Showing posts with label मनातलं काही. Show all posts
Showing posts with label मनातलं काही. Show all posts

Friday, 17 August 2012

नकुशा


पत्रकारिता आणि पत्रकार यांच्याबद्दल मला नेहमीच आकर्षण वाटत आलय. त्यामुळे जेव्हा आणि जिथे संधी मिळेल तिथे मला पत्रकारांशी संवाद साधायला आवडतो. अशीच एक पत्रकार मुंबईच्या मध्य रेल्वे मध्ये हल्लीतच भेटली. खरतर संध्याकाळच्या वेळी शांतपणे झोपून किंवा फारतर गाणी ऐकत किंवा पुस्तक चाळत प्रवास कारण मला खूप आवडत. आणि मी तेच करत होते; हातातलं व. पुं. च पुस्तक चाळत स्वस्थ प्रवास करत होते. तितक्यात दादरला चढलेल्या प्रचंड गर्दीतून एक कॅमेरा आता आला, आला कसला पडलाच तो! त्यामागून चित्र विचित्र आवाज आणि धडपडतच एक २५-२७ वर्षांची सबला नारी आत आली: मध्य रेल्वे, गर्दी आणि दादरच्या डोंबारणीना (तिच्या शब्दात दादरच्या बायका). {म्हणा खरच आहे ते डोंबारी करत नसतील असल्या कसरती करत चढतात संध्याकाळच्या दादरवरून चढणार्या बायका आणि प्रवासही करतात अश्याच कसरती करत}  इंग्रजाळलेल्या मराठीत शिव्या हासडत आणि त्या कॅमेराला सावरत ती एकदाची आत आली. { प्रचंड गर्दीचा फायदा हिला कळलेलाच नाही, तिच्या धारातीर्थी पडणार्या कॅमेराला खाली पडू न देता त्या अपर दयाळू गर्दीने खांद्यावर, मांडीवर झेलल होतं. :D :D ] असो. तिला तिचा कॅमेरा सुस्थितीत मिळाल्यावर मात्र ती जरा शांत झाली. कुर्ला येईपर्यंत आजू-बाजूच्यांशी संवादही साधू लागली. तेव्हा कळल की ती सबला नारी freelancing journalist होती. 

मग माझ कुतूहल जाग झालं आणि बोलता बोलता तिच्या कॅमेरात एका "गोजीरी"शी ओळख झाली. तिच्या कॅमेरात एक विडीओ होता. ज्याची सुरुवात त्या गोजीरीच्या गोंडस आणि लोभस चेहऱ्याने होत होती. मी पटकन म्हटलं किती गोंडस पिल्लू आहे मस्त. खिन्न हसून ती मला म्हणे पूर्ण पहा की, माझ्या हृदयाच्या खूप जवळचा आहे पण तुला म्हणून दाखवते पहा पहा. समजून घेशील तर खूप काही असेल नाही तर माझ्या आयुष्यातलं पाहिलं प्रोजेक्ट आणि तू एक मुलगी म्हणून पहा. त्या सुंदर गोंडस चेहऱ्याच्या मागे आवाज मधाळ बोबडा गोड आवाज. " माझ नाव नकुशा" त्या गोजिर्या चेहऱ्याच नाव नकुशा? माझ्या भुवया उंचावल्या, ती माझ्याकडे अर्थपूर्ण पहात होती. " लेक वाचवा आंदोलन ( save girl child )आणि त्याचे यश" , अमीर खान च्या 'सत्यमेव जयाते'चे पडसात आणि डॉ. चौघुले फरार या सार्यांचे साद-पडसात अश्या अनुशंगाच्या च्या काही प्रौढ आवाजातल्या ओळी आणि पुन्हा तोच लोभस निरागस चेहेरा, पण आता निर्विकार, भावना विरहीत डोळ्यात दडलेली ती बहुप्रश्नांकीत नजर काळजाला हात घालत होती! परत तोच आवाज आणि  पुढे असेच काही चेहेरे निरागस, कोवळे, मग थोडे समंजस, काही तरुण, काही सोशिक, काही गोरे, काही काळे, सगळ्यात साम्य एकाच हरवलेली आणि ना-उमेद नजर! एक छोटा विडीओ संपला. हातात कॅमेरा तसाच पकडून मी फक्त तिच्याकडे पाहिलं ती सांगत होती," आपण कोणालातरी आवडत नाही ही भावना सहन होण्याच्या पलीकडची आणि त्यात ह्या अश्या कितीतरी मुली अजून खेड्यात अश्या नकोश्या असण्याच्या भावनेने  आणि आई-वडिलांवर भार ह्या शब्दांनी दुखावलेल्या अवस्थेत दडपून  जगत आहेत. महाराष्ट्राची लेक म्हणून जन्माला यायची शिक्षा भोगत. त्यात भर म्हणून त्याचं नावच "नकुशा" ठेवण्यात येतं. म्हणजे जेव्हा जेव्हा नाव घेतलं जाईल तेव्हा तेव्हा त्या नकोश्या आहेत ही जाणीव त्यांना करून दिली जाते. महाराष्ट्रातल्या खेड्या पाड्यात हे सर्रास चालत पण हा विडीओ आहे नवी-मुंबई मधला: वाशीचा!". ऐकून हैराण झाले मी. 

त्या मागोमाग तिने अजून एक विडीओ दाखवला. त्यात एक जन-जागृती आंदोलनातील स्वयंसेविका पोट-तिडकीने त्या झोपडपट्टीतल्या बायकाना समजावत होती. पहिली बेटी धनाची पेटी : एक मुलगी दोन घर सुशिक्षित करते, सुसंस्कारीत  करते. ' आजची मुलगी उद्याची माता आहे तिच्याशीवाय हे जग पुढे कस जाईल?  तुमचा वंश पुढे कसा जायचा? मुलगा बदलतो लग्नानंतर पण मुलगी नाही, तिच आई वडिलांच सगळ करते.. वैगरे वैगरे" ( तिचे ते सोपे आणि परखड स्पष्ट विचार ऐकून फार बर वाटत होतं )  तेव्हढ्यात एक साठीची आजी उठली, " ये बये बंद कर तुझी बडबड. चांगल-चुंगल नेसून आणि पॉटभर खौंशानी शानपन शिकीवतेस ?? कशाला ग हवीये मुलगी? खायला कहार आन आईशिला भार. नौ नाहीनं पौटात वागवायची आणि बाहीर आल्यावर द्यायची सोडून सर्वांची बोलणी खायला? की बाजारात बसवायला त्याच शंढांची पौट भराला? दिसभर राबा, आधी लेक म्हणून, मग घरवाली म्हणून मग आय म्हणून ऐका. पोरीला जनलीस तर तिथून ऐका मग तिच लगीन त्यापरीस हुंडा जमवा. बोल की." ती स्वयंसेविकाही कसलेली, " आजी तुही एक बाईच आहेस की, हेच सगळ थांबवायचं म्हणून तिला जन्माला घाला. अरे एक वेळ अशी येईल की मुलांना मुलगीच मिळणार नाही. जो पोरगा हवा ना त्याच्याच पाशी संपेल तुमच सगळ. तिला वाढवा मुलगी म्हणून प्रेमाने जवळ करा. तिला ओळख करून द्या ती ताकदवान असल्याची. मुल (son  or  boy) जन्म्लाला घालण्याच म्हशीन नव्हे.
तेव्हड्यात एक तरुण मुलगी नाही बाई उठली जवळ जवळ अंगावर खेसकली, ' कसली गो ताकद कुठूनशान येते गो? अर्ध्यापोटी दारुडा बाप चोपतो तेव्हा की घरवाला रात्र रात्र जागवतो तेव्हा? त्याच्या हाताची एक थप्पड पुरेशी होते त्वोंड गप करायला. तुम्हासनी काय जात सांगाया? लेक हवी म्हण कशाला? फक्त पोर जनायला? की घरावाल्याच्या राती सजवायला की त्याचे रट्टे झेलायला?" जोर-जोरात रडत ती सांगत होती," सत्ताईस वरीस लागल मला आता 3 पोरींची आय हाय मी धा वर्साची मोठी पॉर आता घर्वाल्याच्या डोळ्यात खुपतेय पहा म्हणे, पैका कमवायचं वय हाय तीच! बोल न कशी वाचवू म्या तिला वंगाळ नजरे पासून? इकली न्हाय तर हुंडा कुटून आणू? पैका नाय तर लगीन कोण करल ??  त्यापरीस एक पोरगा असता तर काळजी बी नाय, नी बोलणी बी नाय. माजी कूस भरून पावली असती बघ पोरीच्या काळजीन जीव तुटतो निस्ता."

त्या मागेच एका विडीओ मध्ये एक double  M  A  in psychology  मुलगी सुन्न होऊन पहात होती. रडून रडून आटलेल्या डोळ्यांतून पाण्याच्या अपेक्षेत होती. आणि बोलत होती: तिचा प्रियकर, त्याच्याशी लग्नासाठी सोडलेलं घर, त्याचं उच्चभ्रू वस्तीतल घर, गलेलठ्ठ पगार आणि संकुचित विचारसरणी.. त्याच्या आई-वडिलांच्या नातवाचा अट्टाहास आणि त्याचा  मुलगाच पाहिजे म्हणून असलेला अनाठाई हट्ट.. तिच्या मनाविरुध्ध केलेली गर्भजल परीक्षा आणि जबरदस्तीने गेलेले 3 गर्भपात. मग हट्टाने झगडून मुलीला दिलेला जन्म. बाळाच्या जन्मानंतर सगळ ठीक झाल याचा आनंद आणि तिच्या बाळाच  बारसं :) :) :) ..
आणि विडीओ च्या शेवटी एक गुलाबाच फुल त्या खाली ओळी : हिची एकाच चूक मुलीला जन्म दिला तिच्या अस्तित्वासाठी झगडली आणि तीच नाव ऐकून स्वत:च हरवून गेली. खाली त्या एम ए च नाव कै. _____ .

हा विडीओ संपेपर्यंत ठाणे जवळ आलं होतं, तशी जाता-जाता म्हटली खूप विचलित झालीस न हे पाहून हे वाचून? आहेच हे इतक भयंकर आणि मी उठवणारे आवाज या विरुध्ध. कारण मला न्याय द्यायचाय माझ्या मास्टर्स दीला आणि तिच्या गोंडस गोजिरीला. आणि म्हणून मी इतका खटाटोप करतेय ती "नकुशा" नाहीये ती  "गोजिरी" आहे... ती गोजिरी आहे.. माझ्या दीची "गोजिरी"!

ऐकून माझी गात्र सुन्न झाली ठाणे ते डोंबिवली मी या धक्यातून सावरणे शक्यच नव्हते. यंत्रवत उठले आणि चालत राहिले. घरी आले मनाच्या कप्प्यात ते गोजिर रूप कैद करून टाकल, वाटल विसरले पण छे. आज इतक्या महिन्यां नंतरही  ते पहिल्या विडीओ मधलं लोभस निरागस रुपडं आणि सासरच्यांनी मुलीला ठेवलेलं  "नकुशा" हे नाव ऐकून आणि हरून संपून गेलेली "ती" अबला काही डोक्यातून जात नाहीयेत. मागच्या काही दिवसांपासून वेळेअभावी लिखाण जरी बंद असल तरी "ती" सबला आणि तिच्या कॅमेरात चित्रबद्ध झालेली ती: अबला आणि  "नकुशा" नव्हे "गोजिरी" डोक्यातून काही जात नव्हत्या. अशा नाकुशांसाठीच्या भावना डोळ्यांतून सांडल्या तरी मनातून काही केल्या हलत नव्हत्या म्हणून आज कागदावर उतरवण्याचा हा घाट!   

                                                                                                 ... रेश्मा आपटे 

Thursday, 9 February 2012

" वैसी"

 
घोडा घास से दोस्ती करेगा तो खायेगा क्या?? तू क्यो ऐसे कर राही है?? सोच मत ज्यादा कोर्टसे निकले तो just  cut  U  r  self  off  from the matter and  person !! why you getting senty ????, remember that, u need to react from brain n not at all by heart hope you getting me...." else m sure U'll surely confused and spoil u r personal as well as professional life"

तो म्हणत होता ते  सगळं सगळं खंर होतं. त्याचा शब्द न शब्द खरा होता, पटत होता. पण ती मुलगी ते remand  application आणि तिच्या बहिणीचा आक्रोश काही डोळ्यांसमोरून हालत नव्हतं. तरी माझ्या मित्राला, " u  r  right , i shall  keep it in mind always "  आणि तशीच वागेन असे प्रोमीस केले. त्याला प्रोमीस तर केलं आणि खरंच ठरवलं की, परत ही चूक नाही करायची, फक्त केस म्हणून बघायचं आणि involve नाही व्हायचं असं वेड्यासारख... पण!! ट्रेन सुरु झाली आणि परत एकदा ती मुलगी आठवली मला.. Prostitution , immoral  trafficking  in  woman हा प्रश्न हल्ली जास्तीच sensitive होत चाललाय. तो दलाल १०००% गुन्हेगार असतोच पण ती मुलगी??? तिचं काय??? तिला कायदा victim म्हणतो ... हो ती victimच परिस्थितीची... दुसर्याच्या हव्यासाची? पैशाच्या गरजेची? की तिच्या स्वत:च्या मोहाची? की एका पुरुषाच्या क्षणिक मस्तीची? हा प्रश्नच आहे... पण काही असलं तरी ती खरच victim!!!  

आज पण तिची बहिण मला रडून रडून सांगत होती, माझी बहिण फक्त १६ वर्षांची आहे, ती आताच मुंबईत आलीये, madam तिला बाहेर काढा ..ही बहिण .. वय वर्षे २१ च्या आस पास,..  judges म्हणे या cases मध्ये खूप sensitive असतात आणि म्हणून फक्त २१ वर्षांच्या मुलीच्या हातात victim  ची custody  देण शक्यच नाही .. ती मुलगी वाचली कारण पोलिसांनी धाड टाकली, जर नसती टाकली धाड मग?? आरोपीचा हेतू साध्य झाला असता ( विचार करून सुद्धा काटा आला अंगावर) आणि संपूर्ण आयुष्य फुकट गेल असतं. तिच्या बहिणीपेक्षा म्हणे CWC  वाले तिला सुधारू शकतील, तिची काळजी घेऊ शकतील. तिला reformation ची आणि care ची गरज आहे आणि म्हणून तिचा ताबा CWC  ला देण्यात यावा. आम्ही डोक फोडलं पण मुलीचे आई-वडील आल्या शिवाय तिचं घरी जाणं अशक्यच होतं!!!

तिची बहिण सांगत होती, ती फसलीये.. उसे हम गाव भेज देंगे। उसे छुडालो madam ... तिला समजावून आणि आई वडिलांना घेऊन ये सांगून आम्ही बाहेर पडलो. मग माझी शाळा घेतली माझ्या colleague ने पण प्रश्न नाही न सुटत तिथे,,, पुढे काय? कोणत्याही सुधार गृहात अश्या मुलांना ठेवण किती धोक्याच असतं?? खरच सुधारेल ती?? की "संगती संग दोषेण" म्हणून एक चांगला आंबा बाकीच्यांबरोबर राहून नासेल?? पोलिसांना टीप मिळाली म्हणून तिचं आयुष्य वाचल नाहीतर??  काही  दमड्यानसाठी एक मुलगी चक्क बाजारात विकायला काढली होती. नराधमांच्या हपापलेल्या नजरा आणि दलालांचा पैश्याचा हव्यास यात तिचं तारुण्य, तिचं मनं , भावना त्यांनी ओरबाडल्या असत्या. पुरशांच्या राज्यात त्या शेळीच्या पिल्लाचा नाहक बळी गेला असता. मजबुरी च्या नावाखाली स्वतःचा सौदा होताना बघतात मुली.  एकच सत्य म्हणजे शरीर!! तेच विक्रीला काढतात, पण असा भर बाजारात, लिलाव मांडतात त्यांचा.. तेव्हा .. तेव्हा खरच त्यांच्याकडे परीयायच नसतो; मुळात सगळे रस्ते बंद आहेत म्हटल्यावरच अश्या नराधमांच फावत आणि ते चक्क जिती जागती मुलगी विकण्याचा डाव खेळतात. हा, आता असतील काही मुली ह्या सगळ्याकडे easy  money  म्हणून बघत, काही तर फक्त स्वत:च्या आवाजवी इच्छा आणि so  called  गरजा भागवायला पण ह्यात पडत असतील, मी नाही म्हणत नाही, पण त्या फक्त काही % च उरलेल्यांच काय??? 

१५ मिनिटे, फक्त १५ मिनिटे मला त्या मुलींशी बोलायला मिळाले तिच्या बरोबरची मुलगी चक्क म्हटली madamji अभी आते आते वो औरत बोली ये लडकीया "वैसी " हैं... सच हैं,  मै.. मै तो हुं ऐसी पर " वैसी" बनना किसीकी ख़ुशी नै होती। जब साला बेवडा बाप किसीको बाजार मै बिठाता हैं ना १४ बरस मै तब सिर्फ दर्द समझता हैं। तब किसीको नाही पता होता की वो "वैसी" बनने जा राही हैं। खरच तिचं दु:ख सारे बंध तोडून वाहत होतं पण डोळे कोरडे ठक्क!! एक उपभोगाची वस्तू म्हणून सतत बघितलं गेल्याची सल आणि समाजाकडून हिणवल, नाकारलं गेल्याची जखम खपली फाडून  बाहेर वाहत होती मनाला पीळ पडेल असे जळजळीत सत्य पण ती मात्र कोरडी उभी होती.
तिच्याकडे बघून वाटल ती, मी, ती समोरची judge सगळ्याच स्त्रिया जनमनाच भावनाप्रधान असलेल्या, मग ही इतकी कोरडी कशी? की जोवर बाई " वैसी" होत नाही तोवरच भाव-भावनांचं आवडंबर माजवते ??? की "वैसी" झाल्यावर गमवायला काहीच उरत नाही म्हणून भावनाच मरतात???  शेवटी तीही जिवंत माणूस आहे, स्त्री आहे तिलाही तिचं भाव-विश्व आहेच की!!  हे मला कधीच का नाही उमगल?? ती "वैसी" म्हणून हिणवायचे तरी, नाहीतर सहानुभूती (तीही किलो किलोने ) दाखवत फिरायचे (तेही समाजसेवेचा फार्स म्हणून).. का नाही त्यांना माणूस म्हणून समाजून घेत कोणी??? लहानपणापासून कोरलेले संस्कार.. परिस्थितीला शरण नाही जायचं. चारित्र्य जपायचे.. वैगरे जे पांढरपेशी तत्वज्ञान असते, ते भरल्या पोटी ऐकायला ठीक असते. पण खरंच जेव्हा जन्मदाताचं एखादीला.. त्याच भाषेत सांगायचे तर धंद्याला बसवतो तेव्हा?? जेव्हा त्या अर्धपड्या वयात पोटातली भूक बोलू लागते तेव्हा?? स्वत:चा सौदा मांडला जातो तेव्हा, कसं वाटत असेल त्या मुलीला??? आपण कधीच हा विचार करत नाही. अशी "वैसी" बनलेली स्त्री आणि तिचं अस्तित्व तिच्या समस्या कोण मनापासून समजून घेतं का?? मी तरी कधीच नाही विचार केला आजवर. पण आज करावासा वाटतोय खरंच जे आहे ते हे असे, ती अशी आहे, मग?? what  next ?? पुढे?? तिला सहानुभूती द्यायची फक्त आणि credit  घ्यायचं जसे बरेचदा घडते की तिला संधी द्यायची ?? तिचं ऐकायचे, समजून घ्यायचं नी सहानुभूती न देता तिला हिम्मत द्यायची?? पुनश्च सुरुवात करायला प्रवृत्त करायचं??? 

जिला हात हवा, तिला हात देऊन त्या दलदलीतून बाहेर काढून, मोकळा श्वास घ्यायला मदत करायची! असा 
निश्चय झाला. त्या कळीला उमलण्या आधीच, असे कोमेजून नाही द्यायचे. पण हे खरच जमेल मला? ठरलं... बाकीच्यांचं माहीत नाही पण जी हातात आहे, तिच्यासाठी काहीतरी करायचेच, मनात गाठ मारली. हा विषय आणि समस्या खूप क्लिष्ट आहेत, नाजूक आहे हा विषय!! पण विचार करायलाच हवा निदान तिच्या साठीतरी!! प्रचंड राग आणि ता मुलीसाठी काहीही न करू शकल्यामुळे आलेली अस्वस्थता सावरून, आवरून घेऊन आणि विचार "नाही" करायचा अजून असे ठरवून मी ट्रेन मधून उतरले. घरी आले तो माझ्या बेडरूम मधलं चिऊच घरटं!! आज रिकाम वाटलं, म्हणून जरा डोकावून बघते तो काय?? पिल्लं उडून घरटा ओस पडलेला. माझ्यासाठी नेहमीच अप्रूप असलेलं आणि गवत, कापूस, चार काटक्यांनी सजवून सुध्धा सजीव भासणार ते घरटं भकास, उजाड दिसत होतं. ते घरटं पाहून आज खूपच अस्वस्थ वाटलं मला!!! सहज मनात आलं, त्या मुलीच्या घरच्यांना जेव्हा हे सगळं कळेल तेव्हा??? तिच्या आईच ते निगुतीन मांडलेल चार भिंतीत वसलेलं 'घरटं' ते पण असच क्षणात भकास आणि उजाड  होऊन जाईल न???? ...


                                                                                        ... रेश्मा आपटे 

Friday, 30 December 2011

मावळतीचा सूर्य

संध्याकाळी ५ ची वेळ  ...
अविरत वाहणारा तो सागर, दगडांवर आपटून फुटणार्या लाटा, सूर्यप्रकाशाने चमचमणार पाणी जणू समुद्रभर पसरलेली चांदीच!! आणि तो सुर्यगोल दाह न देणारा पण तेज:पुंज्य!! हळू हळू प्रखर प्रकाश मंद मंद करत, स्वत:बरोबर आकाशभर लाली पसरवणार ते सूर्यबिंब मावळतीकडे झुकलेलं!! संध्येच्या सुखद मिठीत शिरणारा तो निसर्ग आणि पश्चिमेच्या क्षितिजावर विसावताना प्रकाशाचा स्त्रोत हलक्या हाताने झाकणारी ती सुंदर संध्या :) अहाहा ... लालसर, केशरी, पिवळे रंग कोण्या चित्रकाराने कॅव्हासवर पसरावे असे सुंदर सजलेले आकाश ,, आणि ,, आणि अवकाशातील त्या रंगात रंगलेला तो जलाशय जणू ती अद्भुत रंगांची डबी हिंदकळून रंग सांडावेत आणि पाण्यावर ते सारे पसरावेत असा नजारा !!.. आणि समुद्रात उठणार्या लाटांवर हेलकावणारे ते केशरी-लाल सूर्यबिंब !!! मंद मंद थंड हावा आणि कृत्रिम दिव्यांनी झगमगणारा तो किनारा!! हे वर्णन ऐकून  कोण्या शांत सुंदर ठिकाणचा सूर्यास्त वाटावा पण .., पण हे वर्णन आहे मुंबईच्या सूर्यास्ताचं आणि जागा ,,, marine  drives ...

गजबजलेली मुंबई.. चाकरमान्याची घराकडे पळण्याची तयारी. taxi  पासून ते फोर्ड, Mercedes  एक ना अनेक महागड्या गाड्यांचा मुंबईच्या रस्त्यांवरचा "स्पीड"  !! घाई, गर्दी आणि स्पीड मुंबईची ओळख. marine drives  चे ते कट्टे... त्यांच्या एका बाजूला तुफान वेगात चाललेली आयुष्ये सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत कामांना जुंपलेले मुंबईकर आणि दुसरीकडे अथांग समुद्र .. दोन्ही कडे गती..  किनर्‍या लगतच्या मोठमोठाल्या इमारती, हॉटेल्स त्याचे डोळे दिपवणारे झगमगाट आणि दुसरीकडे मास्तीत  गरजणारा समुद्र!!
marine  drives  चा हा किनारा न जाणे किती वर्षे हे अनुभवतोय??? आकाशातले सूर्याचे खेळ, लाटांचे आवाज, पाणी, चंद्राच्या कला, रात्रीचे टिपूर चांदणे आणि दुसरीकडे उन्मत्त वेग!! एकीकडे शांत आणि सुरेख निसर्ग सूर्यास्ताच्या देखाव्याने आणि रंगानी न्हालेला समुद्र, थंड मोकळा वारा आणि दुसरीकडे तुफान वेगात धावणाऱ्या गाड्या, नुकत नुकत सुरु होणार मुंबईच night  life आणि मायानगरीतल एक सत्य "पैसा बोलता है| " पण किती करंटे आपण?? हे आयुष्य जगणारे, त्या कट्ट्याना रोज पहाणारे मुंबईकर, ते मात्र त्या कट्ट्याच्या अल्याडचे आणि पल्याडचे अशी दोन्ही दृश्ये एकत्र पाहू आणि अनुभवू शकत नाहीत कारण एकाकडे पाठ फिरवल्याशिवाय दुरसे मुळात दिसतच नाही!! आणि marine drives  चा कट्टा तो... संपूर्ण गजबजाटात राहून  "स्थितप्रज्ञ " !!!

अरबी समुद्र!! शाळेत पाठ केलेला, न्यूज पेपर्स मध्ये वाचलेला, TV  वर पाहिलेला आणि प्रत्यक्षात रोजच दिसणारा..तो समुद्र !! असंख्य सूर्योदय आणि सूर्यास्त बघितलेला, पावसाळ्यात उसळणारा आणि ओहोटीला शांतपणे मागे मागे सरणारा तो मुंबईचा समुद्र... असंख्य माणसे,गजबजाट, भांडण, प्रेम, हासू तर कधी आसू पाहणारा आणि  किनर्‍यावर मायानगरीचा झगमगाट वागवणारा आणि तरीही मस्तीत गरजणारा तो अरबी  समुद्र !! तिन्ही त्रिकाळ बारा महिने मुंबापुरीला सोबत करणारा.. सकाळच्या सूर्याबरोबर खुलणारा, माध्यान्हीला तापणारा, संध्याकाळी मुंबापुरीचे चे रुपडे खुलवणारा, वातावरण फुलकीत  करणारा हा समुद्र!! मन शांत करणारा, जगण्याची उर्मी, उत्साह देणारा, प्रेमी युगुलांना खुणावणारा, मुंबईबाहेरच्या प्रत्येकाला भुलवणारा, मुंबईकरांना  अक्षरश:  रोज भेटणारा तो समुद्र... पण किती वेळा हे सौंदर्य अनुभवतो आपण??? धावून धावून दमून नेमक्या वेळेस कितीवेळा तो समुद्र आणि ते निरागस आकाश पाहतो आपण?? खरच शेजारच सौदर्य, शांतता रोजच्या रोजमार्राच्या आयुष्यात हारवून बसतो  आणि मग शोधात फिरतो शांतता आणि समाधान - मुंबई पासून लांब, गावात !!!  

जवळ जवळ रोज marine drives  च्या आस पास फिरत असतो मुंबईकर... पण..  धकाधकीच्या आणि स्पीड च्या मागे पळणारा मुंबईकर किती वेळा marine drives  च्या त्या कट्यांवर शांतपणे विसावतो आणि अनुभवतो ते सृष्टीतील बदल??? मायानगरीच्या मायेला झगमगाटाला भूललेले सारेच मुंबई येतात आणि जुंपून घेतात स्वत:ला कामामध्ये, tyaa त्या स्पीड शी cope -up  करायच्या नादात आणि छन छन करणार्या नाण्यात सुख शोधत फिंरतात. शांती, निरागस सौंदर्य आणि समाधान मुंबईत नाहीच असे बिनधास्त म्हणतात. पण मुंबईचा साधा सूर्यास्त .. इतका सुंदर निरागस नजारा मात्र अनुभवायचा विसरूनच जातात :( :( .. समुद्र पाहतो पण त्याच सौदर्य आणि असा निर्मल निखळ सुंदर देखावा तीपायाचाच विसरतो खरच फार क्वचित अनुभवलेला  असेल आपण हा नजारा !,.. मायानागारीची ही पण  एक मायाच म्हणावी लागेल का???

जिथे सुर्यास्ताचा देखावा मन भुलवून टाकणारा असा दिसतो, अश्या जगातल्या कोणत्याही जागेवर सुर्यास्ता च्या नंतर एक अनामिक हुरहूर, असह्य शांतता आणि रुख-रुख पसरते पण मुंबई?? इथला सूर्यास्त तितकाच सुंदर असतो, भुरळ घालतो, पण सूर्यास्तानंतर समुद्राकडे पाठ केली की एक वेगळंच जग समोर येत ,, किनारा अजूनही प्रकाशित असतो कृत्रिम उजेडात झगमगत असतो आणि "स्पीड" वेडा मुंबईकर त्याच वेगात कोणत्याही टोचणी शिवाय धावत असतो... हे भावना शून्य असल्याच प्रतिक म्हणायचं?? की एक मस्तवाल  attitude ??  की गरज?? उत्तर कठीण आहे. SO, तूर्तास आपण फक्त marine drives  च्या कट्ट्याच हे  नशीब म्हणू किंवा त्या कट्ट्याच वेगळेपण !!!!
काळोखाच्या गर्तेत समुद्र पूर्णपणे दिसेनासा होतो पण किनारा मात्र झगमगत असतो कृत्रिम lights च्या उजेडात,,, सूर्यबिंब संपूर्ण मावळलेलं असत पण किनारा लख्ख असतो झगमगाटात हरवलेला!!!
मुंबई धावतच असते ... समुद्र वाहतच असतो ,,, फक्त  किनार्याची , marine drives  ची एक बाजू अंधारात अदृश्य झालेली असते... मुंबई आणि बेफिकीर मुंबईकरासाठी फक्त एक working day संपलेला असतो.


                                                                                                ... रेश्मा आपटे 

Tuesday, 8 November 2011

द्वंद्व

खुपदा कस होत की सगळ काही सुरळीत नियमित सुरु असतं. म्हणजे "रुटीन लाइफ़" सुरु असतं. तसं बघितलं तर सगळ कस जगाच्या जागी आणि नीट!! तरीही एक रुख-रुख असते एक अशांतता मनात घर करून असते. सगळ असून विरक्तीची भावना देणारी! प्रत्येक पाऊल लख्ख प्रकाशात पडत असतं पण.. पण त्याच प्रकाशात स्वत:चीच दिसणारी सावली!! ती मात्र मन झाकोळू पहाते. दिवसा-उजेडी अचानक काळोखाच्या स्वाधिन झालो असे वाटायला लागते. मनात आत आता काहीतरी सलत रहाते. संपूर्ण  आयुष्याला  पुरेल  असे नैराश्य बेसूर हसत जणू आपलं अस्तित्वच त्याच्यात सामावू पहाते. 

हल्ली खुपदा मला असेच होतं. मनाचा नुसता गोंधळ उडतो का कस? कश्यामुळे ? काहीच सुचत नाही ... :( .. खूप खूप confident वाटत असताना मध्येच भीती वाटते काहीतरी चुकेल, जमेल का? नक्की हे करू शकू ?? असे एक ना दोन १०० प्रश्न मनात येतात! प्रत्येक प्रश्नासरशी मनात एक नैराश्य, एक अस्वस्थता दृढ होत जाते. ही भावनाच विचित्र अपरीचित असते मला! आज पर्यंत कोणताही निर्णय घेताना मी खूप ठाम असायचे. पण मग अचानक हे असे का व्हावे? म्हणजे प्रेम भंग किंवा total अपयश वैगरे अशी काहीच भानगड नाहीये मग तरीही हे का? उत्तर नाहीत आणि सापडतही नाही प्रयत्नपूर्वक शोधून सुध्धा नाही, उरतात फक्त प्रश्न आणि प्रत्येक प्रश्न मनाचा गोंधळ वाढवतो. एखादी गोष्ट सुरु करते किंवा करायचा निर्णय घेते पण त्यावर ठाम होता येत नाही. हे करू का? ते जमेलच किंवा मी ते जमावेनच याची स्वत:चच मन ग्वाही देत नाही...   मलाच होते आहे का असे? आणि का होते आहे? 

फक्त मीच? की माणसाचे मनच असे आहे, सगळ्यांच्याच मनात ह्या अश्या दोन परस्पर विरोधी भावना आशा आणि निराशा एकत्रित वास्तव्य करीत असतात? एक दुसर्यावर हावी होण्याची धडपड करत असतात?..  आणि जिचे पारडे ज्या वेळी जडं तसा त्या व्यक्तीचा मूड! किवा स्वभाव आशावादी किंवा निराशावादी!
 व्यक्ती एकच पण .. पण विचार अनेक.. प्रत्येकाच्याच मनात असतात ह्या दोन्ही बाजू सतत, सतत एकमेकांशी झगडणार्या! एक आशावादी, हसरी, उत्साही, प्रेराणादाई तर एक निराश, उदास, निराशावादी! सगळ्यांच्याच मनात दडलेल्या असतात दोन विरोधी भावना एक लख्ख प्रकाशासारखी स्वच्छ, निर्मळ तर दुसरी स्वत:बरोबर निराश करणारी काळोखात खेचत नेणारी कुट्ट काळ्या सावलीसारखी निराशावादी!!. 

माणसाचं इवलस ते मन पण..  भावना त्या मात्र अनेक! ते मन भारीच चमत्कारिक असत नाही, उगी नाचवत रहात, एका क्षणी सगळ काही शक्य वाटतं, तर पुढचाच निराश उदास क्षण सार काही अशक्य करून जातो. प्रत्येकजण नेहमीच एक झगडा, एक युद्ध अनुभवत असतो. आशा-निराशा दोघीही एकमेकीनवर कुरघोडी करण्याच्या प्रयत्नात असतात. सतत सतत आपल्यावर ताबा मिळवू पहातात आणि आपण त्या पैकी एकीच्या स्वाधिन होतोही. कसे? कोणत्याक्षणी?  हे आपले आपल्यालाही नाही समजत! पण आशा-निराशेच्या मधली ती अदृश्या रेषा ओलांडून नेहमीच प्रत्येकजण एका बाजूला खेचला जातो. पण जोवर आपण रेषेच्या एका बाजूला असतो, मग ती कोणतीही असो, तोवर सगळाच ठीक असतं; कारण रोजचा दिवस सारखाच नसतो ना? पण जेव्हा कधी आपण त्या रेषेवर उभे असतो आणि तळ्यात मळ्यात सुरु असतं तेव्हा? तेव्हा काय? काय करायचं आणि कस आवरायचं मनाला? कस पुन्हा वेसण बांधून आशेच्या आश्रयाला सोडायचं?

हल्ली हे मी सतत अनुभवतेय एक द्वंद्व !! सतत मनात चालणार एक युद्ध. आशेचे - निराशेशी. उत्साहाचे- निरुत्साहाशी. punch  me असते ना तशी अवस्था झालीये माझी सध्या! त्या अदृश्या रेषेच्या अलीकडून आणि पलीकडून सारखेच धक्के बसतायत आणि मी मात्र गडबडतेय त्या रेषेच्या पलीकडे जाण्यासाठी. तो उत्साह खुणावतोय पण ते नैराश्य वरचढ ठरतेय माला वाकुल्या दाखवत परत परत स्वत:त कोंडतय! 

आणि मी झगडतेय प्राणपणाने बाहेर पडायला!!!  कशी? ते मात्र समाजात नाहीये. 

हे सगळ उतरवू की नाही इथे इतक _ve  नको लिहीत जाऊ असे काल एक मित्र म्हणाला पण माग विचार केला कदाचित हा एक मार्ग असू शकतो मनातला गोंधळ समजाऊन घ्यायचा आणि फायदा नाही झाला तरी तोटा तर नाहीच होणार ना? म्हणून मग खरडलं  ..........

                                                                                                ,,, रेश्मा आपटे 

Saturday, 29 October 2011

दिवाळी

परवा ऑफिस मधून घरी यायला जरा उशिरच (रोजच्या सारखाच :D ) झाला  ..आणि मग त्या नन्तर ओघानेच होणारी आईची चिडचिड, बाबांचं फक्त घड्याळ पहाण, आणि आजी कडून मिळणारे भाल मोठ lecture हे सगळ असून शांत राहायचं अस स्वत:लाच बजावत building मध्ये शिरले. आणि कशात तरी अडखळले ,, नशीब धप्प दिशी पडले नाही. पण चांगलीच ठेच लागली. मूर्ख कुठची पोरं, खेळतात ते तिथेच टाकून जातात कोणाला लागेल, पडेल कोणी याचा विचार सुद्धा करत नाहीत!!! stupids पहिल्यांदा मला त्या चिल्लर gang चा मनापासून राग आला. तो सगळा राग त्या दगडावर काढत मी त्याला लाथ मारली तर दगड जास्ती हलला पण नाही, नीट वाकून बघितलं तर ती किल्ल्याची तयारी असल्याच लक्षात आलं!


मस्तच किल्ला! दिवाळी आली नाही का? वा वा! दुखरा पाय सांभाळत नीट पुढे टाकून मी आत शिरले, त्या चिल्लर gang वरचा राग त्या ओबड-धोबड  लहान मोठाल्या दगडांकडे आणि मतीकडे बघून सुंदर वार्याच्या झुळकी सरशी पळून गेला! मी यंत्रवत पावले टाकत जिने चढत होते, पण लक्ष मात्र त्या किल्यात अडकल होतं! आमच्या किल्ल्याची जागा आज कित्येक वर्ष fix  आहे. फक्त तो बनवणारी, माती लीम्पणारी आणि हात बरबटवून त्यात रमणारे चेहेरे मात्र बदललेत. .. मला त्या किल्ल्या समोर मीच दिसायला लागले ते मोठ-मोठे दगड जमा करणारे, ते कल्पकतेने मांडून त्यावर माती लिंपून त्याचा किल्ला बनवणारे माझे सवंगडी आठवले. आई कडून मोहरी घेऊन त्या किल्ल्यावर आम्ही फुलवलेली हिरवळ, रचलेले मावळे आणि सगळ्यावर वरती विराजमान असलेले "राजे" ..  किल्ल्याच्या बाजूला तलाव हवाच या माझ्या हट्टापाई माझ्या मित्राने तलाव म्हणून कल्पकतेने रचलेली करवंटी आणि दुसर्या दिवशी त्यातील सर्व पाणी वाहून गेल्यामुळे हिरमुसलेला त्याचा नि माझा चेहरा सगळाच आठवल २ मिनिटात ... :) :)

घरी पोहोचले तर घरातून चकल्यांचा खमंग वास आला.. वा वा !! पणत्या, किल्ला, रांगोळ्या, आकाश कंदील, आणि चकली, चिवडा, लाडू, शंकरपाळे, अनारसे, शेव, करंज्या वा वा  !!! आली आली दिवाळी आली यंदाची !
एरवी सारखी घरी चिडचिड नाही झाली, आणि मीही नेहमीसारखी थकले म्हणून कटकट केली नाही ,,,

दिवाळी... खरच सणांचा राजा ! दिव्यांचा सण ... हवेत नुकताच जाणवत असलेला गारवा, खाऊ मिठाई, फटाके, मित्र नातेवाइक यांच्या गाठी भेटी, उत्साह, रंग, रोषणाई, वातावरणच पवित्र आणि आनंदी होऊन जाते ना सगळे? लहानपणी शाळेला मिळणारी सुट्टी, फटके, कपडे आणि खाऊ यात रमणारी मी अचानक मोठी आणि sad  झाल्यासारखी वाटयाला लागले मलाच!! रांगोळीच्या रंगात रंगणारी, पणतीच्या जोती बरोबर हसणारी, कंदिलाच्या प्रकाश धरायला धावणारी, किल्ल्याच्या मातीत हात आणि फ्रोक मलवणारी आणि करंज्या-चाकल्यांवर यथेच्च ताव मारणारी मी!! दिवाळी उद्या परवा वर आली तरी no shopping no colours  and no  lights  :(  छ्या छ्या ते काही नाही जेवण खाण करून चेहर्यावर पाणी मारून मस्त उठले आणि पणत्या, रांगोळीचे रंग माळ्यावरून काढायला घेतले आणि सज्ज झाले दिवाळीच्या स्वागताला :). तेव्हढ्यात शेजारची चिंगी माझा आवाज ऐकून धावत धावत आली आणि मला म्हणे ताई रांगोळी कधी काढणार किल्ला उद्या पूर्ण होईल :)

बस हे ऐकून खूप खूप खुश झाले मी आणि तिला उत्साहाने सांगितले उद्या रात्री नक्की :)

त्या एका वाक्याने मला जाणीव झाली की अजून मी "त्यांच्यातलीच" आहे आणि तो चिमुकला किल्ला माझाच आहे. ते फिलिंग सुध्धा सुखावून गेले. :) खूप समाधान वाटले. आणि एक गोष्ट लक्षात आली की हा खो-खो तर सुरूच रहाणार काल मी नाचत होते आज ही चिंगी, आणि  न जाणो अजून काही वर्षात ही सुध्धा अशीच माझ्यासारखी दगडावर ठेचालाल्यावर तिचे फ्रोक मधले दिवस आठवेल :)

हेहेहे ते असो चला पणत्या लावू आज-उद्या मध्ये ते राहून जायचे काय ?? आणि पणत्या लावण खूप महत्वाच कारण जो स्वत: प्रकाशतो आणि दुसर्याला प्रमाषित करतो तो "दीप" असतो.
आजीच्या भाषेत  " दीप्यते दिपयति वा स्वं परं चेति "

Friday, 1 July 2011

यंदाचा पहिला पाऊस



घाम ,चिपचीप, मरगळ, रख रख, खूप खूप विचार, मी गलरीत उभी होते,,,, समोर दिसेल ते बघत (बघत होते की नाही देव जाणे पण डोळ्यासमोरून काहीतरी सरकत होत ) माझ्या मनावरच मळभ, एक अस्वथपण, कशातच लक्ष लागत नव्हत! सगळच कसं निरस वाटत होतं, त्यात पोरांचा गलका!!, एरवी मी घरात म्हणजे त्यांची मजा असते त्यांचा श्रोता आणि खेळातला पार्टनर असते मी, कधी त्यांचा जज्ज तर कधी चक्क कुक ( जास्ती वेळा ते माला कुक किंवा spare partner बनवण पसंत करतात) आजही नेहमी सारखेच ते सगळे माझ्याकडे येऊन गलका करत होते,, हे सांग, त्याला ते पाहिजे, तिची चूक, तिला ओरड and all पण मी मात्र नेहमीसारखी त्यांच्यात mix नाही झाले जोरदार ओरडले त्यांच्यावर तसा तो ताफा हिरमुसून परत गेला ,,, सगळं कस शांत शांत झालं,,

आणि त्यात भरीला " जब दिलही तुट गया ... हम जिके क्या करे..  " सारखी भयानक गाणी समोरचे काका ऐकत होते ( म्हणजे त्यांनी चुकीच्या वेळेला चुकीची गाणी लावणं किंवा कोणतीही sad songs कधीही ऐकणं यात आता काहीच नवल नाही,)  पण तरीही मला आपल उगाचच हिंदी पिच्चर मधल्या त्या " मे लुट गई, बरबाद हो गई .. " वैगरे च्या situation मध्ये गेल्या सारख वाटलं,... इतकी भडकले ना मी की वाटलं जाऊन सरळ बोलाव त्या "काकांना" आजी म्हणते तसं  " भिकेची लक्षण कुठली ,,, तिन्हीसांजेला काय हा तमाशा लावलाय???? " ,,, पण मग स्वतःला आवरलं! ,,, मी अजूनही तशीच त्याच स्थितीत उभी होते ,,, उदास हाताश !!

तेव्हढ्यात,.. अचानक एक वार्याची झुळूक आली, एक हळुवार फुंकर मारून गेली, मागोमाग काही वेडे पिसे ढग आमच्या गल्लीतल्या चिमुरड्यांन प्रमाणे धावू लागले,,, उष्ण- गरम, सगळ करपवून टाकेल अशी हवा अचानक शांत शीतल बनत होती, आणि ती माला जाणवत होती  ,,, त्या तालावर पान-फुल डोलू लागली ,,, आताशा वारा जरा भाराराच सुटला,... आमच्या बिल्डिंग मधली बच्चे कंपनी माझा मागचाचा ओरडा विसरून परत गलका करायला लागली ,,, आणि .. आणि तो आला ,,,, ज्याची वाट पाहत होतो, ज्याच्या साठी अधीर झालो होतो, ज्याच्या येण्याच्या नुसत्या कल्पनेने खुलून फुलून जातो,.. तो आला ,,, येईल येईल म्हणता उशिरा की लवकर कधी येईल आता की उद्या म्हणता म्हणता तो आला,  त्याचा पहिला स्पर्श, पहिला गंध, पहिला ओलावा अहा काय वर्णावा,... उहू ,,, तो फक्त अनुभवायचा,... ते सार  सार  जमिन आसुसून साठवून घेत होती ,,, उडणारी धूळ, गळणारी पान, गोंधळलेले पक्षी, धावणारी घाबरलेली जनावर, वातावरणात अचानक होणारा तो बदल, कशा काशाच भान नव्हत तिला! ती फक्त साठवून घेत होती.. त्याला! स्वतःत. आणि तिचा तो आनंद, सुख ती त्या सुखाची उधळण मृद्गान्धातून करत होती, सर्वाना तो आनंद वाटत होती... 

पहाता पहात सगळ काही बदलून गेल होत ,, एक नव चैतन्य आजूबाजूला पसरत होत ... आता मस्त कोसळत होता तो,, पाणी नव्हे खूप खूप उत्साह, आनंद घेऊन आला तो ,,, मी अजूनही तशीच उभी होते , पण चेहर्यावाचे भाव rather मनातले विचार निरुत्साह सगळच मावळल होत,, लोकांची धांदल छात्रांचे रंग पहात होते, त्या रंगांनी माझ्या चेहर्यावर हलकाच हसू पसरलं .., वा वा आता सगळे कडे रंगच रंग, नवीन पालवीचे, लवकरच उमलणार्या फुलांचे, आकाशाचे, पानांचे, वार्यावर डोलणार्या झाडांचे, हिरवा रंग एकाच पण त्याच्या किती अगणित shades  पहायला मिळणार आता ,,, आणि आवाज,  ते पण किती वेग-वेगळे पावसाचा आवाज, वाहत्या पाण्याचा आवाज, पाण्यातून भरधाव जाणार्या गाडीचा आवाज आणि त्या पाठोपाठ ( नालायक किंवा तत्सम ) ज्याच्या अंगावर हे पाणी उडालं त्याचा आवाज ,... हे हे हे हे ,, सगळच सुंदर !!! अरे पण आता तर कुठे तो आलाय, त्याला येऊ देत, स्थिरवूदेत, मग आवाज, रंग सगळ अनुभवायचं .. थोडक्यात काय तर त्याच्या फक्त काही थेंबानेच सगळं काही खुलूनं गेलं ,, आणि त्या सुंदर वातावरणात मी कशी दु:खी राहीन??? तो आला ना मग? माझ मनही हसलं, खुललं, आणि त्याच्यावर भाळलं, भुललं :) :) :)  ,,,, सगळी मरगळ  शीण अचानक नाहीसा झाला ,,, अस्वस्थ मन अचानक खुलून गेले ,,,  पाऊस ,, त्याने सगळच धुतलं मनावरची मरगळ पण :) :) :)

त्यात आमचे बंधुराज त्यांच्या सवंगड्यांना म्हणतात कसे " dont worry , मी आहे ना, तिला काहीतरी प्रोब्लेम असेल, माझी ताई आहे ना , मी विचारेन ना तिला ... हे ऎकून मी खूप खूप हसले ,,, ते चुमुरड पिल्लू ,,, माझ्याशी माझ्या प्रोब्लेम बद्दल बोलणार होतं :D :D :D हे ही हे हे  ,,,, sweetheart bro ....

मग काय, ताई ओरडली, चिडली याची शिक्षा काय तर कांदा भाजी ,,, सो मग, आमच्या बिल्डिंग मधल्या बच्चे कंपनीने मस्त कांदा भाजींवर ताव मारला ,,,, ( माझं चिडणं त्यांच्या पथ्यावर आणि माझ्या आजीच्या पित्तावर पडलं) ,, कारण भज्यांच्या घाट घातला मी पण,. मागचं आवरण वैगरे तिलाच कराव लागल, त्यात पोरांसकट माझा गलका :) :) :) वर पोर ताईने भाजी केली मस्त म्हणत गुल :D :D :D :D


                                                                                ,... रेश्मा आपटे 






Thursday, 5 May 2011

want to go back in those days :( :(

मध्ये काही कारणास्तव शाळेत जाण्याचा योग आला ,,, 
शाळेच्या आवारातील काही छोटे- छोटे बदल सोडले तर शाळा काहीच नाही बदललीये ,,, मस्त मस्त मस्त ,,, पुस्तकातील काही पाने जशी वार्‍याने उडून सहज मागे जावीत न तितक्याच सहजपणे मी माझ्या आयुष्यातली काही वर्ष मागे गेले. ते मैदान, ती इमारात, तो जिना, ती मोरावरली सरस्वती सगळं सगळं माला खुणावत होत माला मागे मागे घेऊन जात होत माझ्या सुंदर सुंदर दिवसात ... काही सेकंदात इतका प्रवास केल्यावर हातावर बसलेल्या छोट्याश्या बॊल ने भानावर आले मी, अगदी पुढच्याच क्षणी  ... 

मग सहाजिकच माझ लक्ष तो बॊल उचलण्यासाठी आलेल्या चिमुरड्याकडे गेले त्याच्या डोळ्यात भीती स्पष्ट दिसत होती,, हा आता ती भीती  "ही बाईना सांगेल?... मग ओरडा बसेल का?? " ह्याची होती, की "बॊल गेला तर??" किंवा "या मुळे उद्यापासुन खेळणेच बंद झाले तर???" "आता ही काय करेल नक्की ??? " याची होती, ते माला नि त्याला दोघानाही सांगता नाही यायचं ,,, हं पण एक मात्र खर की, मी स्वच्छ हसून तो बॊल त्याला परत केल्यावर मात्र त्या मोठ्या डोळ्यातले भाव क्षणात बदलले भीती ची जागा आनंदाने घेतली कारण आता  ना त्याला ओरडा बसणार होता ना त्याचा बॊल जप्त होणार होता,,, किती किती निरागस आणि खरे डोळे होते ते! त्याच्या निरागस मनाचा आरसाच जणू! खरच लहापण म्हणजे वरदान असत ईश्वराच... जे जस वाटत ते तसच्या तस व्यक्त करता येत.... कोणताही मुखवटा नाही बळेच हासण नाही की खोटी स्तुती नाही. 

शाळेत प्रवेश केल्या केल्या समोर येत ते सुंदर मोठ्ठ मैदान, नजर खिळवून  टाकणार... ती देवी, ते वर्ग, ते गेट, सगळ जिथल्या तिथे अरे पण ते झाड?? उन्हां पावसात सावली देणार, लापाछुपिच्या खेळात हमखास मदतीला येणार, दप्तरांची ओझी झेलणार, आमच्यातल्या एकाच डोक फुटल्यावर घाबरलेल्या आम्हाला बघणार, शाळा सुटली की त्याच्या मुळांशी आम्हाला सामावून घेणार, मैदानाच्या कोपर्‍यात आणि शाळेच्या आत प्रवेश केल्यावर डाव्याबाजूला डौलाने वार्‍यावर झुलणार आमचं लाडकं झाडं! ते मात्र नाही दिसलं कुठेच..,, आत गेले, जिना चढून वर गेले तर आमचा ४ वर्ष एकाच असलेला वर्ग ... माला खुणावू लागला मग काय सरळ आत शिरले, ते छोटे छोटे बेंच तेव्हा किती मोठाले वाटायचे आता चिमुरडे दिसत होते,,, तिथे केलेली मस्ती, मधल्या सुट्टीत खेळलेले गोल्स्पोट, छोटे छोटे बैठे गेम (काही खेळांची तर नावेही नाही आठवत), केलेली भांडणे, मारामारी, त्यानंतरची रडारड, मग दुसर्‍याच  क्षणी कट्टी ची होणारी बट्टी आणि परत एक-मेकांचे हात पकडून,जोक सांगून पोट दुखेपर्यंत हसणार्‍या आम्ही सगळ्या जणी,.. काही दोस्तांची मस्ती, शाळेत दिलेले पर्फोर्मंस, पहिला निबंध, पहिली कविता, भाषण, नाच सगळं सगळं काही आठवत होत. त्या आठवणीत शाळेतल्या सगळ्या बाई, ताई, मुख्याध्यापिका होत्याच, खूप आनंद, मस्ती, होती तशाच शिक्षाही होत्या,...

मी ज्या कामासाठी शाळेत गेले होते ते व्हायला थोडा वेळ लागणार होता. मग काय माझ्या त्या शाळेत माझी पावले इकडे तिकडे फिरत होती, माझ्या आठवणी ताज्या करत होती, लहानपणी वाटणार सगळ्यात मोठ ’जग’ म्हणजे हीच शाळा, जिने मला उभ राहायला शिकवलं, पाटीवर पेन्सिल फिरवून अक्षर ओळख करून दिली, माझ्या रेघोट्यांना भाषा इथेच तर मिळाली. माझी पहिली मैत्रीण, पाहिलं बक्षीस, पाहिलं भाषण, पाहिलं नाटक, सगळ सगळ काही माला इथेच मिळाल. मी मला पहिल्यांदा इथेच सापडले का?,.

शाळा म्हणजे भीती, कटकट, अभ्यास, आईला सोडून येण अशी करून घेतलेली धारणा, मग माझी रडारड, पहिल्याच दिवशी चालता चालता शाळेला घेतलेला साष्टांग नमस्कार ( आई-बाबांकडून कळले) .. या सगळ्यातून अंजू ताईंच्या वर्गात मी कधी रुळले ते काळेच नाही. मग अलका ताईंच्या वर्गात पहिली आले (ती पहिल्यांदाच आणि शेवटचीही  :D :D :D ). मग शाळेच्या जीवनाला खरी सुरुवात झाली पाटील बाई आणि पटवर्धन बाईंच्या बरोबर इतर सगळ्याच शिक्षिकांनी खूप खूप प्रेम दिल, आधार दिला, Confidence दिला. शाळा सोडून आता बरीच वर्षे झाली पण त्या आठवणी मनावर कोरल्या गेल्यात कायमच्या.. आज शाळेतून फेरफटका मारताना अस वाटत की आता कालच तर आपण ३री -४थित होतो,... अजून आपण तितकेच आहोत, तसेच आहोत, इमारत, बेंच, शिक्षक , त्ताई काहीच बदलले नाहीये आणि मी.. मी ही तशीच, डोक्यात काहीतरी घेऊन शाळेत हुंदडणारी ... एका खिडकीत उभी राहून मी सगळं काही विसरून, मैदानावरची मज्जा पाहात राहिले,... ती खेळणारी मुलं-मुली, मध्येच हसणारी, भांडणारी, सगळे जण आपापल्या ग्रुप बरोबर खेळण्यात मग्न होते, आणि मी त्यांना बघण्यात ,,,

त्या लपाछुपी खेळणार्‍या मुलींना पाहून उगीच वाटल अरे काहीच तर नाही बदललाय,.. सगळ तसाच आहे, ,, खेळ तोच आहे..लापाछुपिचा, नियम तेच आहेत, थप्पा किंवा भोज्जा होणारे हे अटळ, राज्य जाईल तरी नाहीतर परत तरी येईल .., भिडू मात्र बदललेत, आता या खेळातले .. इथे लपाछुपी आहे ती सुख -दुखाची, जया -पराजयाची.,, डेड लाईन्स  आणि अचिव्हमेंट ची,  आणि या खेळात राज्य ... ते मात्र सतत माझ्यावरच.!! .. आज मी आंधळी कोशिबिरही खेळते, डोळ्यावर बांधलेली ती पट्टी आहे अजून तशीच तशीच, यात लोक खुणावू शकतात, आवाजाने दिशाभूल करू शकतात, पण राज्य घेणार्‍याने अंधारात चाचपडत पुढे जायचे वेध घ्यायचा खेळाडूंचा.. इथेही अंधार आहे सगळीकडे....  शोध सुरु आहे ,,, शोध घ्यायचा आहे तो स्वप्नांचा, गाठीशी आहेत प्रयत्न आणि विश्वास ( याच आंधळी कोशिबिरीच्या खेळातून कमावलेला ) की ज्यांना शोधात फिरतोय ते आहेत त्यांची चाहूल लागलीये  ते मिळणारेत. ..

तेव्हड्यात माझा फोन वाजला आणि मी सरावानेच उत्तर दिले, " yes , i will meet u directly in the court ,... ok ok in case you want to discuss any thing just call in the office .. .now m in court ,lil busy lets talk afterwards .."
आणि मी माझ्या विचारांच्या लांगडीतून जरा भानावर आले .. आणि पटले माला की, नाही, मी ती नाहीये,,, सगळं सगळं शिक्षकांसकट तसच्या तसं आहे पण ,,, ती खरी खुरी मी कुठाय??? खूप खूप बोलणारी, मनापासून हसणारी, रडणारी, आणि बिनधास्त असणारी ,,,  त्या मातीत खेळणार्‍या मुलीसारखी.., मनसोक्त मन लावून, हातांसोबत पाय आणि ड्रेस मळवणारी.,...  मी मनसोक्त मन लावून मातीत अक्षर गिरमितवत बसू शकते का आता?? संत्र लिंबू पैश्या पैश्याला म्हणून गोल गोल फिरण्याचा खेळ तो साधा, पण आज तो ऐकून काय सुचते तर,किंमत,.. पै पै ची,,, विष - अमृत चा खेळ ! तो तर चक्क आपल्याला आयुष्यातले चढ-उतार दाखवत असतो. हे बालपणीचे खेळ आपल्याला आयुष्याच तत्त्वद्यान शिकवत असतात ?.. की, आता मोठे होऊन आपण त्या खेळांना, खेळांकडे निरागस पणे पाहूच शकत नाही?? की माझेच विचार भारकटतायत?? देव जाणे,,, पण एक नक्की की आज मी जशी खिडकीत उभी राहून विचार करतेय तशी ही मुलही करतील काही वर्षांनी शेवटी ते माझा "काल" आहेत आणि मी त्यांची "उद्या" ,... जणू मी त्यांना खो द्यायलाच इथे आलेय या विचाराच मालाच आता हसू येतंय ,,,
  
पण,,,, anyways , ह्या सगळ्या चित्र विचित्र विचारण नंतरही मी म्हणेन that I want my picnics ,, i want those      days to be back in my life ,,,, सुंदर दिवस, सुंदर नाती, सुंदर अनुभवं, आणि हो सुंदर खेळ :) :)  खरच आपले नि शाळेचे नातेच असे असते की ते ज्याने त्याने अनुभवायचे असते,,, ते असे शब्दात वक्त कर म्हणालात तर माझ्या नि तुमच्या भावनेचा अपमान होईल,, कारण, शब्दांचा पसारा मांडूनही ती अव्यक्तच राहील ....... म्हणून ह्या फंदात न पडता मी म्हणेन common SVJ 's lets reunite आणि मस्त अनुभवू ते दिवस ,,,,,,,,,,,,,,

miss those days n friendz  :( :( :(......


Saturday, 9 April 2011

रेषा - रेघोट्या

परवाच एका मित्राशी chat करत असताना तो म्हणाला की "nothing is permanant , मित्र मैत्रिणी नाती, त्यांचे  संदर्भ सगळच बदलतं जातं, गरजेच्या वेळी आपले आपले म्हणशील ते मित्र मैत्रिणी जवळ असतीलच असे नाही. म्हणजे ते स्वार्थी आहेत असेही माझे म्हणणे नाही, पण... वेळ, काळ, busy schedule या सगळ्यात ते तुझ्या बरोबरच असतील असेही नाही." मी म्हटले असे कसे ? माझे मित्र मैत्रिणी आहेत ते, त्यांना नाही जमले touch मध्ये राहायला तर मी राहीन, my friends are special 4 me, i know we all will be in touch " तर म्हणाला, " contacts नाही राहत बये, u will come to know ,  कळेल तुलाही कळेल 'कालाय तस्मै नमः !', थोडा विचार कर, असे होतेच.जुने जातात, नवीन येतात this is life dear :) "  

मी त्याच्याशी initially अजिबातच सहमत नव्हते. पण मग विचार केला, लहानपणी माझा एक मित्र होता एकदम मस्त best friend आता तो कुठे असतो? काय करतो ? माहीत नाही. एक खूप छान मैत्रीण होती आजीकडे यायची ती तिच्या, मे महिन्याच्या सुट्टीत मीही तिथेच असायचे मग काय छानच गट्टी जमलेली आमची, पण आज ती job करते आणि कधीतरी २-३ वर्षांनी एकदा भेटते. माला तिची आठवण येते का? ohh उत्तर नको असतानाही हेच मिळतेय "नाही " do i miss him or her??? ohh OMG " ’no,’ i don't !! strange but truth" ... मग? किती सहज accept  करतो ना आपण आयुष्यातले बदल बदल!! खूप जण भेटतात, त्यांची आणि आपली life connect होते, कधी कधी नेहमी साठी तर कधी काही क्षणांसाठी! वय वाढते, विषय बदलतात तसे आजूबाजूचे लोक मित्र मैत्रिणीही बदलतात, जशी त्यांच्या असण्याची सवय झालेली असते तशी नसण्याचीही जडते (?).. किती वरवरची नाती असतात सगळी??? 

ह्या fast life मध्ये आपण खरच नाती जगतो का? जपतो का? की, आपले इगोच आपल्याला जास्ती प्रिय असतात??? आपल्या माणसांपेक्षा इगो महत्वाचे कसे आणि कधी होतात? तिने call केला नाही मी का करायचा? नाही तर नाही गेली उडत... असे का होऊन जाते??? समोरच्याला प्रोब्लेम असू शकतात हे समाजात नसते का आपल्याला की समजूनच घ्यायचे नसते?? लग्ना आधी सुंदर सुंदर, घट्ट असणारी मैत्री एकीचे लग्न झाले की  लगेच ढिली का पडत जाते??? आपल्या मैत्रिणीची सुख-दुखः आधी आपल्याला हसवतात रडवतात मग नंतर असे काय होते की ते हातातले हात न कळत सुटत जातात ?? कधी सहजपणे तर कधी EGO  मुळे,,,  पण काही झाले तरी परीणाम एकाच राहातो एक नात संपत ...... का, कसे, कधी, कोणाचे चुकले हे न कळताच  नात्यात दुरावा येतो ,,, आधी खूप खूप विषय असतात तुझ्या माझ्यात पण नंतर hi .. , hows u ?? whats up ? ok .. keep in touch और be in touch  ... यावर संभाषण संपते.... आधी आठवड्यातून एकदा मग महिन्यातून एकदा मग काही महिन्यातून एकदा असे बोलणे होते ... त्यात संवाद नसतोच असते ती चौकशी मैत्री अजून शिल्लक आहे हे दाखवायची धडपड ,.. हे समजत असते दोघींना तरीही पाउल पुढे कोणी टाकायचे? हा पश्न उरतो आणि एक अस्पष्ट पडदा तयार होतो दोघीत, नात्याची वीणच सैल होत जाते हळूहळू ...

रेषा - रेघोट्या
असे कसे? का ? खरच?? ह्या विचित्र मनस्थितीत आणि भरकटलेल्या विचारात असतानाच एक ब्लोग काल वाचण्यात आला त्यातल्या एका ओळीने मनाची मरगळ हे अस्वथपण, उदासीनता सगळेच दूर केले. जाणवले की आयुष्यात प्रत्येकाची एक जागा असते, कोणी दुसरी वक्ती त्याला परीयाय नसूच शकते. आणि प्रत्येक जण आयुष्यात काही शिकवण्यासाठी तुम्हाला घडवण्यासाठीच येत असतो. :) ते वाक्य होते .... "माणसं रेघोट्यांसारखी असतात. कुठली रेषा कुठल्या रेषेला कधी छेदून जाईल ते सांगता येत नाही. आणि ह्या रेषा एकमेकांना छेदूनच जात नाहीत तर त्यातून एक आकार बनतो. एक विश्व बनतं." ......


वाह खरच, आज जरी "त्या" दोघी एकमेकींपासून लांब असतील काहीश्या अलिप्त असतील तरी, त्यांच्या रेषा जेव्हा एक-मेकीना छेदल्या तेव्हा एक सुंदर चित्र निर्माण झालेच असेल ना? एका नात्याने तेव्हा आकार घेतलेलाच होता की ... मग त्या क्षणांना जपायचे आणि आजचा अस्वस्थ 'क्षण' ??  तो"ही स्विकारायचा, कारण तोही त्याच नात्याचा एक आकार आहे. काहीसा बोचरा, खुप खूप नकोसा पण आकार आहे, त्याच रेषांतून निर्माण झालेला हा आकार तोही नीट बघायचा accept करायचा, कारण तो सृष्ठीचा नियम आहे... ज्याला सुरुवात आहे त्याला शेवट आहेच. गोड किंवा कडू पण शेवट नक्कीच आहे, 

मग ठरवले गोड आठवणींना मनात ठेवायचे आणि कडू क्षणांना तिलांजली द्यायची  ,,,मग vision clear झाले आणि मग काय एकदम लक्शात आले ... अरे,, जो गोड नाही, तो तर शेवटच नाही .. नाही का??? :) :) :) :)  so " पिच्चर अभी बाकी ही मेरे दोस्त ..." काय माहीत उद्या परत त्याच रेषा एक-मेकींना अजून एकदा छेदून जाईल, त्याच नाहीतर वेगळ्या नात्याने पुन्हा एकदा सामोरी येतील ! 

अश्या बर्‍याच रेषा अजून "रेघोटी"ला  छेदून जायच्यात, काही "छेद" देतील, तर काही चित्र बनवतील, काही नेहमीच समांतर चालत राहातील, खूप जवळ असून भेटणार कधीच नाहीत, किंवा काही दिशा बदलून "रेघोटी"ला छेदून जातील कायमच्या आठवणी मागे ठेऊन जातील जेव्हा त्या रेषा आठवतील एक स्मित नक्कीच फुलेल ओठी ... काही रेषा अश्याच कालप्रवाहात हरवून जातील out of sight out of mind सारख्या  :)

पण एक चित्र दर वेळी साकारेल, एक आकार दर वेळी बनत जाईल, बनलेला आकार बदलत जाईल, आणि :रेघोटी" स्वतःचा प्रवास सुरूच ठेवेल :) :) तो final आकार बघण्यासाठी वेग-वेगळ्या रस्त्यावर झोकदार वळणे घेत ,................

थोडक्यात काय yet  more to come !!!!!!! ....... 
                                      

                                                                                        ....  रेश्मा आपटे