Tuesday 6 September 2011


अनोखी ( भाग ५)

अनोखीची मागची बहिण सुमी!!!..तिने दादा म्हणून हाक मारली नसती आणि स्वताची ओळख पटवून दिली नसती तर ती बाजूला बसलेली मध्यम वयीन निटनेटकी बाई म्हणजे,,काही वर्षांपूर्वीची परकर-पोलक्यातली गोरी माऊ सुमी हे स्वप्नात सुध्धा त्याला वाटण अशक्य होतं. ती तोंडभरून हसली उणी-पुरी २०-२५ मिनिटे त्याच्या बाजूला बसली असेल ती. पण त्याला सुन्न करून गेली. ती उतरून गेली त्याला कोड्यात टाकून, काही वर्षे त्याला मागे ढकलून. ,...

तिचे शब्द त्याला आठवत होते. .."दादा, खूप चिडला असशील ना रे आम्हा सगळ्यांवर, मी सुधा गुन्हेगार आहे तुमची. तिच्यावर अविश्वास दाखवून, आमच्या सुखा खातर आम्ही तिला लग्नासाठी हो म्हणायला भाग पाडलं. ती चिडली, भांडली, रडली जे शक्य ते सारकाही केलं तिने स्वत:च म्हणण घराच्या मोठ्यांना पटवण्यासाठी!! पण नाही जमल तिला. तू जवळ असतास तर कदाचित काही होऊ शकाल असतं पण तू तू नव्हतास रे... तिने विशू दादाला सांगून तुला ट्रंक call सुध्धा करायचा प्रयत्न केला. पण नाही जमलं त्याला!! त्याच्या प्रामाणिक प्रयत्नांकडे न पहातच ताईन त्याला जन्माचा गुन्हेगार ठरवून टाकला...२ वर्ष खिंड लढवली तिने एकटीने.. शेवटी माझं कारण सांगून भगदाड पडलं बघ  आणि तिला लग्नासाठी होकार द्यायला भाग पडलं दादानं!! तुला चिडून तिरमिरीत एक पत्र लिहिलं "..हरली तुझी अनोखी म्हणून.." तिला वाटत होतं तू येशील. तिला हारू नाही देणार तू पण तू नाही आलास. जेव्हा आलास तेव्हा किती सहज तिच्या हसर्या मुखवट्यावर विश्वास ठेवून परतलास रे ?? कसा रे कसा??? हेकट, संशयी, हट्टी नवरा, पदरात तीन मुलं, नोकरीची गरज, तिथल्या जबाबदार्या ताप आणि घराचा मनस्ताप ... आयुष्याचीच होळी झाली रे दादा तिच्या!! तुला दोष नाही देत पण तुझ्याशी बोलून जरा हलक वाटलं कारण तिच्या आयुष्यात तिचे असे दोघाच होतो ना आपण? "
          ती उतरून गेली,.. तिची वाक्य घोळत राहिली त्याच्या डोक्यात, मनात.. तिच्या आयुष्याची होळी झाली ... होळी, होळी .. त्या आगीत होरपळत मात्र तो राहिला. ...

तो उगीचच जागेवरून उठला आणि फेर्या मारू लागला. जणू सुमी त्याला कालच भेटली होती आणि तिच्या शब्दांनी तो अस्वस्थ झाला होता. चूक-बरोबर, खर-खोट, का, कसं? जणू प्रश्नांनी त्याला घेरल आताच... तेव्हा सारखं. तो जड,अस्वस्थ,गोंधळलेल्या मन:स्थितीत परत आला. शशी,शमा,विशाल,अजय,आई-पप्पा सगळ्यांना घडलेला प्रकार त्याने सांगितला. पुढे काय??सगळ्यांच्या समोर मोठ्ठा प्रश्न उभा राहिला? आता काय? नेहमी प्रमाणे सगळे शामाकडे पाहू लागले.ती स्पष्ट आणि शांत पण हुकमी स्वरात म्हणाली "समांतर रस्ते जोडायला जाऊ नका. जे झालं ते दुर्दैवी होतं. पण तुझं तिच्या आयुष्यात परत जाणं म्हणजे तिच्या ठिगळं लावण्याच्या प्रयत्नांना फाडून आत शिरण ठरेल. तर सध्या तरी शांत रहा." पण ..त्याचं मन काही शांत होत नव्हत. त्याने वेगवेगळ्या sources ने तिची माहिती काढणे सुरु केले.  त्याला कळल की त्याचा त्रास असह्य होऊन ती वेगळी राहातेय.पोरं तिच्या आईकडे आणि होस्टेल वर अशी असतात.मग न राहून तो तिला भेटला. संपूर्णपणे थकलेली, पोक्त, अशक्त, पण 'मानी',... "अनोखी"  खूप वर्षांनी भेटला तिला. काही मिनिटांचीच भेट पण दोघांचीही आयुष्य घुसळली गेली. डचमळलेल्या भावना दुख: शांतच होईनात!!!

