Friday 26 August 2011

अनोखी (भाग ३)

त्या दिवसानंतर त्यांनी कितीतरी संध्याकाळी एक-मेकांच्या साथीने घालवल्या. दिवसा मासाने त्यांचे प्रेम खुलत होत आणि mature होत होतं. दोघेही practicle होते. एक-मेकांवर जिवापाड प्रेम करत होते. पण दोन वेळेला जेवायला लागतच .. आणि फक्त प्रेमाने भूक भागत नाही. तसेच स्वप्न पहायची तर ती पूर्ण करायची. त्यांची दिवा स्वप्न नाही बनू द्यायची!! अश्या स्पष्ट मताची girl friend मिळाल्यावर त्याचा नाईलाज होता. आणि शेवटी हेही खरच होत की त्यालाही स्वत:ला proove करायचे होते. सगळ काही दोघांनी मिळून प्लान केलेलं. अस वाटत होतं की सगळं किती सोप्प आहे. ती सेक्रेटरी बनेल आणि हा defense सेर्विसिस मध्ये join होऊन देशाचं रक्षण कारेलं. घरून विरोध झालाच तर पळून जाण्यात आणि तिला पळवण्यात काही गैर आहे असे त्या दोघानाही वाटत नव्हतेच कधी! धर्म बुडेल, समाज काय म्हणेल? याची चिंता "अनोखी"ला आणि तिच्या "फौजी" ला कधीच नव्हती. होती ती आस, स्वप्नांचा वेध घ्यायची!! स्वत:च अस्तित्व निर्माण करून एक-मेकांच व्हायची!!!

प्लान करताना सोप्प सोप्प वाटलेल्या आयुष्यातलं पाहिलं वळण म्हणजे त्याला आलेला ट्रेनिंग चा call .पहिली  कसोटी त्यांच्या स्वप्नातल्या आयुष्यातली !! ते लेटर घेऊन तो अशाच एका संध्याकाळी तिच्यासमोर बसला. बराच वेळ सगळीकडे शांतता होती. त्यांच्या लाडक्या जागी वडाच्या पारावर दोघेही स्थब्ध बसले होते. शेवटी ती नकोशी शांतता तिने संपवली " कधी निघतोयस?" .. "परवा " ... "......."  तो :" बघ विचार कर एकदा,.. एक चांगली job ऑफर आहे इथली" ,.ती: "तुला काय हवाय?"  उत्तरादाखल त्याने तिला मिठी मारली, तू  म्हणत असशील, तर.. तो जोब स्विकारतो मी .. तू बोल ... तिने डोळे मिटले! आता निर्णय तिलाच घ्यायचाय हे तिने पुरते जाणले होते, मग नेहेमीसारख स्वच्छ हसत ती म्हणाली " तुझी स्वप्न, तुझं passion मला कळतं, आणि मी प्रेमच  केलय "फौजी" वर .. मग चला तयारीला लागा! ,, " Go and make me feel proud " आणि निश्चिंत मनाने जा, पत्र पाठव पण अक्षर निट काढ ... सगळं तसचं असेल फक्त जेव्हा सुट्टीवर येशील तोवर तुझी अनोखी "सेक्रेटरी" झालेली असेल. परवा जाणारेस ना? तेव्हा ग्रुप मध्ये भेट्शीलच पण आज कारण न देता थांब. तो हसला ,.. ते दोघे तिथेच बसून होते खूप वेळ,.. सगळीकडे काळोख भरून राहिला होता. ते परिचित झाड अचानक भयाण वाटायला लागलं तसे  ते उठले. पुन्हा: इथचं भेटायचं वाचन देत आणि घेत !!! दोघेही निघाले ठरवलेलं आयुष्य घडवायला.!! 

त्याचा हात भाजला सिगारेट संपली होती त्याची. तो पुन्हा यंत्रवत हॉस्पिटलच्या पायर्या चढू लागला. त्याला वाटलं खरच किती नि काय काय आखलेलं, रंगवलेलं पण.. पणं आपल्याच चित्रात आपल्याला रंग भरण्याचाही अधिकार नसतो!! तो अधिकार नियतीचा!! सुंदर सुंदर चित्रातले रंग कसे लीलया उडवून नेते ही नियती!!! आणि आपण नाचत राहातो फरफटत रहातो तिच्या मर्जीनुसार! त्याला तिची पत्र, त्यातला मजकूर, तिची प्रगती सगळ अंधुक अंधुक आठवत होतं. प्रत्येक पत्रात सगळ्यात पहिले वाक्य कोंबडीचे पाय बरे पण तुझं अक्षर नाही. सुधार सुधार ... आणि शेवटचही ठरलेलच... "खूप खूप आठवण येते तुझी!! कधी येणारेस?" ,. त्याने पत्रातून कळवलं की त्याची " बदली झालीये war front वर. मिळालेली नोकरी व्यवस्थित कर. डोकं शांत ठेव भटक भवानी सारखी उगीच फिरू नकोस, काळजी घे माझ्या "अनोखी"ची. मला माहितेय तू माझी वाट बघातेयस एक वर्ष झालं मला तुला भेटून आणि ही राजाही रद्द झाली. मी सुखरूप आहे आणि असेन कारणं तुझं प्रेम माझ्याबरोबर आहे. काळजी करू नकोस काही झालाच तर नव्याने डाव मांड, तुझ्याच म्हणण्याप्रमाणे  आयुष्य खूप सुंदर आहे ते सुंदरपणे जगं. "


मग शेवट शेवटची पत्र आठवली त्याला .. घरातून लग्नाचा विषय खूपच डोक  वर काढत आहे. थांबवणं अशक्य होतयं ,, एकदा ये, घरच्यांना भेट. मग मी तुझ्या अशी मागे नाही लागणार. असेच सांगितले तर परवानगी नाही मिळणार आणि ते पण लग्न लावून द्यायला इरेला पेटतील. त्या पत्राला याने दिलेलं उत्तर तिच्यापर्यंत पोहोचलाच नाही. म्हणजे ते पोस्टचा काहीतरी प्रोब्लेम झाला होता. त्याला तिची पुढेही ५-६ पत्र आली पण त्याची २-३ पत्र युद्धाच्या सावटाखाली त्याच्या बेस कॅम्पलाच विसावली. वय आणि घराचा फोर्स दोन्ही वाढत गेला. तिने शेवटी घरी सांगून टाकलं सगळं सगळं ,.. त्यानंतर जे रामायण घडल ते त्याला तिच्या पत्रांमधून कळलंच होतं. आणि शेवटचं पत्र ज्यात तिने फक्त इतकाच लिहिलेलं " राजा तुझी अनोखी हरली रे, खूप खूप भांडली, रडली, चिडली पण आईच्या ब्लाक्मेलिंग पुढे आणि सुमीच्या लग्नाच्या विषयामुळे, तसच "स्वार्थी " हे विशेषण चिकटवून नाही घेऊ शकली म्हणून, घरच्यांची सोय म्हणून, ती झुकली ... आज सगळ्या वचनांतून मला मोकळं कर..!! थकलेय आता रे दोन वर्ष झाली रोजची भांडण, चिडचिड मग तुझा उद्धार .. आणि रोज वाट पहाणं तुझ्या पत्राची" आयुष्य संपून गेलं तरं बरं असं  वाटू लागलं पण तुझी एका "फौजी" ची "अनोखी: इतकी कमकुवत पळ्पुटी असूच शकतं नाही."

तो इचू पर्यंत पोहोचला. पुन्हा एकदा तिला काचेतून शांत झोपलेलं पाहिलं आणि बेसिन जवळ गेला. तोंडावर  भसा भसा पाण्याचे हापके मारले त्याने!! त्याच्या मनात त्या शेवटल्या आता पिवळ्या पडलेल्या कागदावरल्या शेवटच्या दोन ओळी घोळत राहिल्या. "त्यामुळे आयुष्य संपवण्याची हिम्मत आणि इच्छा दोन्हीही माझ्यात नाही. तेव्हा ह्या हरलेल्या अनोखीसाठी रडू नकोस राजा!!. का ? कसं? याची उत्तर न शोधता पुढे चालत रहा. थांबू नकोस, नव्या उमेदीने जगं कारण आयुष्य खूप सुंदर आहे!!! "

                                                                                                    क्रमश:


No comments:

Post a Comment