Thursday 5 May 2011

want to go back in those days :( :(

मध्ये काही कारणास्तव शाळेत जाण्याचा योग आला ,,, 
शाळेच्या आवारातील काही छोटे- छोटे बदल सोडले तर शाळा काहीच नाही बदललीये ,,, मस्त मस्त मस्त ,,, पुस्तकातील काही पाने जशी वार्‍याने उडून सहज मागे जावीत न तितक्याच सहजपणे मी माझ्या आयुष्यातली काही वर्ष मागे गेले. ते मैदान, ती इमारात, तो जिना, ती मोरावरली सरस्वती सगळं सगळं माला खुणावत होत माला मागे मागे घेऊन जात होत माझ्या सुंदर सुंदर दिवसात ... काही सेकंदात इतका प्रवास केल्यावर हातावर बसलेल्या छोट्याश्या बॊल ने भानावर आले मी, अगदी पुढच्याच क्षणी  ... 

मग सहाजिकच माझ लक्ष तो बॊल उचलण्यासाठी आलेल्या चिमुरड्याकडे गेले त्याच्या डोळ्यात भीती स्पष्ट दिसत होती,, हा आता ती भीती  "ही बाईना सांगेल?... मग ओरडा बसेल का?? " ह्याची होती, की "बॊल गेला तर??" किंवा "या मुळे उद्यापासुन खेळणेच बंद झाले तर???" "आता ही काय करेल नक्की ??? " याची होती, ते माला नि त्याला दोघानाही सांगता नाही यायचं ,,, हं पण एक मात्र खर की, मी स्वच्छ हसून तो बॊल त्याला परत केल्यावर मात्र त्या मोठ्या डोळ्यातले भाव क्षणात बदलले भीती ची जागा आनंदाने घेतली कारण आता  ना त्याला ओरडा बसणार होता ना त्याचा बॊल जप्त होणार होता,,, किती किती निरागस आणि खरे डोळे होते ते! त्याच्या निरागस मनाचा आरसाच जणू! खरच लहापण म्हणजे वरदान असत ईश्वराच... जे जस वाटत ते तसच्या तस व्यक्त करता येत.... कोणताही मुखवटा नाही बळेच हासण नाही की खोटी स्तुती नाही. 

शाळेत प्रवेश केल्या केल्या समोर येत ते सुंदर मोठ्ठ मैदान, नजर खिळवून  टाकणार... ती देवी, ते वर्ग, ते गेट, सगळ जिथल्या तिथे अरे पण ते झाड?? उन्हां पावसात सावली देणार, लापाछुपिच्या खेळात हमखास मदतीला येणार, दप्तरांची ओझी झेलणार, आमच्यातल्या एकाच डोक फुटल्यावर घाबरलेल्या आम्हाला बघणार, शाळा सुटली की त्याच्या मुळांशी आम्हाला सामावून घेणार, मैदानाच्या कोपर्‍यात आणि शाळेच्या आत प्रवेश केल्यावर डाव्याबाजूला डौलाने वार्‍यावर झुलणार आमचं लाडकं झाडं! ते मात्र नाही दिसलं कुठेच..,, आत गेले, जिना चढून वर गेले तर आमचा ४ वर्ष एकाच असलेला वर्ग ... माला खुणावू लागला मग काय सरळ आत शिरले, ते छोटे छोटे बेंच तेव्हा किती मोठाले वाटायचे आता चिमुरडे दिसत होते,,, तिथे केलेली मस्ती, मधल्या सुट्टीत खेळलेले गोल्स्पोट, छोटे छोटे बैठे गेम (काही खेळांची तर नावेही नाही आठवत), केलेली भांडणे, मारामारी, त्यानंतरची रडारड, मग दुसर्‍याच  क्षणी कट्टी ची होणारी बट्टी आणि परत एक-मेकांचे हात पकडून,जोक सांगून पोट दुखेपर्यंत हसणार्‍या आम्ही सगळ्या जणी,.. काही दोस्तांची मस्ती, शाळेत दिलेले पर्फोर्मंस, पहिला निबंध, पहिली कविता, भाषण, नाच सगळं सगळं काही आठवत होत. त्या आठवणीत शाळेतल्या सगळ्या बाई, ताई, मुख्याध्यापिका होत्याच, खूप आनंद, मस्ती, होती तशाच शिक्षाही होत्या,...

मी ज्या कामासाठी शाळेत गेले होते ते व्हायला थोडा वेळ लागणार होता. मग काय माझ्या त्या शाळेत माझी पावले इकडे तिकडे फिरत होती, माझ्या आठवणी ताज्या करत होती, लहानपणी वाटणार सगळ्यात मोठ ’जग’ म्हणजे हीच शाळा, जिने मला उभ राहायला शिकवलं, पाटीवर पेन्सिल फिरवून अक्षर ओळख करून दिली, माझ्या रेघोट्यांना भाषा इथेच तर मिळाली. माझी पहिली मैत्रीण, पाहिलं बक्षीस, पाहिलं भाषण, पाहिलं नाटक, सगळ सगळ काही माला इथेच मिळाल. मी मला पहिल्यांदा इथेच सापडले का?,.

शाळा म्हणजे भीती, कटकट, अभ्यास, आईला सोडून येण अशी करून घेतलेली धारणा, मग माझी रडारड, पहिल्याच दिवशी चालता चालता शाळेला घेतलेला साष्टांग नमस्कार ( आई-बाबांकडून कळले) .. या सगळ्यातून अंजू ताईंच्या वर्गात मी कधी रुळले ते काळेच नाही. मग अलका ताईंच्या वर्गात पहिली आले (ती पहिल्यांदाच आणि शेवटचीही  :D :D :D ). मग शाळेच्या जीवनाला खरी सुरुवात झाली पाटील बाई आणि पटवर्धन बाईंच्या बरोबर इतर सगळ्याच शिक्षिकांनी खूप खूप प्रेम दिल, आधार दिला, Confidence दिला. शाळा सोडून आता बरीच वर्षे झाली पण त्या आठवणी मनावर कोरल्या गेल्यात कायमच्या.. आज शाळेतून फेरफटका मारताना अस वाटत की आता कालच तर आपण ३री -४थित होतो,... अजून आपण तितकेच आहोत, तसेच आहोत, इमारत, बेंच, शिक्षक , त्ताई काहीच बदलले नाहीये आणि मी.. मी ही तशीच, डोक्यात काहीतरी घेऊन शाळेत हुंदडणारी ... एका खिडकीत उभी राहून मी सगळं काही विसरून, मैदानावरची मज्जा पाहात राहिले,... ती खेळणारी मुलं-मुली, मध्येच हसणारी, भांडणारी, सगळे जण आपापल्या ग्रुप बरोबर खेळण्यात मग्न होते, आणि मी त्यांना बघण्यात ,,,

त्या लपाछुपी खेळणार्‍या मुलींना पाहून उगीच वाटल अरे काहीच तर नाही बदललाय,.. सगळ तसाच आहे, ,, खेळ तोच आहे..लापाछुपिचा, नियम तेच आहेत, थप्पा किंवा भोज्जा होणारे हे अटळ, राज्य जाईल तरी नाहीतर परत तरी येईल .., भिडू मात्र बदललेत, आता या खेळातले .. इथे लपाछुपी आहे ती सुख -दुखाची, जया -पराजयाची.,, डेड लाईन्स  आणि अचिव्हमेंट ची,  आणि या खेळात राज्य ... ते मात्र सतत माझ्यावरच.!! .. आज मी आंधळी कोशिबिरही खेळते, डोळ्यावर बांधलेली ती पट्टी आहे अजून तशीच तशीच, यात लोक खुणावू शकतात, आवाजाने दिशाभूल करू शकतात, पण राज्य घेणार्‍याने अंधारात चाचपडत पुढे जायचे वेध घ्यायचा खेळाडूंचा.. इथेही अंधार आहे सगळीकडे....  शोध सुरु आहे ,,, शोध घ्यायचा आहे तो स्वप्नांचा, गाठीशी आहेत प्रयत्न आणि विश्वास ( याच आंधळी कोशिबिरीच्या खेळातून कमावलेला ) की ज्यांना शोधात फिरतोय ते आहेत त्यांची चाहूल लागलीये  ते मिळणारेत. ..

तेव्हड्यात माझा फोन वाजला आणि मी सरावानेच उत्तर दिले, " yes , i will meet u directly in the court ,... ok ok in case you want to discuss any thing just call in the office .. .now m in court ,lil busy lets talk afterwards .."
आणि मी माझ्या विचारांच्या लांगडीतून जरा भानावर आले .. आणि पटले माला की, नाही, मी ती नाहीये,,, सगळं सगळं शिक्षकांसकट तसच्या तसं आहे पण ,,, ती खरी खुरी मी कुठाय??? खूप खूप बोलणारी, मनापासून हसणारी, रडणारी, आणि बिनधास्त असणारी ,,,  त्या मातीत खेळणार्‍या मुलीसारखी.., मनसोक्त मन लावून, हातांसोबत पाय आणि ड्रेस मळवणारी.,...  मी मनसोक्त मन लावून मातीत अक्षर गिरमितवत बसू शकते का आता?? संत्र लिंबू पैश्या पैश्याला म्हणून गोल गोल फिरण्याचा खेळ तो साधा, पण आज तो ऐकून काय सुचते तर,किंमत,.. पै पै ची,,, विष - अमृत चा खेळ ! तो तर चक्क आपल्याला आयुष्यातले चढ-उतार दाखवत असतो. हे बालपणीचे खेळ आपल्याला आयुष्याच तत्त्वद्यान शिकवत असतात ?.. की, आता मोठे होऊन आपण त्या खेळांना, खेळांकडे निरागस पणे पाहूच शकत नाही?? की माझेच विचार भारकटतायत?? देव जाणे,,, पण एक नक्की की आज मी जशी खिडकीत उभी राहून विचार करतेय तशी ही मुलही करतील काही वर्षांनी शेवटी ते माझा "काल" आहेत आणि मी त्यांची "उद्या" ,... जणू मी त्यांना खो द्यायलाच इथे आलेय या विचाराच मालाच आता हसू येतंय ,,,
  
पण,,,, anyways , ह्या सगळ्या चित्र विचित्र विचारण नंतरही मी म्हणेन that I want my picnics ,, i want those      days to be back in my life ,,,, सुंदर दिवस, सुंदर नाती, सुंदर अनुभवं, आणि हो सुंदर खेळ :) :)  खरच आपले नि शाळेचे नातेच असे असते की ते ज्याने त्याने अनुभवायचे असते,,, ते असे शब्दात वक्त कर म्हणालात तर माझ्या नि तुमच्या भावनेचा अपमान होईल,, कारण, शब्दांचा पसारा मांडूनही ती अव्यक्तच राहील ....... म्हणून ह्या फंदात न पडता मी म्हणेन common SVJ 's lets reunite आणि मस्त अनुभवू ते दिवस ,,,,,,,,,,,,,,

miss those days n friendz  :( :( :(......


12 comments:

  1. मस्त, छान बरोबरी साधली आहेस.....असच लिहित रहा......

    ReplyDelete
  2. ekdam number one...u r a awesome writer lawyer :D

    ReplyDelete
  3. वर्गात पहिली आले (ती पहिली आणि शेवटचीच :D :D :D ).


    - Tula shevaTun pahili mhaNayachay ka? :-p :-D :-p

    :-) Chaan zalay lekh avaDala khup!

    ReplyDelete
  4. reunion sathi yachya pekhsha sunder invitation koni nai lihu skakat...too good
    chaan ahe

    ReplyDelete
  5. @ sameet n saurabh : Thanks :)

    @ saurabh : pahili aalele pahilun (ekadaach tar aale tyat kashaala doubt ghetoys :D :D :P)

    ReplyDelete
  6. resh.... hya lekhala kahitari lihunach dein mhanate... maze hi kahi anubhav.... :)
    baki lekh zakkas ahe... radavalas gadhade...NO MORE COMMENTS....

    ReplyDelete
  7. miss School days kharacha ga he vachalya var kharach school che divas aathvatat

    ReplyDelete
  8. kharach khup chhaan lihila ahes

    ReplyDelete
  9. Splendid, I like it. But personally I never liked school or college in my life.

    ReplyDelete
  10. Manala margal ali ki punha punha vachava asha patlicha lekh ahe ha
    Parat ekada vachun chhaan vatala

    ReplyDelete