

  1. वाचतोय. रोचक आहे. कथानक काय वळण घेईल याचा अंदाज लागता लागत नाहीये. मस्तच.

    ReplyDelete