Sunday 23 August 2020

गणपती बाप्पा मोरया

गणपती बाप्पा मोरया. 
बाप्पा.. मला कळायला लागल्यापासून बाप्पा हा माझा जिव्हाळ्याचा विषय ( सगळ्यांचा असेल म्हणा). तर गणपती चे हे दिवस सणापेक्ष जास्ती नवचेतना, उत्साह आणि आनंदाची पेरणी करण्याचे असतात. बाप्पा जसा पहावा लोभस, गोड आणि गोजिराच दिसतो. त्याच्याशी असलेलं नातं अनामिक, न समजावता येणारं तरी मनात खोल रुजलेलं आहे. 

बरं हा आवडायला भाविक, धार्मिक किंवा आस्तिक असायची गरज नाही फक्त निरागसता आणि सौंदर्य बघायची क्षमता असली की भरतोच हा मनात. 

जितके वेळा पाहू प्रेमात पडतो त्याच्या. यंदा मार्च पासून इतकं शांत आणि बिनघोर कधी वाटलंच नाही जितकं आता वाटतंय. याच्या आगमनाची चाहूल लागली आणि निमिशात विश्वास, उत्साह आणि आशा (hope) सचेतन झाली. भीती, अस्थिरता, दुःख, वेदना, कोरोना महावारीने आलेली मरगळ या परिस्थितीत चेतनेची आणि विश्वासाची फुंकर घातली ती बाप्पाच्या आगमनाने आणि दर्शनमात्रे कामना पूर्ती ची प्रचिती अली. 

बाप्पाचं शक्ती, बुद्धी,प्रेम, प्रेरणा, विश्वास, नीती, सखा, सांगाती. 
आणि तोच चेतना. 

टिप: 
मानसिक शांतता जरूर मिळलीये या दोन दिवसात. पण म्हणून विसर्जनाला गर्दी करून हेल्थ वोरीयर्स ची चिंता आणि विघ्न न वाढवण्याची बुध्दी ही यानेच दिलीये आणि म्हणून  विसर्जन घरात कुंडीतच करणार



Monday 13 July 2020

लॉक डाऊन : अनिश्चिततेतील निश्चित क्षण

सकाळ झाली.
माणूस नावाच यंत्र फिरू लागलं.
सरावाचे आवाज गजर, गिझर, मिक्सर, फोडणी, मोबाईलची रिंग,आवरा चा ओरडा, पाण्याची धार, डब्याची झाकण, उकळणार्या चहाचा वास. दूधवाला, पेपरवाला, घंटा गाडी, बाईक, रिक्षा, स्कुल बस, मुलांचा कलकलाट, बसचा हॉर्न, ब्रेक, ट्रेन ची धडधड
दिवस संपला.
माणूस यंत्रातील इंधन जरा कमी झाले.
घर नावाच्या भिंतीत पोचला. परत आवाज बायको, मुलं, आई बाबा, भांडी, कटकट, टीव्ही ची बोंबाबोंब, मोबाईलची रिंग, बातम्यांचा आणि बातमीदारांचा कंठशोश .
अंथरूण नावाच्या चार्जर वर अंग टेकल्यावर हाडांची कडकड.
आणि निरव शांततेत झोपेच्या आधीन व्हायच्या आधी येतो तो सर्वात भयानक आतला आवाज.
का कश्यासाठी असे प्रश्न. पण सारवलेला माणूस.. सरावानेच तो आवाज दाबला जातो. मग झोप, रात्रीच्या गर्भात विरघळून जातो तो. सकाळच्या निश्चित चाकोरीसाठी.
आणि एक दिवस, अचानक त्या देशाचे पंतप्रधान एका अपत्तीशी झुंजण्यासाठी चाकोरीला ब्रेक लावतात. इतका बाका प्रसंग की पूर्ण देश बंद(लॉक डाऊन).
माणूस यंत्र परत पळत सुटतं.
पुन्हा: आवाज टिव्ही चा, फोन चा, रांगा लावा ची ओरड, धान्याच्या ऑर्डर चा आवाज.
आणि मग एक शांतता.
एक दोन आठवडे आरामाचे जातात. मग सधन वर्गात अन्नपूर्णा संचारते. विविध पदार्थ बनतात. आणि हातावर पोट असलेला वर्ग उद्याच्या अन्नाच्या बाबतीत साशंक होऊ लागतो.
आवाज सुरूच असतात. आकडे शेअर मार्केट चे, वाढत्या रुग्णांमचे, लॉक डाऊन च्या उरलेल्या दिवसांचे. माणूस यंत्र गडबडून जातं. भिषण सवयीची नसलेली अनिश्चितता आणि पंढपेशी माणूस यंत्र आतून हलायला लागतं.
यंत्राला भावना दाटून येऊ लागतात. सवयच नसते आपल्या माणसात रमयची घरात बसायची.
खाऊ पिऊ ची मज्जा संपत जाते आणि 50% तरी पगार पुढल्या महिन्यात होईल का अशी भीती वर डोकं काढते.
चिंता, काळजी, निराशा, कंटाळा यात या माणूस यंत्राला जिवंतपणाची जाग येते. गरजांचं प्रमाण व्यस्त असलं तर कमी पैशात आपल्या माणसाच्या उबेत जगता येते असा साक्षात्कार होतो.
रोज रात्री झोपताना सरावाने दाबून टाकलेला तो आवाज ऐकायचं भान येतं. आपल्या आजूबाजूला, सूर्य पक्ष्यांच्या किलबिलाटात उगवतो. पक्षी, पाखरं झाडं सुरेल संगीत गुफतात हे नव्याने लक्षात येते. घर नावाच्या भिंतीना घरपण येऊ लागते. आणि धीर येतो माणूस यंत्राला माणूस म्हणून स्वतःशी संवाद साधायचा.
सुरू होतो एक नवा प्रवास.
अनिश्चीततेने शिकवलेला निश्चित क्षणात जगायचा प्रवास.

Saturday 11 July 2020

लॉक डाऊन डायरीज

खूप प्रेम करून लग्न केलं तिने. लग्न ठरलं, ते दोघे भेटत राहिले रुसवे फुगवे ते मनवण यातला रोमान्स कधी त्याला उकललाच नाही. कळली ती चिडचिड! त्याच ठरलेलं होत हे योग्य ते अयोग्य. तिच्यापेक्षा खूपसा वेगळा रोमान्सशी  फारसा संबंध नसलेला ' तो ' तिला आवडला. फार क्लिअर वाटायचा तो तिला. 

तिला बोलायला खूप आवडायचं त्याला अवडीचंच बोललेलं आवडायचं. ती वाहत होती तिच्या मनातल्या त्याच्या प्रतिमेत तो अलिप्त होता बहुतेक. 

ती स्वतःला स्मार्ट म्हणायची, समाजाच्या योग्य आयोग्यतेची गणित तिला फार जमायची. कुठे हसायचं, कुठे हटकायच, कुठे भांडायचे अन कुठे एक पाऊल पुढे तर कधी एक पाऊल मागे टाकायचं हे तिला बरोबबर उमगायच. नाती त्यामुळे फुलतात हा तिचा अनुभव होता.

ते दोघे भेटत राहिले. ती स्वप्नात आणि तो भविष्यात जगायचा. त्याचे ते प्लॅन्स ऐकून ती भारावून जायची. तारुण्याची उमेदीची वर्ष त्यांनी एकत्र घालविली, म्हणजे लग्न संस्कार? की सोहळा? काय तो करून एका पवित्र बंधनात दोघे  एकत्र आले की बांधले गेले समाजाच्या चौकटीत? 

ते काही असो, तर ती दोघे लग्न करून एक सुखद संसाराची स्वप्ने पहात एकत्र नंदू लागली. ती रुळत होती, शिकत होती सासू सासरे, दीर, नणंदा अशी नवी नाती स्वीकारायला,  या नंतर आपसूक येणाऱ्या जबाबदाऱ्या पेलायला. ती खुलत होती,  शोधत होती तिच्या मनातल्या प्रतिमेत त्याला...

काही दिवस, महिनेही नाही गेले आणि तणावाने आधी बेडरूम मग घर आणि मग मनं ओतप्रोत भरली. आधी लग्नास योग्य असलेली ती त्याला असमंजस, त्याला त्रास द्यायला लग्न करून आलेली खलनायक वाटायला लागली. तिची कथा काही निराळी नव्हती तिलाही तो रुक्ष आणि स्वमग्न वाटायला लागला. त्यात भर म्हणजे सासर आपलं मानून सगळं करत असूनही बेजबाबदार पणाचं लेबल तिच्या माथी चिकटलच.

हळू हळू बोलण्याची भांडण झाली. अबोला नव्हता पण एक घुसमट होती. नात्यात एक दुरावा पसरत होता. वाद नको म्हणून सो कॉल्ड सोडून दिलेल्या गोष्टी मनात साचत रहायच्या.  एकमेकांना सोडायची हिम्मत नव्हती किंवा नात फरफटत न्यायची सवय झालेली काही असेल पण ते एकत्र राहिले.

 आजारपणात साथ, गरजेला हात मिळत होता पण मनं मात्र कोरडीच होती कित्येक वर्ष्यापासून. भांडून चिडून कंटाळून काही विषय कायमचे बंद झाले ते मॅच्युरिटी च्या गोड लेबल खाली  मिरवले. वरवर प्रगल्भ वाटणार नातं आतून पोकळ आहे, हे फक्त त्याच दोघांना माहीत होते आणि त्या दिखाव्याच्या आत सोसलेले एकटेपण आज त्यांना सलत होतं.
मोकळं व्हायचं होत त्यांना. २ वर्ष्यापासून प्रयत्न करत होते वेगळं होण्याचा पण पंढपेशी मन धजत नव्हते.  गुंता फार वाढत होता.

अशात मग सक्तीची बंदी आली. मुलगा घरी येऊ शकत नव्हता आणि हे कुठे जाऊ शकत नव्हते. कित्येक वर्ष  एकमेकांच्या नसण्याची सवय असलेल्या या दोघांना 2 आठवड्यानंतर एकमेकांशी बोलावेच लागले आणि आश्चर्य म्हणजे या समांतर जगणाऱ्या जीवांना एकमेकांशी भांडत भांडत मग बोलताही आले.

5 आठवड्यांनंतर  गुंता सुटला, पण वेगळे न होण्याच्या निर्णयावर. नव्याने ते दोन जीव उतार वयात एकमेकांना भेटले होते. अधिक पोक्त अधिक विचारी बनून.

 6 व्या आठवड्यात त्यांच्या लग्नाला 33 वर्षे पूर्ण होतील.

म्हणजे त्याचा anniversary cake खयला काही मला जाता येणार नाही पण निदान लॉक डाऊन संपल्यावर यांच्या बरोबर कोर्टात मात्र जावे लागणार नाही हे निश्चित.

लॉक डाऊन चा positive effect 

टीप: हे माझे नातलग लागत नाहीत त्यामुळे कोण ग असे पर्सनल वर विचारू नका. फक्त खूप नकारात्मक वातावरणात एक पोसिटीव्ह गोष्ट अनुभवली ती लिहावीशी वाटली म्हणून हा लेख प्रपंच

.... रेश्मा आपटे

Monday 19 November 2018


नन्ही मुन्नी सोनी बच्ची ,
डरी सहमी  एक परी
मीठी बोली सुन्दर हसी
उसकी हर रीत न्यारी

गुम सुम गुम सुम
होठ गुलाबी पाले चुप्पी
छोटी छोटी नयना भूरी
करे दिल की बात सारी

खिलखिलाती चहकती
माँ  पापाकी की दुलारी
प्रेम भक्ति का संगम न्यारा
नानी की तो जीवन धरा

घी मख्खन बिना ना न्याहारी
दादा दादीकी ये लाडली
ग़ुस्से से कभी गाल फुलाई
दिदीकी  गुड़िया प्यारी












Wednesday 19 September 2018


नसती का रे मिटली भांडणं 
थोड्या गोडी गुलाबीने?
नसतं का टिकलं नातं 
दोघांच्या समजुतीने?

तुझ्या जागी तू बरोबर होतास, 
माझ्या जागी मी चुकीची नव्हते ,
भांडणं होती, तक्रारी होत्या, 
रुसवे फुगवेही अविरत होते,

पटत नव्हता पूर्ण माणूस 
की मुद्दा होता खटकत?
खदखदत राहिलो आतून
केली विचारांची गल्लत   

चूक बरोबर ठरवताना मात्र 
सगळं काही गुंतत गेलं 
अहंकार सुखावत होता पण 
नातं मात्र संपत गेलं. 

खूप खूप आलोय दूर 
बघूया सामोरे जाऊन या  प्रश्नांना 
ओळखून एकमेकांचा नूर 
जपता येतंय का काही क्षणांना ?



                                                                              ... रेश्मा आपटे 


हातात वाफाळलेल्या कॉफीचा कप घेऊन ती नुकतीच बाल्कनीत अली. झोपाळ्यावर निवांत टेकत असतानाच वातावरणात भरून राहिलेल्या मातीच्या गंधाने तिला गुंग केलं.  तिने कॉफीचा पहिला घोट घेतला आणि धुंद हवेत मन बेधुंद झालं.



कॉफीची चव जिभेवरून तरंगत तिच्या जाणिवेत उतरली आणि पावसाची रिमझिम जणू डोळ्यात साठली. कॉफी त्याला फारशी कधीच आवडली नाही पण तिला खूप आवडायची,10 वर्ष चहा करूनही तिला एक कप चहाचा अंदाज कधी जमलाच नाही मग उरला म्हणून, कधी तो ऐनवेळी नको म्हणाला म्हणून चहाची ओळख झाली आणि कॉफी जराशी मागे पडली पण कॉफी प्रेम ते मात्र तसच अबाधित राहिलं. दोघांनी भेटून विचार करून लग्न केलं एकमेकांचं वेगळेपण समजून आयुष्याकडून एकमेकांच्या अपेक्षा जाणून ते एकत्र आले. लग्नानंतर मात्र कसं कोण जाणे दोघांमध्ये दरी निर्माण झाली. एकमेकांकडून असलेल्या अपेक्षांमध्ये प्रेम हळू हळू घुसमटायला लागलं. त्याच तसं असणंं तीच तसं नसणं महत्वाचं वाटायला लागलं आणि खटके उडायला लागले. मोठ्यांच्या म्हणण्याप्रमाणे नातं मुरलं की लोणच्याच्या फोडींसारखं मऊ होतं.

तिने वाट पहायची ठरवलं. तिचं त्याच्यावर अवलंबून असणं त्याला आधी सुखावून जायचं पण नंतर हेच खटकायला लागलं. बँक, बाजारहाट, घरातली काम याचबरोबर हळू हळू बल्ब बदलणे, इलेक्ट्रिशन ला बोलावणे, प्लमबर ची काम, ही मनात नसताना तिने स्वतःवर घेतली. यात स्री किंवा पुरुष हा भेद नव्हता तर आईकडे ही काम तिचे बाबा करायचे हा साधा हिशोब होता.
त्याचा डबा,आवडी निवडी, मूड, त्यांच्या पध्धती, स्वतःचं करियर सांभाळत त्याला खूष ठेवणं तिला कधी जमलंच नाही. नातं जपण्याचा ती आटोकाट प्रयत्न करत होती. काही वर्षांपासून ती त्याला सांगत होती, मला इतकं स्वावलंबी करू नकोस की माणसं नकोशी होतील उत्तराखातर, तुझी डिपेंडंसी मला जॉब सुध्दा शांतपणे करू देत नाही म्हणून तो फक्त चिडायचा.