तिचा नवरा गेला तेव्हा तिला आधार द्यायला तिचे नातेवाईक आणि मित्र मंडळी होती. तो त्यादिवशी तिला भेटला पण मग त्याने तिला भेटायचं टाळलं मुद्दाम!! तिला भेटण टाळायच नेमक कारणं काय  त्याला तिची दुख: पहावणार नाहीत म्हणून? की समाज? की आणखी काही??? हे तो आताही सांगू शकत नव्हता.
आणि कितीही झाल, कितीही वाटलं तरी तिचं एक छोटसं विश्व होतं. त्यात तिची 3 मुलं होती. पण जेव्हा त्याला कळलं की तिला hepatitis B आहे आणि त्याला उपाय नाहीत. लिव्हर संपूर्णपणे damage झालीये. ती फक्त काही दिवसांची किंवा फार-फारतर वर्षाची सोबती आहे. त्याने जगातल्या कोणाचीही पर्वा केली नाही. तो तडक जाऊन तिच्या समोर उभा होता. त्याच टेचात त्याच घुश्यात जसा मिलीतरीत जाण्या आधी असायचा तसाच!!.सुरुवातीला ती आवघडली.पण तिच्याकडे परीयायाच नव्हता.जेव्हा डोक्टरांनीही सांगितले होते की आता काहीच होऊ शकत नाही. त्याने तिला काहीच बोलू न देता चेक अप्स करायला भाग पडले.खूप प्रयत्न केले.पैसा गेल्याच दुख: नव्हत पण लांब का असेना पण ती जगायला हवी होती त्याला. blood transmission सुधा आता अशक्य होतं.


तेव्हा तिला शांतपणे भेटायची गरज त्याला वाटू लागली. शेवटच बोलायचं होतं.. मग तो तिला भेटेल अशी एकच हक्काची जागा आता शिल्लक होती. शशी नि शमा च घरं!! त्यांनीही परवानगी दिली. त्याने ठरवलंच होतं सगळं सगळं बोलून टाकायचं कोणत्याही मुखवट्याला भुलायचे नाही.एक तर भळभळणारी जखम वाहती होईल नाहीतर खपली तरी धरेल तिच्यावर!!काळ उंबर्यापलीकडे उभा आहे हा शेवटचा मोका म्हटल्यावर तीही बोलली ..भरभरून बोलली मोकळी मोकळी होतं.तिच्या अंगावरले सिगारेट्स चे डाग स्वत:च खूप बोलके होते.पण मुलाबद्दल ऐकून त्याच काळीज हलल.२-३ दा भेटल्यावर त्यांनी एकत्र रहाण्याचा निर्णय सगळ्यांसमोर जाहीर केला.अपेक्षेप्रमाणे तिचे नातेवाईक तयार झाले कारण आता आजारी बाई करणार कोण? वेळ,पैसा आहे कोणाकडे? हे प्रश्न होतेच. मुलांनी थोडा वेळ घेतला पण मग काकाला accept केले. शेवटी तीही तिचीच मुलं प्रक्टीकॅल !!! की स्वार्थी परस्पर जबाबदारी घेणारं कोणी भेटलं मग मोठेपणाने परमिशन देणारी स्वार्थी तिच्या नावार्यासारखी. काही का असेना पण शेवटी ते दोघे एकत्र आले.

                                                                                                              क्रमश:

1 comment: