Thursday 30 August 2012

काही बोललो ..बरच काही बोललो नाही ..
काही शब्द सापडले . काही शोधतच बसलो ..
विचारांत फक्त घोळत बसलो ..झाले इतकेच की  ..
मी आज पुन्हा तुझ्याशी बोललो..


ओलाव्याची ती वाक्ये तर काही सापडली नाही ..
ठेवलेली टोपण नावे येहूनही आली नाही..
काही शब्द आठवून स्वतः शीच हसलो ..झाले इतकेच की ..
आज पुन्हा मी तुझ्याशी बोललो..

शब्द काही आपलेसे वाटले, अर्थ मात्र अनोळखी भासले
तीच तू, तोच आवाज, बोलणे मात्र परके वाटले
पुरा.. पुरा मी आठवणीत हरवलो ... झाले इतकेच की ..
आज पुन्हा मी तुझ्याशी बोललो..

न बोलता सगळ ओळखणारी तू ..
आज मात्र 'आणि, अजून ,बोल ' म्हणत राहिलीस ...
थांबलेले शब्द..,अन वाढलेली अंतरे दाखवत होतीस..
न कळे , मी मात्र नवीन नात्याला नव नाव शोधात बसलो ..

झाले इतकेच की , मी आज तुझ्याशी बोललो


बोलायचे खूप होते, अनेक जाब विचारायचे होते
शब्द सगळे अडकत होते, अर्थ डोक्यात शिरत नव्हते
नकळत ती अंतरे सांधायला धावलो .. झाले इतकेच की..
आज पुन्हा मी तुझ्याशी बोललो..


अस्फुट हास्य, बटांशी खेळणं, तुझं निरागस लाजण,
ती भांडण, ते रुसणं, चाफेकळी बरोबर तुझं खुलण
सार आठवून तृप्त हसलो.. झाले इतकेच की..
आज पुन्हा मी तुझ्याशी बोललो..


चाफा आजही बहरलाय, सुवास माझ्यात भरून रहीलाय
पण आजचा क्षण आपला म्हणून उमलत नाहीये
हा क्षण स्वप्नात उमलवत राहिलो ... झाले इतकेच की..
आज पुन्हा मी तुझ्याशी बोललो..


                                          ... रेश्मा आपटे आणि वैभव भानूशाली 

1 comment: