Tuesday 22 November 2011

2.30pm ची ठाणे लोकल

गेल्या आठवड्यात ठाण्यात एक काम होते म्हणून ऑफिस मधून दुपारीच निघाले. एरवी माणसांनी तुडुंब बहरून ओसंडून वाहाणारी लोकल दुपार असल्यामुळे एकदम शांत होती. first  class च्या डब्यात आम्ही ३नच जणी होतो. मस्त पाय पसरून बसले पण झोप येत नव्हती, नेहमी सारखी विचारांची तंद्री सुध्धा  लागत नव्हती :( वाटल ह्या सुख बोचत आपल्याला रोज त्या मरणाच्या गर्दीत आणि घामाच्या वासात सुद्धा झोप लागते किंवा विचारांचे चक्र सुरु असते. आज दस्तूर भी है मोका भी ( नो गर्दी + विंडो सीट)  पण झोप काही येत नाही :(

तर समोर बसलेली एक २८-२९ वर्षाची क्युट गोरीपान मुलगी हुंदके द्यायला लागली. वाटल बरे वैगरे नसेल म्हणून पाणी विचारलं पाणी प्याली तरी तेच. म्हटलं काय वैताग आहे. तर शेजारची ६० च्या आस पास ची आजी मध्ये पडली तिला सरळ विचारलं " काय आहे तुझ्या मनातला सल? आता सांगू नको  उन्हाने रापले आणि पाणी आले. हे काळ्याचे पांढरे असेच नाही झाले." तशी ती आणिकच रडायला लागली. झोप तर येताच नव्हती ( आणि दुसर्याच्या आयुष्यात डोकावणे हे सगळ्याच मुलींचे फेवरेट काम).

ती:  काय सांगू आजी. मी आता माझ्या बॉयफ्रेंड शी बोलत होते, म्हणजे X म्हणू की काय म्हणू माहित नाही कदाचित उद्या X म्हणेन पण सध्या तरी माझा बॉयफ्रेंड! ६ वर्ष आम्ही रेलातीओन मध्ये आहोत आणि आता ह्याला साक्षातकार झालाय की we dont have future together, का??? कारण आमच नातं म्हणे कांटाळवाण झालाय.( ती मध्येच थांबली काहीतरी विचार करत. सांगू नको यात अडकत कदाचित, पण बोलली, कदाचित कधीच परत आम्ही एक-मेकीना दिसणार नव्हतो म्हणून असेल) मी ,, मी ते टिकवायला असमर्थ ठरलीये तो चार्म ती ओढ मी नाही टिकवू शकले. आताच हे, मग नन्तर काय? म्हणून वेगळे होणे चांगले असे म्हणणे आहे त्याचे. खूप विनवण्या केल्यावर एक चान्स देऊयात आपल्या नात्याला म्हणतो. चान्स ??? उपकार करतोय का????? मला खरच कळत नाहीये मी कुठे चुकले? तो म्हणेल ते आणि तसेच केले नेहमी, सगळ्या adjustments केल्या, त्याच्या घराचे.. त्यांना आवडणार नाही म्हणून गलेलठ्ठ पगाराची नोकरी फक्त शिफ्ट्स असतात म्हणून सोडली. तर आता हा म्हणतोय, मी कमी पडल??. माझ्यातली मीच उरले नाहीये म्हणे.

आजी: मग आता पुढे काय? तुला काय हवाय तो की सुटका?? बघा बुवा तुम्हाला option  आहेत आम्हाला नव्हते असले options .

ती: अर्थात,  मला "तो " आमच नातं हवाय त्याच्या शिवाय माझ आयुष्याच नाहीये. आणि जर गेलाच दूर तर?? स्वत:ला संपवण्याची ताकद किंवा त्याला दुसर्या मुलीबरोबर बघायची हिम्मत पण नाहीये माझ्यात. मला भिती वाटते ती एकटेपणाची! तो गेला तर क्षणात मी एकटी होऊन, सगळी स्वप्न संपून जातील, एक पोकळी निर्माण होईल, त्याने विचार करायला वेळ मागितला तेव्हा वाटल जमिनीत गाडली जातेय मी, कोणीतरी मी निरुपयोगी म्हणून दूर करताय मला. मी सजीव आहे की एक वस्तू?? माझा कंटाळा आला? ६ वर्षाचं नात ३ शब्दात चुरगाळून अडगळीत कसा टाकू शकतो तो? मी खूप रडले तर उपकार केल्यासारखा एक चान्स देऊ म्हटला दोघानाही. मला भिती वाटली ती माझ्या विचारांची एकट पडण्याची!!! जगण्याचा आधार गमावण्याची. मी विचार करत बसले माझ नक्की काय चुकल? सुंदर नातं(??) माझं असं वाळूसारखं हातातून निसटताना मला कळलं कस नाही? की खरच तो म्हणतो तशीच आहे मी? साध आपल माणूस सुध्धा सांभाळता न येणारी? स्वत:त एकट जगायचा विश्वासच आणि सामर्थ्य नसलेली? त्याच्याशिवाय अस्तित्वच नसलेली? तो होता म्हणून लोक मला ओळखत होते, मी काय केलय? त्याला वेळ हवा सेटल व्हायला म्हणून जबरदस्तीने शिकत राहिले तर म्हणे फक्त शिक्षण कामच नाही व्यवहारीपणा हवा तो तुझ्यात नाही.

मी: (खरा तर तोंड उघडायची काहीच गरज नव्हती मला, ती आजीशी बोलत होती. पण गप्प बसले तर ती मी कसली नाही का? lolz ). what the hell ? तो काहीबाही बोलला आणि तू ऐकून घेतलं? का तुझ्यात हिम्मत नाही असे का वाटते तुला? चल मला एक सांग ,. त्याच्या म्हणण्या प्रमाणे तू कमी पडलीस राईट? now, assuming without admitting, you falied in keeping the relation moving or just failed to maintain the charm in the relation rite? what did he do to maintain the same? त्याने काय इनपुट्स टाकले तुमच रीलेशन टिकवायला? ही काय फक्त तुझीच जबाबदारी आहे का? आणि... (पुढे मी स्त्रीमुक्ती वादी विचारांची यादीच वाचणार होते, तुला त्याला नियम सारखे, आणि तुझ प्रेम आहे आणि तो हवाय तर काहीतरी कर ते नातं टिकवायला पण त्याला या गोष्टीची जाणीव करून देऊनच ... हे आणि बरेच शब्द मला पड्जीभे खाली ढकलावे लागले ... कारण आजी मध्येच बोलली....)

आजी:  ( मला तोडत आजी म्हणे...) हो तुझच काम आहे. मी जबाबदारी म्हणेन. हो; आहे तुझीच कारण तुझ्यातच ती ताकद आहे आणि कलाही कारण तू मुलगी आहेस. मुलगी मुलगा यातल्या कोणत्याही वादात मला अडकायचं नाही. तुम्ही तरुण मंडळी जे स्त्री-पुरुष समानता म्हणता ते पटत मला पटत पण...
नाती जोडायची असतात. ती जोडायलाही कमी वेळ लागतो तोडायला तर क्षणाचा ego पुरतो पण ती नाती संभाळण (maintain )कारण महत्वाच!!! ते कोणी शिकवत नाही कोणतेही पुस्तक किंवा शाळा-कोलेज तुम्हाला हे शिकवणार नाही ते आपण अनुभवातून शिकायचं असतं. नाती जपण हे मुलीना आपसूकच येत. आणि ह्या अश्या नाजूक नात्यांना तर फारच जपावं लागत, फुलवावं लागतं. स्वत:च अस्तित्व विसरून निष्ठा विसरून त्याला महत्व द्या म्हणत नाही पण "आयुष्य म्हणजे तारेची कसरत असते एक पाऊल चुकलं न की सगळा खेळच उध्वस्त होतो". माझे विचार तुम्हाला पटणार नाही म्हातारे वाटतील माझ्यासारखेच!! पण एक लक्षात ठेवा नाती ही "रेसिपी" सारखी असतात.
फोडणीत जसे मोहरी, मिरची मीठ बरोबर पडावे लागते ना?  त्याला चव यायला? आणि नंतर ती डीश सजवाविपण लागते तरच ती खावीशी वाटते आणि या सगळ्यात एक सेक्रेट गोष्ट सुधा असते ते म्हणे प्रेम, मन तो पदार्थ तुम्ह्च्या भाषेत perfect  होण्यासाठी :)
हा तर तसेच असते नात्याचे, भांडू नका असे नाही म्हणणार मी; कारण, त्यानेच जीवनाला रंगत येते. जेव्हा तुमची चहाच्या पेल्यातली भांडणे कमी होतील किंवा बंद होतील तेव्हा समजा की तुमच आयुष्य खूप निरास तरी झालाय किंवा जागून पूर्ण तरी झालाय चला निजधामाला (amazing आजी भारीच बोलत होती. आम्ही दोघी ऐकत होतो फक्त) हा तर, नातं जपायचं असत गुलाबाच्या फुलासारखं. चूक कोणाची याची उत्तर भांडण झाल्यावर लगेच नाही शोधायची!, ते मिटवायचं आणि मग शांतपणे चूक दाखवायची समोरच्याला!!. वेळ द्यायचा आणि  घ्यायचाही!!  घाईत काहीच निर्णय नाही घ्यायचा. हे नातं खरच नाजूक असतं!! ते तसच ताज तवान रहाण्यासाठी थोडासा बदल महत्वाचा असतो., Surprise  का काय म्हाणताना तुम्ही लोकं ते द्यायचे. कधी वागणं  तरी कधी दिसणं-नेसण थोडस बदलायचं. स्वत:ला त्याच्यासाठी बदलायचं पण अस्तित्व कायम ठेवून,  आपल्या निष्ठा जपून.

 तुझ्या बाबतीत मी म्हणेन तुला आधी स्वत:च्या नजरेत स्वत:ला सिद्ध करावे लागेल. त्याने वेळ दिलाय चान्स दिलाय तो सकारात्मक घे असा विचार कर की त्यामुळे तुझा आत्मविश्वास गेलाय तो परत मिळेल तुलाच! आणि एकदा तो मिळाला की तुझा "तो" कुठे जात नाही. तू जो निर्णय घेशील त्याच्याबद्दल तो आत्मविश्वास  परत मिळाल्यावर तो जो काही असेल तो असो., पण मुलीनो तुम्हाला कितीही बोर ,,, असेच म्हणता न तुम्ही लोक ते तसे वाटले तरी ऐका, ही नाती प्रेमात गुंफायची असतात. लगाम ठेवायचा प्रयत्न केलात तर सुटलाच सर्व हातून. बेदी घालायची नवर्याला पण ती मनाला त्याच्या पायात नाही!! किती खेचायच आणि कुठे सोडायचं हे कळले ना की सगळे काही सोपे होऊन जाते बघा!! आणि हेही खरच आहे ग बायानो. सगळ काही मुलीच्या हातात असते. नाते जपणे पण आणि ते तोडणे पण!! सीता-द्रौपदी मुळे रामायण महाभारत घडत आणि जिजाई मुळे शिवाजी.!!  दुर्गा, राणी लक्ष्मिबाई सगळे तुझ्या-माझ्यात असतातं गरज असते ती स्वत: वरल्या विश्वासाची!!

प्रेम, माया, आपुलकी, रुसवा, थोडी तू-तू मै-मै, थोडी माघार, थोडा आक्रमक पणा, थोडासा attitude and ego , कधी तुझ म्हणण तर कधी त्याच बरोबर, खूप सामंजस्य आणि प्रचंड विश्वास बस; नातं PERFECT!!!

हे इतक आणि बराच काही समजावलं मी माझ्या लेकीला जर तिला नात्यांची किंम्मत, त्यातली गंम्मत आणि ते जपायची कला जमली असती ना??? .. तर,,, आज तिचं लेकरू पोरकं नसतं झालं.

(सुन्न झाले मी... ही बाई सोयर-सुतक नसताना स्वत:हून विचारते काय आणि सगळ बोलते काय. का कशासाठी??? त्या मुलीला मोकळ करण्यासठी?? की.. की स्वत:च दुख: हलक होण्यासाही?? ... मुंबईची लोकल आणि त्यातला अजून एक चेहेरा.... )

तेव्हड्यात ठाणे आले. आम्ही तिघीही उतरलो. तीन दिशांना चालत सुटलो मागे वळूनही न पहाता. परत एक-मेकींसाठी तितक्याच अनोळखी आणि detached होतं.गर्दीत मिसळत गेलो धूसर होत गेलो एक-मेकिंपासून दूर पण गर्दीत... कदाचित एकटेपणाची भीती असेल अजून मनात कुठेतरी तिघींच्याही!! आम्ही तिघी आता अनोळखी होतो, चेहेरे विसरणार होतो पण,,, विचार , त्याला चेहर्याची आणि ओळखीची गरज नसते तो डोक्यात रहाणार कायमचा!!.. आणि सोबतीला होता एक विश्वास! आजीनं दिलेला, स्वत: समर्थ असण्याचा.
                                                                                       
                                                                                                 
                                                                                                ...  रेश्मा आपटे





मुक्तबंध

मलाही एकदा मृद्क्कण बनून 
गरारा वार्यावर भरारायचय  
खूप खूप उंच जाऊन 
एकदा त्या आभाळाला शिवायचं

नात, मुलगी, बहिण, प्रेयसी
मैत्रीण सुद्धा नाही बनायचंय  
हात पसरून खुल्या मनान
फक्त मी म्हणून जगायचंय 

बांधीव उंबरा ओलांडून
मला स्वत:ला ओळखायचंय 
मोकळा मोकळा श्वास घेऊन 
मनावरल मळभ पुसायचंय 

तो उंबरा ओलांडताना
मन स्थिर ठेवायचंय 
खोल काही तुटेल आत
तरी स्वत:ला सावरायचंय  

स्वैर करताना संचार
जगापासून अलिप्त राहायचंय 
सारे सारे तुटतील आधार
तरी स्वप्नांना जागावायचंय  

त्या स्वप्नांचा ध्यास घेऊन
वेड्यासारख त्यांमागे धावायचंय 
सारी सारी बंधने झुगारून
फक्त एकदाच स्वत:साठी जगायचंय  

                                  ...  रेश्मा आपटे 



Tuesday 8 November 2011

द्वंद्व

खुपदा कस होत की सगळ काही सुरळीत नियमित सुरु असतं. म्हणजे "रुटीन लाइफ़" सुरु असतं. तसं बघितलं तर सगळ कस जगाच्या जागी आणि नीट!! तरीही एक रुख-रुख असते एक अशांतता मनात घर करून असते. सगळ असून विरक्तीची भावना देणारी! प्रत्येक पाऊल लख्ख प्रकाशात पडत असतं पण.. पण त्याच प्रकाशात स्वत:चीच दिसणारी सावली!! ती मात्र मन झाकोळू पहाते. दिवसा-उजेडी अचानक काळोखाच्या स्वाधिन झालो असे वाटायला लागते. मनात आत आता काहीतरी सलत रहाते. संपूर्ण  आयुष्याला  पुरेल  असे नैराश्य बेसूर हसत जणू आपलं अस्तित्वच त्याच्यात सामावू पहाते. 

हल्ली खुपदा मला असेच होतं. मनाचा नुसता गोंधळ उडतो का कस? कश्यामुळे ? काहीच सुचत नाही ... :( .. खूप खूप confident वाटत असताना मध्येच भीती वाटते काहीतरी चुकेल, जमेल का? नक्की हे करू शकू ?? असे एक ना दोन १०० प्रश्न मनात येतात! प्रत्येक प्रश्नासरशी मनात एक नैराश्य, एक अस्वस्थता दृढ होत जाते. ही भावनाच विचित्र अपरीचित असते मला! आज पर्यंत कोणताही निर्णय घेताना मी खूप ठाम असायचे. पण मग अचानक हे असे का व्हावे? म्हणजे प्रेम भंग किंवा total अपयश वैगरे अशी काहीच भानगड नाहीये मग तरीही हे का? उत्तर नाहीत आणि सापडतही नाही प्रयत्नपूर्वक शोधून सुध्धा नाही, उरतात फक्त प्रश्न आणि प्रत्येक प्रश्न मनाचा गोंधळ वाढवतो. एखादी गोष्ट सुरु करते किंवा करायचा निर्णय घेते पण त्यावर ठाम होता येत नाही. हे करू का? ते जमेलच किंवा मी ते जमावेनच याची स्वत:चच मन ग्वाही देत नाही...   मलाच होते आहे का असे? आणि का होते आहे? 

फक्त मीच? की माणसाचे मनच असे आहे, सगळ्यांच्याच मनात ह्या अश्या दोन परस्पर विरोधी भावना आशा आणि निराशा एकत्रित वास्तव्य करीत असतात? एक दुसर्यावर हावी होण्याची धडपड करत असतात?..  आणि जिचे पारडे ज्या वेळी जडं तसा त्या व्यक्तीचा मूड! किवा स्वभाव आशावादी किंवा निराशावादी!
 व्यक्ती एकच पण .. पण विचार अनेक.. प्रत्येकाच्याच मनात असतात ह्या दोन्ही बाजू सतत, सतत एकमेकांशी झगडणार्या! एक आशावादी, हसरी, उत्साही, प्रेराणादाई तर एक निराश, उदास, निराशावादी! सगळ्यांच्याच मनात दडलेल्या असतात दोन विरोधी भावना एक लख्ख प्रकाशासारखी स्वच्छ, निर्मळ तर दुसरी स्वत:बरोबर निराश करणारी काळोखात खेचत नेणारी कुट्ट काळ्या सावलीसारखी निराशावादी!!. 

माणसाचं इवलस ते मन पण..  भावना त्या मात्र अनेक! ते मन भारीच चमत्कारिक असत नाही, उगी नाचवत रहात, एका क्षणी सगळ काही शक्य वाटतं, तर पुढचाच निराश उदास क्षण सार काही अशक्य करून जातो. प्रत्येकजण नेहमीच एक झगडा, एक युद्ध अनुभवत असतो. आशा-निराशा दोघीही एकमेकीनवर कुरघोडी करण्याच्या प्रयत्नात असतात. सतत सतत आपल्यावर ताबा मिळवू पहातात आणि आपण त्या पैकी एकीच्या स्वाधिन होतोही. कसे? कोणत्याक्षणी?  हे आपले आपल्यालाही नाही समजत! पण आशा-निराशेच्या मधली ती अदृश्या रेषा ओलांडून नेहमीच प्रत्येकजण एका बाजूला खेचला जातो. पण जोवर आपण रेषेच्या एका बाजूला असतो, मग ती कोणतीही असो, तोवर सगळाच ठीक असतं; कारण रोजचा दिवस सारखाच नसतो ना? पण जेव्हा कधी आपण त्या रेषेवर उभे असतो आणि तळ्यात मळ्यात सुरु असतं तेव्हा? तेव्हा काय? काय करायचं आणि कस आवरायचं मनाला? कस पुन्हा वेसण बांधून आशेच्या आश्रयाला सोडायचं?

हल्ली हे मी सतत अनुभवतेय एक द्वंद्व !! सतत मनात चालणार एक युद्ध. आशेचे - निराशेशी. उत्साहाचे- निरुत्साहाशी. punch  me असते ना तशी अवस्था झालीये माझी सध्या! त्या अदृश्या रेषेच्या अलीकडून आणि पलीकडून सारखेच धक्के बसतायत आणि मी मात्र गडबडतेय त्या रेषेच्या पलीकडे जाण्यासाठी. तो उत्साह खुणावतोय पण ते नैराश्य वरचढ ठरतेय माला वाकुल्या दाखवत परत परत स्वत:त कोंडतय! 

आणि मी झगडतेय प्राणपणाने बाहेर पडायला!!!  कशी? ते मात्र समाजात नाहीये. 

हे सगळ उतरवू की नाही इथे इतक _ve  नको लिहीत जाऊ असे काल एक मित्र म्हणाला पण माग विचार केला कदाचित हा एक मार्ग असू शकतो मनातला गोंधळ समजाऊन घ्यायचा आणि फायदा नाही झाला तरी तोटा तर नाहीच होणार ना? म्हणून मग खरडलं  ..........

                                                                                                ,,, रेश्मा आपटे