चिडला की ओरडायचा, ती कशी काहीच करू शकत नाही आणि त्याला कशी टेंशन निभावावी लागतात यावरून खूप बोलायचा. ती खूप भांडली की सोडून जाईन निघून जाईन म्हणायची आणि तो चिडून, “बघ तुला काय करायचं ते” इतकच बोलायचा. जायची सोय नव्हती अस नाही पण मुलं संसार आणि तो तिला हवा होता. ती चिडायची रडायची आणि धमक्या द्यायची तिच्या सोडून जाण्याच्या पोकळ धमक्यांचा आता त्याच्यावर अजिबात परिणाम होतं नव्हता. रात्री भयंकर संतापलेला तो सकाळी काही घडलंच नाही असं वागायचा. चिडलो तर चिडलो त्यात काय इतकं अस म्हणायचा त्याचा मूड छान असला की त्याला तिनं हसायला हवं असायचं, त्याचा मूड खराब असला की तिने शांत बसून ऐकणं अपेक्षित असायचं अश्या वेळी ती माणूस आहे तिच्या मनात काही खदखदत असतं, तिला काही वाटतंय का? कामाचे व्याप आहेत का असले साधे विचारही त्याच्या मनाला शिवायचे नाहीत आणि मग तिच्या अपेक्षा आणि त्याच्या अपेक्षा एकमेकांना भिडायच्या आणि त्यातून सरावाचा वादंग उठायचा.

बोलून चिपड झालेल्या विषयांना परत परत गुर्हाळातून फिरवलं जायचं. मनं विरहित दोन शरीर फक्त सवय म्हणून जवळ यायची ती अधीरता त्यांच्या नकळत लुप्त पावली होती.
आणि आता तर काय सवय म्हणून सुद्धा जवळ येणं थांबलं होतं. एका छताखाली दोन दमलेले ओळख असूनही परके जीव प्रचंड मानसिक दबावाखाली रात्रीच्या कुशीत शिरत होते. पण संसार आणि मुलं हा हव्यास तिला सोडता येत नव्हता. नाही राहायचं तर जा सोडून हा मिजास पण तीच स्वत्व जगवू शकत नव्हता.

आणि मग तो दिवस उजाडला. नेहमीसारख शुल्लक गोष्टीने सुरू झालेलं भांडण पहिल्या वर्षी पासून खटकलेल्या मुद्यांनी भारदस्त बनलं आणि त्याने जा हवं तर म्हणताच ती शांतपणे उठली रात्री 2 वाजता बॅग भरली आणि निघाली. त्याचा विश्वास होता ती माहेरी जाईल आणि ८ दिवसांनी परत येईल पण तीच ठरलं होतं. ती निघाली! भरल्या घरावरून भिरभिरती नजर स्थिर करत त्याला म्हणाली,”हो मी करतेय मला हवे ते आणि इथून पुढे कोणी जा नाही म्हणू शकणार असं छत मी माझ्यासाठी बनवेंन.” ती त्यांची शेवटची भेट.

अंगावर उडणाऱ्या मुसळधार पावसाच्या तुषारांनी ती भानावर अली. तिच्या फसलेल्या संसाराच्या विचारात कॉफी थंड झाली होती.  कॉफीचा कप मायक्रो मध्ये ठेवला आणि स्वतःशी हसली. खरच मुलं असती तर तो संसार खेचत राहावं लागलं असतं. देवाला काळजी. आता त्यांच्यात खरच कोणताच दुवा नव्हता. त्यामुळे त्या रात्री नंतर त्याच्या कोणत्याही शपथा, अमिश, कबुली तिला थांबवू शकले नाहीत. त्याच्या आठवणीने आज तिच्या मनात कसलेच तरंग उठले नाहीत आणि ती विचारात पडली.

त्या रात्रीला आता पूर्ण 4 वर्ष झाली होती. पाहिलं वाहील स्वतः च घरं! ती आज तिच्या हक्काच्या घरात निवांत बसली होती.पुन्हा गॅलरीत येऊन तिने तिच्यासाठी केलेल्या त्या कॉफी चा एक घोट घेतला. तो कडवट, स्ट्रॉंग गंध आणि चव जिभेवर पसरली आणि मनाने 4 वर्षांच्या अविरत प्रयत्नांसाठी स्वतःलाच शाबासकी दिली.  तिच्या मनात खूप कोलाहल मजला होता. प्रचंड राग मनात घेऊन ती त्या रात्री बाहेर पडली होती. स्वतःच हक्कच घर झाल्यावर ती त्याला मुद्दाम फोन करून सांगणार होती. तुझ्यावाचून काहीच अडलं नाही माझं असं ठणकावून सांगून मन मोकळं करणार होती. पण ती कटुता गढूळपणा तळाशी जाऊन आज मन शांत होत. ती आता स्वतंत्र होती. पण एकटी. याच एकटेपणाला घाबरत ती नमतं घेतं होती. पण जेव्हा अती झालं तेव्हा तिने स्वतःचा मार्ग निवडला. ४ वर्ष स्वतःला सिध्ध करण्यात गेली. नोकरी मिळाली, स्वतःची कार झाली, आणि मुंबई सारख्या ठिकाणी स्वतःच घरं. अगदी ध्रुव बाळासारखं अढळ पद मिळाल्याचा आनंद झाला तिला. तिच्या आई बाबाना तिचा अभिमान वाटला.

त्या रात्री जे ठरवून बाहेर पडली ते करायला पूर्ण ४ वर्ष लागली. तिला वाटलं तिच्या जगण्याचा ड्रायविंग फोर्स हा तिचा त्याच्यावरचा राग आहे. त्याला दाखवून देण्यासाठी ती सगळी ताकद एकवटून ४ वर्ष झटली होती, आपसूचक तिच्या मनात विचार आला, तो द्वेष उरलाच नाही. मग आता पुढे? जगायला एक जीवनशक्ती लागते. पुढे जायला काहीतरी ध्येय लागते आता काय? या प्रश्नासरशी ती खिन्न झाली.

वाऱ्याच्या एका झुळकीने ती भानावर अली. कॉफी चा शेवटचा घोट घेतला आणि तिच्या मनात विचार आला, १० वर्ष संसाराला देऊन मग गुंत्यातून मोकळं झाल्यावर आता संसार नवरा नको पण ४ वर्ष्याच्या खडतर आयुष्यात दडपून टाकलेली तिची मातृत्वाची ओढ? आज तिन्हीसांजेला तिला अशांत करत होती. तिला तिचं ध्येय सापडलं सिंगल मदर!

ती लगबगीने उठली आणि त्याच रात्री अडॉप्शन हा ऑपशन तिने मनोमन स्वीकारला. तिला तिचा ड्रायव्हिंग फोर्स मिळाला होता आणि दोन एकट्या जीवांना एकमेकांची साथ लाभणार होती.


... रेश्मा आपटे



Thursday 26 July 2018

Soulmates 4

भाग 4
ओंकारने त्याच्या खांद्यावर हात ठेवला., "मित्रा माझं चुकलं रे. तुमचं नातं नाही समजलं मला तेव्हा. आणि तू ती फोन वर असं काही बोलली म्हणालास मग माझाही गोंधळ उडाला, मला तेव्हा कळलेलं तुमचं नातं बरोबर होतं की त्या दिवशी पूर्वा आणि तिने उलगडलं ते? तुमच्या सारखी शब्दांशीवायची भाषा मला नाही कळत, पण आज तुला बोलायला मित्राची गरज आहे हे समजून तुला इथे बोलावलं, १६ वर्ष्यांपुर्वी जिथे तुमच्या नात्याचं तत्वज्ञान 'ती" ने पहिल्यांदा आपल्याला दिलं तिथे."

मी: तिच्या मनात कसलाच गोंधळ नव्हता. भावनांचा पूर, कल्लोळ यातून होणारी दमछाक, चिडचिड नव्हती. स्वच्छंदी आहे ती, पण बेदरकार नाही. मगाशी म्हटलं तस मी असेन तसा पळत येईन पण ती, ज्या परिस्थितीत जे लागेल ते माझ्यासाठी समोर ठेवेल. विचारांची स्पष्टता आणि वागण्या बोलण्यातला सुसंगतपणा ह्याचमुळे मी तिच्यात गुंतत गेलो. जेव्हा जेव्हा गोंधळलो, नात्यात गल्लत होईल असं वाटलं तेव्हा तेव्हा तिने रास्ता दाखवला. ती आणि मी वेगळे नाही एकच आहोत. शारिरीक आकर्षणापलीकडे आम्ही संवेदनेच्या एका वेगळ्याच स्तरावर एकमेकांचे आणि एकमेकांसाठी आहोत हे तिनेच मला शिकवले. फक्त बायको नाही तर मुलं , बॉस आणि माझे वडील इतकंच काय तर तू सुद्धा सगळ्यांना भावनिक पातळीवर समजून घ्यायला तिने मला शिकवलं."

मी पुन्हा चुकतोय रे तिला समजून घ्यायला. हो तिच्यातला एक कोपरा माझा होता नाही आहेच. मला आधाराचा खांदा म्हणून बघतेय ती? कमिटमेंट द्यायची कटकट नाही म्हणून आत्ता व्यक्त होतेय? हे खरं नाहींये ओम्या, परत मनाचा गोंधळ गल्लत करतोय"

" तुला जे वाटतं ते बोल, ती च्या बद्दल तू कधीच काही बोलला नाहीस आज १६ वर्ष्यात पहिल्यांदा तू शब्दात मांडतोयस सगळं. मी तुला जज नाही करते,मित्रा तुही नको करुस. मोकळा हो." ओंकार म्हणाला.

मी: "पण मग ती असं का बोलली फोन वर? आत्ता काय झालं? व्यक्त व्हायचंय तिला? आत्ता ? आयुष्याच्या या वळणावर? माझे विचार स्वछ आणि स्पष्ट करून तिला पुन्हा मला गोंधळात का टाकायचय? भेटायला येऊ का तर स्पष्ट नाही म्हणाली. पहिल्यांदा नाही म्हणाली भेटायला. फक्त ऐक म्हणाली. खरं सांगू तिने माझ्यासाठी सगळं केलं इतकंच राहील होतं. ते शब्द माझ्या मनात तरंगत पोहोचले पहिल्या पावसात मातीचा गंध दरवळावा तसे दरवळे शरीर आणि मन भर. शरीर आणि मन हलकं हलकं झालं. तिचा फोन लागत नव्हता मग तुला फोन केला. "

तेव्हढ्यात ओमी चा फोन वाजला.
आणि ती समोर आली. माझ्या जवळ, खूप जवळ आणि पुन्हा बोलली जे काल फोन वर बोलली., "माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर. व्यक्त करायची माझी भाषा तुला समजली की नाही माहित नाही, पण गेली खूप वर्ष तुला हे शब्द मझ्याकडून ऐकायचे होते हे मला माहित आहे. म्हणून फोन चा खटाटोप."

मी संमोहीत झाल्यासारखा तिच्याकडे पाहत होतो. पुढे ती काहीच बोलली नाही. डोळ्यातून वाहत राहिली. पण तिचे डोळे! हे काय? अग ऐक कुठे चाललीस? मला हलताच येत नाहीये. ओम्या तिला थांबव. ती चाललीये ओमी! ओमी! मी आकांताने ओरडलो.

ओमी धावत आला. मला म्हणाला, " मित्रा we lost her. ती गेली"
" अरे मी तेच सांगतोय ती चाललीये ती बघ, समोर तिला थांबव माझ्यासाठी. ओमी मला बोलायचंय. मी तिच्यावर खूप... .
ओमीने मला घट्ट मिठी मारली आणि खूप रडला. माझ्या जाणिवाच गोठल्या जणू. मी हललो नाही रडलो नाही.
ओमीचे शब्द कानावर पडत होते पण डोक्यात जात नव्हते. मी कोसळलो.

चार दिवसांनी जेव्हा जाग अली तेव्हा ओमी आणि पूर्वा भेटायला आले होते. तेव्हा समजलं, तिने त्या दिवशी 3 फोन केले. मला, पूर्वाला आणि डॉक्टरला. त्यानंतर ती ऍडमिट होती. आणि मला दिसली ( ओम्याच्या म्हणण्या प्रमाने भासली) त्या वेळी ती या जगातून गेली. माझ्या नातेवाईकांना माझं ब्लड प्रेशर वाढलं म्हणून ऍडमिट केल्याचं सांगण्यात आलं.

माझं मन सुन्न होतं. जाताना पूर्वा हळूच कुजबुजली." relation and person may or may not be around but she has filled your being with immense love.
ती गेली प्रेमाचा अखंड झरा मागे ठेवून."