Monday 26 September 2011

त्या वळणावर ...


सोडून गेलास माझी साथ
निघून गेलास तोडून सारे पाश 
अन झिडकारून ते मोहक आकाश
त्या वळणावर...

प्रेमात आकंठ बुडत स्वप्न रंगवत    
एक घरट विणत सजवत
इतका कसा कोरडा झालास  
त्या वळणावर ....

माझ्या सवे हसलास तू, रुसलास तू 
गुलाबी मिठीत विरघळलास  तू 
अचानक कुठे हारवलास तू? 
त्या वळणावर ...

सरण पेटले उरल्या आठवणी 
जिथे गुंफिली मंजुळ गाणी 
आज ऐकते ती विराणी 
या वळणावर ....


अश्रू अलगद एक कलंडला
तुझ्या आठवांचा मोती होऊन
गालावरतून हळुच निखळला
त्या वळणावर  ..



                                    ....  रेश्मा आपटे 


Sunday 25 September 2011

क्या फायदा तुम्हारी पढाई लिखाई का???

काल सकाळी सकाळी कोर्टात एक evidence सुरु होता. ती मुलगी सांगत होती, तिच्या सासरच्यांनी तिला कस छळलं? तिच्याकडून पैश्याची वारंवार मागणी केली गेली, उपाशी ठेवलं गेलं, नोकरी करून आल्यावर प्रचंड घरकाम आणि नणंदेच्या मुलाची काळजी हे करावेच लागत असे. अशात ती स्वत: ३  महिन्यांची बाळंतीणं तरीही घरात पैश्यांची चणचण म्हणून नोकरी करीत होती. दिवसभर नोकरी मग घरकाम, मुलं त्या नन्तर तिच्या ३ महिन्यांच्या असहाय्य लेकराला छातीशी कवटाळून, मुलीला जन्म दिल्याबद्दल त्या पिल्ला इतक्याच असहाय्य पणे शिव्या आणि मार खात होती. रोजच्या शिव्या, मार, दारूचा शिशारी आणणारा वास पैशांची वाढत जाणारी मागणी आणि त्या निरागस जीवाला सतत सतत दिलेली दुषणे याने ती इतकी पिचली होती की ती एका प्रश्नाच उत्तर देताना जोरात ओरडली " साहब ये आदमी नाही है साला हैवान है | उसे औरत चाहिये बीबी नाही, सुभे खाना बनाव, दिन भर पैसा कमाओ, और रात को बिस्तर मै लेटो बस| मेरी लडकी तब ३ महिने की थी जब ये उसे मारना चाहता था| अब बडी हो गई तो उसे उसपे हक चाहिये| मत देना, मत अरे ये तो मेरी बेटीको भी बेच खायेगा,,,, सहाब|"    

ती जे म्हणत होती बोलत होती अगदी १००% खर नसेलही.,,, पण त्यात आता पडायचे नाही आपल्याला! पण आजच्या जमान्यात शिकल्या सावरलेल्या घरात हुंडा, पैसा, स्त्री ला कमी लेखणे, मार-हाण आणि हत्या हे प्रकार होतात??  आजही "मुली वाचवा" वाले संदेश लोकांपर्यंत पोहोचवावे लागतात हेच दुर्भाग्या आहे आपल्या देशाच!

तिथून ऑफिस ला गेले घडलेला प्रकार as usual discuss केला तर एक colleague म्हणाला,
तो :     "अरे आज या कल कुछ नाही होता. होती है mentality , जब तक वो नाही बदलेगी ना, तब तक ये सब           
           शुरुही रहेगा! XXXX आहेत XXX डावरी मागणारे. पण तुला माहितेय माझ्या एका मित्राच लग्न ठरत    
           होतं बघ मी काल बोललो ? 
मी:      " हा त्याच काय?
तो :-    "त्याच लग्न मोडल :(  can  u  gusee  the  reason ?" 
            मी चार पाच common  reasons  दिली तर म्हणे
तो:       "WRONG ...." त्याने सांगितले की मी हुंडा घेणार नाही. सिर्फ लडकी दो काफी है| "
                त्या मुली कडच्याना वाटलं की, मुलात काहीतरी दोष आहे म्हणून हे लोक हुंडा घेत नाहीयेत म्हणून           
                लग्न मोडल .. 
unbelievable 
सुन्न झाले मी हे reasoning  ऐकून!!! मी " अरे काय फालतूगिरी आहे. म्हणजे गुजराती, मारवाडी जे कोणी असाल तुम्ही पण हे वागण म्हणजे हुंडा प्रथेला support करण्यासारखच आहे की ...." मला अजूनही काही बोलायचं होतं पण.. तो colleauge  म्हणे don 't  take  it  on heart  jus chill  n  lets leave ,, its  २.३० almost  

मग दुसर्या कोर्टात जायला Rik पकडली म्हातारा मुस्लिम चाचा होता driver! खूप काही बाही बडबडत होता आणि मला जाम irritate होतं होतं त्याच बोलानं!! पण परीयाय नव्हता सो मी ऐकत होते..
चाचा : " आप वकील हो न madamji ?"
  मी      "हंमम" 
मग तो जो सुरु झाला तो एकदम कोर्ट येईपर्यंत बोलताच होता.
चाचा:   " कैसा है ना मै इधर बंबई मै २० साल से हू और ऑटो चला रहा हू| अब वो दिन दूर नाही जाब लाडकीया   
            जायेंगी लाडका देखणे और 'ना' करके आयेगी| आज कल की बेटिया होतीही सयानी है!! लडके लडके 
             करने क्या है? बीबी आतेही पल्लुसे बंध जाते है| क्या कहेते हो madam जी मैं सही हूं ना? अभी आपही 
            बतावो लडकी पढी-लिखी चाहिये, वो नोकरी भी करनी चाहिये, और उपरसे लडकेवाले दहेज मांगते है 
           ?? मै कहेता हु क्यों ? क्यों दे वो दहेज ? जिंदगीभर की कमाई दे रहे है, तेरे हाथ मै उनकी जिंदगी, ख़ुशी,            
           उनकी बेटी सोप रहे है| फिर भी पैसोंका लालच क्यों?, सही केहे रहा हूं ना madamजी? औरत की किंमत 
           नाही जानते और बात करते है, "हम ओफ्फ्सर है... " आप ही बोलो, क्या फायदा आईसी पढाई लिखाई 
           का???"

मी ऐकत होते. आधी परियाय नाही म्हणून मग इंटरेस्टिंग वाटलं म्हणूनं! मी आवाक झाले ते ऐकून! त्या सध्या, अनपड चाचाचे स्पष्ट आणि पुढारलेले समजूतदार विचार ऐकून. मी स्तब्ध झाले. high  profile  लोकाना, स्वतःला सुशिक्षित म्हणणार्याना जे कळत नाही, जे आपल्या सारख्या पांढर पेशी माणसाला समजूनसुद्धा  दुसर्या पर्यंत पोहोचवता येत नाही, ते त्या चाचाने फक्त १० मिनिटात माझ्यापर्यंत पोहोचवलं. खरच हुंडा बळी, मानाषिक शारीरिक छळ, स्त्रीभ्रूण हत्या हे सगळे समाजाला जडलेले रोग आहेत आणि त्यांचे निवारण हे फक्त फक्त विचारांच्या प्रगल्भतेने किंवा समजुतीनेच होणे शक्य आहे. जोपर्यंत सगळ्यांचे विचार त्या रीक्षेवाल्या चाचासारखे प्रगल्भ होत नाहीत ना, तोवर खरचं .. 

"क्या फायदा तुम्हारी पढाई लिखाई का?.... "

                                  
                                                                                              ...  रेश्मा आपटे 

Wednesday 7 September 2011

अनोखी ( भाग ६ )

तिच्या अंगावरले सिगारेट्स चे डाग, पट्यांचे वळ आणि तिचे निबर डोळे स्वत:च खूप बोलके होते.नवरा कसला तो हैवानच! माणूस म्हणायच्याही लायकीचा नव्हता तो! पण त्याचा संसार तिने मेहेनतीने आणि  नेटाने केला. ३ मुलं तिला पण मोठ्याचे नि तिचे सूरच कधी जुळले नाहीत हेच खरं! दोघे एक-मेकांना कधी उमगलेच नाहीत. हे ऐकून त्याचं काळीज हलल. मग त्यानं ठरवलं, शेवटचे काही महिने तर महिने पण तिला सुखात ठेवायचे. तिने जिवंतपणी भोगलेल्या मरण यातानांवर मरणाच्या दारात का होईना पण फुंकर घालायची याच एका निष्ठेने आणि जिद्दीने त्याने हे पाउल उचलले. ती जाणार!! त्याला जास्तीच एकटा करून जाणार हे निश्चित होतेच ते स्विकारून!!आणि त्या आयुष्यभराच्या दुख:साठी स्वत:हून तयार होऊन त्याने तिच्या सकट त्याच्या घराचा उंबरा ओलांडला. त्या उंबर्याच्या आत तीच सुख होतं, आणि ज्या क्षणी ती तो ओलांडेल त्या क्षणी त्याच नरक्प्राय आयुष्य सुरु होणार होतं.

काही महिने म्हणता म्हणता त्या उंबर्या आतल्या सुखाने किंवा त्याच्या सहवासाने किंवा तिच्या इच्छा शक्तीने किंवा त्यांची दुख: बघून स्वत:च रडू न आवरू शकणार्या नियतीने त्याना चक्क ३ वर्ष दिली एकत्र एक-मेकांबरोबर!! ,.. आणि मग कालचा काळा दिवस!!! नकोसा ... त्याची हिम्मत तोडणारा! ती जगायला हवीही होती आणि तिची वेदना संपवायला फक्त मृत्यूच उपाय होता म्हणून ती सुटायलाही हवी होती.विचित्र कात्रीत फसलेला तो फटफटीत डोळ्यांनी त्या बंद काचेच्या दाराआड जीवाच्या आकांताने श्वास घेणार्या तिला 'मेहेसुस' करण्याचा मूकपणे प्रयत्न करत होता. आणि त्याला तिचे बोल आठवले: "माझ्या प्रेताला अग्नी माझा मोठा देणार नाही आणि माझी तिरडी शशीच बांधेल" हे शब्द त्याच काळीज चिरत गेले... असह्य कळ गेली त्याच्या डोक्यापासून पायापर्यंत हृदय जाळत!!

तेव्हढ्यात तिचा भाऊ, मुलं, शशी, तिची आई सुमी सगळेच पाठोपाठ पोहोचले. डॉक्टरांनी निर्णय घ्या म्हणताच सगळेच अडखळले. तोही उभा होता भेदरलेल्या कोकरासाराखा!! तिची आई पुढे झाली त्याच्या गालावरून हात फिरवत,"खूप केलास बेटा तीच खूप केलंस पैश्याने आणि कष्टाने!!आता जाऊदेत तिला नको असं अडकवून ठेवूस..." मानेवर मणा-माणाचं ओझं असल्यासाख वाटलं त्याला कष्टाने मानेनेच संमती देतं तो खाली बसला. ती जिद्दी होतीच पण खूप हट्टी, हेकट, चिडचिडी, तुसडी,झाली होती.. पण त्याची काळजी घेणारी, पुन्हा एकदा त्याच्या जगण्याला दिशा देणारी, परत नव्याने स्वप्न पहायला लावणारी, खूप असह्य वेदना सोसून, अशक्त शरीराला जपून, वेदनेने विव्हळून सुध्धा जगण सुंदर आहे.. तुझ्या साथीने तर खूपच सुंदर आहे!! म्हणणारी, कोणत्याही औषधाशिवाय फक्त इच्छाशक्तीवर १ च्या जागी ३ वर्ष जगणारी !!! ICU च्या काचेच्या आत आत्ताही मृत्यूला झुंजवणारी "ती" खरच "अनोखी" आहे नाही "होती." .............

आहे आणि होती ची अस्पष्ट रेषा पार करून त्याची अनोखी त्याच्या समोर त्याच्या परवानगीने मुक्त झाली. ......

                                                                                                           
                                                                                                  ...   रेश्मा आपटे

Tuesday 6 September 2011


अनोखी ( भाग ५)

अनोखीची मागची बहिण सुमी!!!..तिने दादा म्हणून हाक मारली नसती आणि स्वताची ओळख पटवून दिली नसती तर ती बाजूला बसलेली मध्यम वयीन निटनेटकी बाई म्हणजे,,काही वर्षांपूर्वीची परकर-पोलक्यातली गोरी माऊ सुमी हे स्वप्नात सुध्धा त्याला वाटण अशक्य होतं. ती तोंडभरून हसली उणी-पुरी २०-२५ मिनिटे त्याच्या बाजूला बसली असेल ती. पण त्याला सुन्न करून गेली. ती उतरून गेली त्याला कोड्यात टाकून, काही वर्षे त्याला मागे ढकलून. ,...

तिचे शब्द त्याला आठवत होते. .."दादा, खूप चिडला असशील ना रे आम्हा सगळ्यांवर, मी सुधा गुन्हेगार आहे तुमची. तिच्यावर अविश्वास दाखवून, आमच्या सुखा खातर आम्ही तिला लग्नासाठी हो म्हणायला भाग पाडलं. ती चिडली, भांडली, रडली जे शक्य ते सारकाही केलं तिने स्वत:च म्हणण घराच्या मोठ्यांना पटवण्यासाठी!! पण नाही जमल तिला. तू जवळ असतास तर कदाचित काही होऊ शकाल असतं पण तू तू नव्हतास रे... तिने विशू दादाला सांगून तुला ट्रंक call सुध्धा करायचा प्रयत्न केला. पण नाही जमलं त्याला!! त्याच्या प्रामाणिक प्रयत्नांकडे न पहातच ताईन त्याला जन्माचा गुन्हेगार ठरवून टाकला...२ वर्ष खिंड लढवली तिने एकटीने.. शेवटी माझं कारण सांगून भगदाड पडलं बघ  आणि तिला लग्नासाठी होकार द्यायला भाग पडलं दादानं!! तुला चिडून तिरमिरीत एक पत्र लिहिलं "..हरली तुझी अनोखी म्हणून.." तिला वाटत होतं तू येशील. तिला हारू नाही देणार तू पण तू नाही आलास. जेव्हा आलास तेव्हा किती सहज तिच्या हसर्या मुखवट्यावर विश्वास ठेवून परतलास रे ?? कसा रे कसा??? हेकट, संशयी, हट्टी नवरा, पदरात तीन मुलं, नोकरीची गरज, तिथल्या जबाबदार्या ताप आणि घराचा मनस्ताप ... आयुष्याचीच होळी झाली रे दादा तिच्या!! तुला दोष नाही देत पण तुझ्याशी बोलून जरा हलक वाटलं कारण तिच्या आयुष्यात तिचे असे दोघाच होतो ना आपण? "
          ती उतरून गेली,.. तिची वाक्य घोळत राहिली त्याच्या डोक्यात, मनात.. तिच्या आयुष्याची होळी झाली ... होळी, होळी .. त्या आगीत होरपळत मात्र तो राहिला. ...

तो उगीचच जागेवरून उठला आणि फेर्या मारू लागला. जणू सुमी त्याला कालच भेटली होती आणि तिच्या शब्दांनी तो अस्वस्थ झाला होता. चूक-बरोबर, खर-खोट, का, कसं? जणू प्रश्नांनी त्याला घेरल आताच... तेव्हा सारखं. तो जड,अस्वस्थ,गोंधळलेल्या मन:स्थितीत परत आला. शशी,शमा,विशाल,अजय,आई-पप्पा सगळ्यांना घडलेला प्रकार त्याने सांगितला. पुढे काय??सगळ्यांच्या समोर मोठ्ठा प्रश्न उभा राहिला? आता काय? नेहमी प्रमाणे सगळे शामाकडे पाहू लागले.ती स्पष्ट आणि शांत पण हुकमी स्वरात म्हणाली "समांतर रस्ते जोडायला जाऊ नका. जे झालं ते दुर्दैवी होतं. पण तुझं तिच्या आयुष्यात परत जाणं म्हणजे तिच्या ठिगळं लावण्याच्या प्रयत्नांना फाडून आत शिरण ठरेल. तर सध्या तरी शांत रहा." पण ..त्याचं मन काही शांत होत नव्हत. त्याने वेगवेगळ्या sources ने तिची माहिती काढणे सुरु केले.  त्याला कळल की त्याचा त्रास असह्य होऊन ती वेगळी राहातेय.पोरं तिच्या आईकडे आणि होस्टेल वर अशी असतात.मग न राहून तो तिला भेटला. संपूर्णपणे थकलेली, पोक्त, अशक्त, पण 'मानी',... "अनोखी"  खूप वर्षांनी भेटला तिला. काही मिनिटांचीच भेट पण दोघांचीही आयुष्य घुसळली गेली. डचमळलेल्या भावना दुख: शांतच होईनात!!!

तिचा नवरा गेला तेव्हा तिला आधार द्यायला तिचे नातेवाईक आणि मित्र मंडळी होती. तो त्यादिवशी तिला भेटला पण मग त्याने तिला भेटायचं टाळलं मुद्दाम!! तिला भेटण टाळायच नेमक कारणं काय  त्याला तिची दुख: पहावणार नाहीत म्हणून? की समाज? की आणखी काही??? हे तो आताही सांगू शकत नव्हता.
आणि कितीही झाल, कितीही वाटलं तरी तिचं एक छोटसं विश्व होतं. त्यात तिची 3 मुलं होती. पण जेव्हा त्याला कळलं की तिला hepatitis B आहे आणि त्याला उपाय नाहीत. लिव्हर संपूर्णपणे damage झालीये. ती फक्त काही दिवसांची किंवा फार-फारतर वर्षाची सोबती आहे. त्याने जगातल्या कोणाचीही पर्वा केली नाही. तो तडक जाऊन तिच्या समोर उभा होता. त्याच टेचात त्याच घुश्यात जसा मिलीतरीत जाण्या आधी असायचा तसाच!!.सुरुवातीला ती आवघडली.पण तिच्याकडे परीयायाच नव्हता.जेव्हा डोक्टरांनीही सांगितले होते की आता काहीच होऊ शकत नाही. त्याने तिला काहीच बोलू न देता चेक अप्स करायला भाग पडले.खूप प्रयत्न केले.पैसा गेल्याच दुख: नव्हत पण लांब का असेना पण ती जगायला हवी होती त्याला. blood transmission सुधा आता अशक्य होतं.


तेव्हा तिला शांतपणे भेटायची गरज त्याला वाटू लागली. शेवटच बोलायचं होतं.. मग तो तिला भेटेल अशी एकच हक्काची जागा आता शिल्लक होती. शशी नि शमा च घरं!! त्यांनीही परवानगी दिली. त्याने ठरवलंच होतं सगळं सगळं बोलून टाकायचं कोणत्याही मुखवट्याला भुलायचे नाही.एक तर भळभळणारी जखम वाहती होईल नाहीतर खपली तरी धरेल तिच्यावर!!काळ उंबर्यापलीकडे उभा आहे हा शेवटचा मोका म्हटल्यावर तीही बोलली ..भरभरून बोलली मोकळी मोकळी होतं.तिच्या अंगावरले सिगारेट्स चे डाग स्वत:च खूप बोलके होते.पण मुलाबद्दल ऐकून त्याच काळीज हलल.२-३ दा भेटल्यावर त्यांनी एकत्र रहाण्याचा निर्णय सगळ्यांसमोर जाहीर केला.अपेक्षेप्रमाणे तिचे नातेवाईक तयार झाले कारण आता आजारी बाई करणार कोण? वेळ,पैसा आहे कोणाकडे? हे प्रश्न होतेच. मुलांनी थोडा वेळ घेतला पण मग काकाला accept केले. शेवटी तीही तिचीच मुलं प्रक्टीकॅल !!! की स्वार्थी परस्पर जबाबदारी घेणारं कोणी भेटलं मग मोठेपणाने परमिशन देणारी स्वार्थी तिच्या नावार्यासारखी. काही का असेना पण शेवटी ते दोघे एकत्र आले.

                                                                                                              क्रमश: